शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

आवश्यकताच असेल तर बारामती विमानतळाचे विस्तारीकरण करा; दानवेंचा अजित पवारांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 13:09 IST

पुरंदरला विमानतळाची आवश्यकता नसून विनाकारण शेतकऱ्यांच्या सुपीक आणि पिकाऊ जमिनी बळकावून हे विमानतळ करू नये

सासवड : पुण्याचे विमानतळ येथून ३६ किलोमीटर असताना येथे विमानतळाची काय आवश्यकता. विमानतळाची आवश्यकताच असेल तर बारामती येथे विमानतळ असून त्याचे विस्तारीकरण करण्यात यावे. कारण बारामतीकरांना मोदी-शहांना रात्री अपरात्री भेटावयास जावे लागते, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

पुरंदरला विमानतळाची आवश्यकता नसून विनाकारण शेतकऱ्यांच्या सुपीक आणि पिकाऊ जमिनी बळकावून हे विमानतळ करू नये. शासनाने हा निर्णय रद्द करावा, ज्यांनी लोढा, अग्रवाल, यांना जमीन दिल्याने मंत्रालयात बसून विमानतळाचे काम सुरू आहे. जमीन खरेदी करणारी टोळी असून पैसे घेऊन जमिनी खरेदी करायची आणि मंत्रालयात बसून प्रकल्प आणायचे. तुम्हाला फार हौस असेल तर बारामतीचा विमानतळ विस्तारित करा आणि त्याचा वापर करा, अशी भूमिका यावेळी विमानतळबाधित शेतकऱ्यांसमोर बोलताना मांडली.

पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित कुंभारवळण गावच्या अंजना कामथे यांचे विमानतळाच्या धक्क्याने शनिवारी निधन झाले. त्यानंतर पोलिस आणि शेतकरी यांच्यात मोठ्या प्रमाणात धूमश्चक्री झाली. पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात अनेक शेतकरी जखमी झाले, तर अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. या घटनेचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले. सरकारला विमानतळ जागेचा सर्व्हे स्थगित करावा लागला. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कुंभारवळण येथे त्यांच्या घरी जाऊन कामथे कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सरकारवर तुफान हल्लाबोल केला. 

टॅग्स :PuneपुणेAmbadas Danweyअंबादास दानवेAjit Pawarअजित पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBaramatiबारामतीAirportविमानतळPurandarपुरंदरShiv Senaशिवसेना