शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
2
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
3
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, चंद्रकांतदादांच्या 'त्या' व्हिडीओवर म्हणाली..
4
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
5
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
6
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
7
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
8
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
9
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
10
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
11
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
12
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
13
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
14
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
15
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
16
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
17
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
18
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
19
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
20
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत

पाण्याचे राजकारण केल्यास त्यांना उघडे पाडू  : गिरीश बापट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 12:18 IST

पाणी हे नैसर्गिक संकट आहे. त्यावर कोणीही राजकारण करु नये..

ठळक मुद्देपाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत, असे आश्वासननिवडणुकीनंतर पाणी कपात चालू होणार नाहीभाजपाने विकासकामांवर लक्ष केंद्रित केले

पुणे : आपल्या भागात पुरेसा पाऊस पडला तर पाण्याचा प्रश्न उरत नाही. यावर्षी १९-२० टक्के कमी पाऊस पडला, याला पालकमंत्री जबाबदार नाहीत. यंदा धरणे भरल्यावर २१ टीएमसी पाणी उजनी धरणात सोडण्यात आले. मात्र, परतीचा पाऊस व्यवस्थित झाला नाही. पाणी हे नैसर्गिक संकट आहे. त्यावर कोणीही राजकारण करु नये. यावर कोणी राजकारण केल्यास आम्ही त्यांना उघडे पाडू, अशा शब्दांत भाजपचे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांनी विरोधकांवर निशाणा साधला. येत्या जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे निवडणूक झाल्यावर पुन्हा पाणी कपात होईल, या प्रचारात देखील तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  बापट (दि. ९) यांनी मंगळवारी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार विजय काळे, शिवसेनेचे प्रशांत बधे आदी यावेळी उपस्थित होते. ‘‘राज्याच्या राजकारणातून दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बापटांना खासदारपदाची उमेदवारी दिली’’, असा आरोप कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी ‘लोकमत’च्याच व्यासपीठावर केला होता. त्याचे खंडन करताना बापट म्हणाले, की इतर काहीच मुद्दे न मिळाल्यास स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुस-याचे पहायचे वाकून, अशी प्रवृत्ती काहीजणांमध्ये असते. त्यातूनच असे बालिश आरोप केले जातात. माझे आणि मुख्यमंत्र्यांचे घरोब्याचे संबंध आहेत. मी त्यांच्या आधीपासून निवडणूक लढवतो आहे. ज्या पक्षाचे आयुष्य कुरघोडी करण्यात गेले, त्यांनी असे आरोप करणे हास्यास्पद आहे.कॉंग्रेस-राष्ट्रवादीचीच स्थिती दयनीय झाली असल्याचा दावा बापट यांनी केला. ‘‘कॉंग्रेसला पुण्यात उमेदवार नव्हता. राष्ट्रवादीला मावळात उमेदवार मिळाला नाही. शिरुरमध्ये कॉंग्रेस आघाडीकडे उमेदवार नव्हता. राष्ट्रवादी हा पक्ष तर केवळ पवार कुटुंबापुरता उरला आहे,’’ असे ते म्हणाले. या निवडणुकीत भाजपा-शिवसेना-रिपाई महायुती पुणे जिल्ह्यातल्या चारही जागा जिंकेल, असा दावाही त्यांनी केला.  बापट म्हणाले, की गेल्या पाच वर्षांच्या काळात यापुर्वी कधी नव्हे इतका निधी राज्य सरकारने पुण्यासाठी दिला. चांदणी चौकातील पुलासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १९५ कोटी रुपये एका झटक्यात पुणे महानगरपालिकेला दिले. पुणे महापालिका एवढी वर्षे विरोधकांच्या हातात होती. मात्र त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडवला. आता मेट्रोची कामे जलदगतीने होत असल्याचे पुणेकर पाहात आहेत. 

 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPoliticsराजकारणBJPभाजपाgirish bapatगिरीष बापट