शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

पाण्याचे राजकारण केल्यास त्यांना उघडे पाडू  : गिरीश बापट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 12:18 IST

पाणी हे नैसर्गिक संकट आहे. त्यावर कोणीही राजकारण करु नये..

ठळक मुद्देपाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत, असे आश्वासननिवडणुकीनंतर पाणी कपात चालू होणार नाहीभाजपाने विकासकामांवर लक्ष केंद्रित केले

पुणे : आपल्या भागात पुरेसा पाऊस पडला तर पाण्याचा प्रश्न उरत नाही. यावर्षी १९-२० टक्के कमी पाऊस पडला, याला पालकमंत्री जबाबदार नाहीत. यंदा धरणे भरल्यावर २१ टीएमसी पाणी उजनी धरणात सोडण्यात आले. मात्र, परतीचा पाऊस व्यवस्थित झाला नाही. पाणी हे नैसर्गिक संकट आहे. त्यावर कोणीही राजकारण करु नये. यावर कोणी राजकारण केल्यास आम्ही त्यांना उघडे पाडू, अशा शब्दांत भाजपचे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांनी विरोधकांवर निशाणा साधला. येत्या जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे निवडणूक झाल्यावर पुन्हा पाणी कपात होईल, या प्रचारात देखील तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  बापट (दि. ९) यांनी मंगळवारी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार विजय काळे, शिवसेनेचे प्रशांत बधे आदी यावेळी उपस्थित होते. ‘‘राज्याच्या राजकारणातून दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बापटांना खासदारपदाची उमेदवारी दिली’’, असा आरोप कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी ‘लोकमत’च्याच व्यासपीठावर केला होता. त्याचे खंडन करताना बापट म्हणाले, की इतर काहीच मुद्दे न मिळाल्यास स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुस-याचे पहायचे वाकून, अशी प्रवृत्ती काहीजणांमध्ये असते. त्यातूनच असे बालिश आरोप केले जातात. माझे आणि मुख्यमंत्र्यांचे घरोब्याचे संबंध आहेत. मी त्यांच्या आधीपासून निवडणूक लढवतो आहे. ज्या पक्षाचे आयुष्य कुरघोडी करण्यात गेले, त्यांनी असे आरोप करणे हास्यास्पद आहे.कॉंग्रेस-राष्ट्रवादीचीच स्थिती दयनीय झाली असल्याचा दावा बापट यांनी केला. ‘‘कॉंग्रेसला पुण्यात उमेदवार नव्हता. राष्ट्रवादीला मावळात उमेदवार मिळाला नाही. शिरुरमध्ये कॉंग्रेस आघाडीकडे उमेदवार नव्हता. राष्ट्रवादी हा पक्ष तर केवळ पवार कुटुंबापुरता उरला आहे,’’ असे ते म्हणाले. या निवडणुकीत भाजपा-शिवसेना-रिपाई महायुती पुणे जिल्ह्यातल्या चारही जागा जिंकेल, असा दावाही त्यांनी केला.  बापट म्हणाले, की गेल्या पाच वर्षांच्या काळात यापुर्वी कधी नव्हे इतका निधी राज्य सरकारने पुण्यासाठी दिला. चांदणी चौकातील पुलासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १९५ कोटी रुपये एका झटक्यात पुणे महानगरपालिकेला दिले. पुणे महापालिका एवढी वर्षे विरोधकांच्या हातात होती. मात्र त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडवला. आता मेट्रोची कामे जलदगतीने होत असल्याचे पुणेकर पाहात आहेत. 

 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPoliticsराजकारणBJPभाजपाgirish bapatगिरीष बापट