शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारने देशच उध्वस्त करायचा ठरवलं असेल तर काय करणार? सहकार मंत्रालयाच्या स्थापनेवरून नाना पटोलेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 15:10 IST

केंद्रातील मोदी सरकारने सहकार मंत्रालय स्थापन केले आहे. मात्र, त्यांना सहकाराची एबीसीडी माहिती नाही.

पुणे : केंद्रातील मोदी सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार सोहळा नुकताच झाला आहे. त्यामध्ये ४३ जणांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचसोबत केंद्र सरकारने नवीन सहकार मंत्रालयाची निर्मिती केली असून त्याची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

पुण्यात काँग्रेस नेते नाना पटोलेपुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पटोले यांनी यावेळी विविध चालू घडामोडींवर भाष्य केले. सहकार मंत्रालयाच्या स्थापनेवर भाष्य करताना पटोले म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारने सहकार मंत्रालय स्थापन केले आहे. मात्र त्यांना सहकाराची एबीसीडी माहिती नाही. कदाचित सहकार क्षेत्राची व्यवस्था उध्वस्त करायची म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असावा. आधीपासूनच ते देशातील अनेक व्यवस्था ते उध्वस्त करत आहेतच. आणि मोदी सरकारने जर देशच उध्वस्त करायचा ठरवलं असेल तर काय करणार? असेही ते म्हणाले. 

तसेच मुख्यमंत्री उद्गाराव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी व कार्यकर्त्यांना शिवसेना बळकट करत स्थानिक स्वराज्य संस्थांसह महापालिकांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा या सूचनेवर पटोले यांनी प्रतिकिया देताना म्हणाले, शिवसेना प्रमुखांनी तयारी कराअसे जर सांगितले असेल तर त्यात वाईट काय? मात्र, याचा अर्थ मध्यावधी निवडणुका होतील असा नाही. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे.

काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद  मिळाले नाही यावर बोलताना पटोले यांनी राज्य सरकारने आयोजित करण्यात आलेले हे पावसाळी अधिवेशन दोनच दिवसांचे होते असे सांगितले. पण आमच्या महाविकास आघाडी सरकारचे इंजिन पण आणि ड्रायव्हरपण चांगले आहे असेही पटोले यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेNana Patoleनाना पटोलेCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस