शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

''ताे'' प्रस्ताव मान्य झाला असता तर पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना मिळाली असती मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 15:29 IST

पीएमपी कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्यूमुखी पडल्यास त्याच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी श्रद्धांजली फंडचा प्रस्ताव कर्मचाऱ्यांकडून ठेवण्यात आला हाेता. ताे प्रशासकीय पातळीवर अडकून पडला आहे.

पुणे : मुसळधार पावसामध्ये रस्त्यात बंद पडलेली बस दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या विजय नवघणे यांचा झाड सर्विस बसवर पडून मृत्यू झाला हाेता. पीएमपीच्या अनेक कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावत असताना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मदत व्हावी यासाठी पीएमपीचे कर्मचारी एकत्र येत त्यांनी श्रद्दांजली फंड सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवला हाेता. परंतु प्रशासकीय पातळीवर हा प्रस्ताव अडकल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे कुटुंब मदतीपासून वंचित राहिले आहे. 

पीएमपीएमएलच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारातून दर महिना 50 रुपये कापून ते श्रद्धांजली फंडामध्ये जमा करण्यात यावेत असा प्रस्ताव पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी ठेवला हाेता. पीएमपीचे जवळपास 10 हजार कर्मचारी आहेत. ज्या कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असताना मृत्यू हाेईल त्याला या श्रद्धांजली फंडातून मदत करण्यात यावी अशी यामागची भावना हाेती. यातून जवळपास पाच लाख रुपयांची मदत मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मिळणार हाेती. याबाबतचा प्रस्ताव पीएमपीच्या संघटनांकडून सहा महिन्यापूर्वी ठेवण्यात आला हाेता. या प्रस्तावाला जवळपास सर्वच संघटनांनी मान्यता दिली हाेती. परंतु हा प्रस्ताव प्रशासकीय पातळीवर अडकून पडला आहे. प्रशासनाकडून हाेत असलेल्या दिरंगाईमुळे अनेक कर्मचारी या मदतीपासून वंचित राहिले आहे. 

याबाबत बाेलताना राष्ट्रवादी महाराष्ट्र कामगार युनियनचे सरचिटणीस सुनील नलावडे म्हणाले, पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना तुलनेने पगार कमी आहे. एखाद्या कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. त्यामुळे कर्मचाऱ्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबियांना आधार मिळावा यासाठी श्रद्धांजली फंडचा प्रस्ताव ठेवण्यात आला हाेता. त्याला सर्वच संघटनांनी पाठिंबा दिला आहे. यात कर्मचाऱ्यांच्या पगारातून पन्नास रुपये कापून या फंडमध्ये जमा करण्यात येणार आहेत. यातून पाच लाख रुपयांपर्यंत मदत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना मिळणार आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असती तर अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मदत मिळाली असती. हा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केल्यापासून आत्तापर्यंत 17 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. प्रस्ताव मान्य झाला असता तर या 17 जणांच्या कुटुंबियांना मदत मिळाली असती. परंतु हा प्रस्ताव प्रशासकीय पातळीवर अजूनही अडकून पडला आहे. 

याबाबत पीएमपीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांच्याशी बाेलणे हाेऊ शकले नाही. 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलDeathमृत्यू