शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

आवश्यकताच असेल तर बारामती विमानतळाचे विस्तारीकरण करा; दानवेंचा अजित पवारांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 13:09 IST

पुरंदरला विमानतळाची आवश्यकता नसून विनाकारण शेतकऱ्यांच्या सुपीक आणि पिकाऊ जमिनी बळकावून हे विमानतळ करू नये

सासवड : पुण्याचे विमानतळ येथून ३६ किलोमीटर असताना येथे विमानतळाची काय आवश्यकता. विमानतळाची आवश्यकताच असेल तर बारामती येथे विमानतळ असून त्याचे विस्तारीकरण करण्यात यावे. कारण बारामतीकरांना मोदी-शहांना रात्री अपरात्री भेटावयास जावे लागते, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

पुरंदरला विमानतळाची आवश्यकता नसून विनाकारण शेतकऱ्यांच्या सुपीक आणि पिकाऊ जमिनी बळकावून हे विमानतळ करू नये. शासनाने हा निर्णय रद्द करावा, ज्यांनी लोढा, अग्रवाल, यांना जमीन दिल्याने मंत्रालयात बसून विमानतळाचे काम सुरू आहे. जमीन खरेदी करणारी टोळी असून पैसे घेऊन जमिनी खरेदी करायची आणि मंत्रालयात बसून प्रकल्प आणायचे. तुम्हाला फार हौस असेल तर बारामतीचा विमानतळ विस्तारित करा आणि त्याचा वापर करा, अशी भूमिका यावेळी विमानतळबाधित शेतकऱ्यांसमोर बोलताना मांडली.

पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित कुंभारवळण गावच्या अंजना कामथे यांचे विमानतळाच्या धक्क्याने शनिवारी निधन झाले. त्यानंतर पोलिस आणि शेतकरी यांच्यात मोठ्या प्रमाणात धूमश्चक्री झाली. पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात अनेक शेतकरी जखमी झाले, तर अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. या घटनेचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले. सरकारला विमानतळ जागेचा सर्व्हे स्थगित करावा लागला. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कुंभारवळण येथे त्यांच्या घरी जाऊन कामथे कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सरकारवर तुफान हल्लाबोल केला. 

टॅग्स :PuneपुणेAmbadas Danweyअंबादास दानवेAjit Pawarअजित पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBaramatiबारामतीAirportविमानतळPurandarपुरंदरShiv Senaशिवसेना