शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

राष्ट्रवादी फुटीचे प्रकरण न्यायालयात गेल्यास हाेऊ शकताे विलंब- घटनातज्ज्ञ उल्हास बापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 11:21 IST

मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या त्यांच्या ९ आमदारांना अपात्र करा, असा अर्ज राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे...

पुणे : शिवसेनेतील फुटीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकालपत्र सुस्पष्ट आहे. त्यांनी त्यावेळी झालेल्या सर्व गोष्टी बेकायदेशीर आणि घटनाबाह्य ठरवल्या; मात्र आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यासाठी कसलेही बंधन टाकले नाही, त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीचे प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्याचा निकाल येण्यास विलंब लागू शकतो, असे मत घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट यांनी व्यक्त केले.

प्रा. बापट म्हणाले, ‘‘आमदारांच्या अपात्रतेचा विषय तसेच ओरिजनल पक्ष कोणता यावर सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निकालपत्रात अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. विधिमंडळ पक्ष म्हणजे ओरिजनल पार्टी नाही, तर संघटना म्हणजेच मूळ पक्ष असे त्यात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ओरिजनल चिन्ह देताना तोच मूळ पक्ष असे निवडणूक आयोगाने गृहीत धरले ते न्यायालयाने चूक ठरवले आहे. यानुसार शरद पवार अध्यक्ष आणि जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस हाच मूळ पक्ष आहे. मात्र त्यांनी आयोगाकडे तसा दावा केला तर त्यालाही विलंब लागू शकतो.’’

पक्षांतरबंदी कायदा केला, त्याचे कारणच राजकीय भ्रष्टाचाराला आळा बसावा, लोकशाही मजबूत व्हावी यासाठी; मात्र त्याचाही दुरुपयोग होत आहे, असे म्हणता येईल. असेच चित्र सध्याच्या राजकीय घटना-घडामोडींवरून दिसते आहे, असे मत प्रा. बापट यांनी व्यक्त केले.

लवकर निर्णय शक्य नाही

मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या त्यांच्या ९ आमदारांना अपात्र करा, असा अर्ज राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. मात्र, अशा अर्जावर किती कालावधीत निर्णय घ्यावा याचे बंधन नाही, शिवसेनेतील फुटीच्या प्रकरणात अपात्रतेसंबंधीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असे सांगताना रिझनेबल टाईम असे म्हटले असले तरी विशिष्ट कालावधी दिलेला नाही, त्यामुळे राष्ट्रवादीच्या अर्जावर लवकर निर्णय लागणे शक्य नाही. कारण अजून शिवसेनेने अपात्रतेसंबंधी केलेल्या अर्जावर अद्याप निर्णय झालेला नाही, असेही प्रा. बापट म्हणाले.

लाेक घेतात ताेच निर्णय अंतिम :

आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विलंबाने, ओरिजनल पार्टीचा निर्णय विलंबाने असे होत असेल तर शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे आम्ही जनतेकडे जाऊ, हेच बरोबर आहे. कारण लोकशाहीत लोक घेतात तोच निर्णय अंतिम असतो, असेही प्रा. बापट म्हणाले.

मतदारच ठरवतील कोण चूक, कोण बरोबर :

शरद पवार यांचे बरोबर आहे असे कसे म्हणता? असे विचारले असता बापट यांनी सांगितले की, शरद पवार यांनी विचार करूनच तसे वक्तव्य केले असावे. सध्याच्या विधानसभेची मुदत संपण्यास साधारण वर्ष - सव्वा वर्षाचा कालावधी आहे. त्या वेळेत निकाल लागला नाही तर न्यायालयीन प्रक्रियेला काही अर्थच नाही, त्यात वेळ घालवण्याऐवजी जनतेत गेले तर जास्त चांगले. म्हणजे निवडणुकीत मतदारच कोण चूक, कोण बरोबर याचा निर्णय घेतील.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारCourtन्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालयSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस