शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

''ताे'' प्रस्ताव मान्य झाला असता तर पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना मिळाली असती मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 15:29 IST

पीएमपी कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्यूमुखी पडल्यास त्याच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी श्रद्धांजली फंडचा प्रस्ताव कर्मचाऱ्यांकडून ठेवण्यात आला हाेता. ताे प्रशासकीय पातळीवर अडकून पडला आहे.

पुणे : मुसळधार पावसामध्ये रस्त्यात बंद पडलेली बस दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या विजय नवघणे यांचा झाड सर्विस बसवर पडून मृत्यू झाला हाेता. पीएमपीच्या अनेक कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावत असताना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मदत व्हावी यासाठी पीएमपीचे कर्मचारी एकत्र येत त्यांनी श्रद्दांजली फंड सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवला हाेता. परंतु प्रशासकीय पातळीवर हा प्रस्ताव अडकल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे कुटुंब मदतीपासून वंचित राहिले आहे. 

पीएमपीएमएलच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारातून दर महिना 50 रुपये कापून ते श्रद्धांजली फंडामध्ये जमा करण्यात यावेत असा प्रस्ताव पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी ठेवला हाेता. पीएमपीचे जवळपास 10 हजार कर्मचारी आहेत. ज्या कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असताना मृत्यू हाेईल त्याला या श्रद्धांजली फंडातून मदत करण्यात यावी अशी यामागची भावना हाेती. यातून जवळपास पाच लाख रुपयांची मदत मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मिळणार हाेती. याबाबतचा प्रस्ताव पीएमपीच्या संघटनांकडून सहा महिन्यापूर्वी ठेवण्यात आला हाेता. या प्रस्तावाला जवळपास सर्वच संघटनांनी मान्यता दिली हाेती. परंतु हा प्रस्ताव प्रशासकीय पातळीवर अडकून पडला आहे. प्रशासनाकडून हाेत असलेल्या दिरंगाईमुळे अनेक कर्मचारी या मदतीपासून वंचित राहिले आहे. 

याबाबत बाेलताना राष्ट्रवादी महाराष्ट्र कामगार युनियनचे सरचिटणीस सुनील नलावडे म्हणाले, पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना तुलनेने पगार कमी आहे. एखाद्या कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. त्यामुळे कर्मचाऱ्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबियांना आधार मिळावा यासाठी श्रद्धांजली फंडचा प्रस्ताव ठेवण्यात आला हाेता. त्याला सर्वच संघटनांनी पाठिंबा दिला आहे. यात कर्मचाऱ्यांच्या पगारातून पन्नास रुपये कापून या फंडमध्ये जमा करण्यात येणार आहेत. यातून पाच लाख रुपयांपर्यंत मदत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना मिळणार आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असती तर अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मदत मिळाली असती. हा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केल्यापासून आत्तापर्यंत 17 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. प्रस्ताव मान्य झाला असता तर या 17 जणांच्या कुटुंबियांना मदत मिळाली असती. परंतु हा प्रस्ताव प्रशासकीय पातळीवर अजूनही अडकून पडला आहे. 

याबाबत पीएमपीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांच्याशी बाेलणे हाेऊ शकले नाही. 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलDeathमृत्यू