शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

Exclusive Interview: 'मविआ' एकत्र लढली तर पुणे महापालिकेवरही आघाडीची सत्ता येईल; रवींद्र धंगेकरांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 16:14 IST

महाराष्ट्रात आताच्या सरकारने लोकांचे जीव घेण्याचं काम सुरु केलं आहे

पुणे: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कसबा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत रवींद्र धंगेकर यांनी इतिहास घडवला. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा फडकवून विजय मिळवला. कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात चुरशीची लढत झाली. या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले होते. दोन्ही पक्षाचे दिग्गज नेते या निवडणुकीच्या प्रचारासाठी पुण्यात येऊन गेले. भाजपचे पदाधिकारी तर १०० टक्के आमचाच विजय होईल असा विश्वास व्यक्त करत होते. पण अखेर रवींद्र यांच्या माध्यमातून कसबा विधानसभेत महाविकास आघाडीची सत्ता आली. 

रवींद्र धंगेकर निवडून आल्यावर नागरिकांच्या तोंडी मदतीला धावून येणारा माणूस, गोरगरिबांचा कर्ताधर्ता, अशा प्रतिक्रिया येत होत्या. अनेकांनी तर आता कसब्याचा विकास होणारच असे मतही व्यक्त केले. अशातच रवींद्र धंगेकर यांनी महाविकास आघाडी एकत्र लढली तर पुणे महालिकेवरही आघाडीची सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. पोटनिवडणुकीच्या विजयानंतर लोकमत डिजिटलला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.     

धंगेकर म्हणाले, देशात, राज्यात राजकारण बदलत चालल आहे. आपल्या महाराष्ट्रात तर या सरकारने लोकांचे जीव घेण्याचं काम सुरु केलं आहे. अशा परिस्थितीत एकत्र राहणं गरजेचे आहे. आताही महाविकास आघाडी एकत्र लढण्याचा फायदा आम्हाला झाला. येत्या काही दिवसात महापालिका निवडणुका येणार आहेत. त्यावेळीही महाविकास आघाडी एकत्र लढली तर पुणे महापालिकेवर आघाडीची सत्ता येईल. 

आमदार झाल्यावर पुढील रणनीती कशी असणार असे विचारले असता धंगेकर म्हणाले, आता स्वतः आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या मतदार संघातील लोकांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर आपल्या कामाचे प्राधान्य ठरवणार आहे.  

मुक्ताताईंशी जवळचे नाते 

 मुक्ताताई आणि मी १५ वर्षे एकत्र काम करतोय. स्मार्ट सिटी, महापालिकेतील कामे करताना आम्ही एकत्र होतो. मला कुठल्याही कामात अडचण आल्यास मार्गदर्शनासाठी मी मुक्ता ताईंकडे जात असे. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदराची भावना होती. टिळक दाम्पत्यांचे नेतृत्व त्या करत होत्या. टिळकांचा वारसा मुक्ताताईंनी पुढे नेला होता. म्हणूनच मी निवडून आल्यावर टिळक कुटुंबियांच्या भेटीला गेलो. तसेच मुक्ताताईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुढील कामासाठी त्यांचा आशीर्वाद घेतला. 

म्हणून मला उपोषणाला बसावं लागलं 

निवडणुकीच्या प्रचाराची वेळ संपल्यावरही चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस लोकंना भेटत होते. हे पोलिसांना माहीत असूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. मात्र माझ्यावर गुन्हा दाखल होतो. यावरून असे स्पष्ट होते की, पोलीस त्यांच्या बाजूने आहेत. मग आपण साधी माणसं कोणाकडे जाणार. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर हुकूमशाही केली मग उपोषणाला बसावं लागलं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटले हे पोलिसांना आणि निवडणूक आयोगाला माहित होते. त्यावेळी निवडणूक आयोगाने त्यांना नोटीसही दिली नाही उलट मलाच दिली. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रVotingमतदानElectionनिवडणूक