शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

Exclusive Interview: 'मविआ' एकत्र लढली तर पुणे महापालिकेवरही आघाडीची सत्ता येईल; रवींद्र धंगेकरांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 16:14 IST

महाराष्ट्रात आताच्या सरकारने लोकांचे जीव घेण्याचं काम सुरु केलं आहे

पुणे: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कसबा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत रवींद्र धंगेकर यांनी इतिहास घडवला. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा फडकवून विजय मिळवला. कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात चुरशीची लढत झाली. या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले होते. दोन्ही पक्षाचे दिग्गज नेते या निवडणुकीच्या प्रचारासाठी पुण्यात येऊन गेले. भाजपचे पदाधिकारी तर १०० टक्के आमचाच विजय होईल असा विश्वास व्यक्त करत होते. पण अखेर रवींद्र यांच्या माध्यमातून कसबा विधानसभेत महाविकास आघाडीची सत्ता आली. 

रवींद्र धंगेकर निवडून आल्यावर नागरिकांच्या तोंडी मदतीला धावून येणारा माणूस, गोरगरिबांचा कर्ताधर्ता, अशा प्रतिक्रिया येत होत्या. अनेकांनी तर आता कसब्याचा विकास होणारच असे मतही व्यक्त केले. अशातच रवींद्र धंगेकर यांनी महाविकास आघाडी एकत्र लढली तर पुणे महालिकेवरही आघाडीची सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. पोटनिवडणुकीच्या विजयानंतर लोकमत डिजिटलला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.     

धंगेकर म्हणाले, देशात, राज्यात राजकारण बदलत चालल आहे. आपल्या महाराष्ट्रात तर या सरकारने लोकांचे जीव घेण्याचं काम सुरु केलं आहे. अशा परिस्थितीत एकत्र राहणं गरजेचे आहे. आताही महाविकास आघाडी एकत्र लढण्याचा फायदा आम्हाला झाला. येत्या काही दिवसात महापालिका निवडणुका येणार आहेत. त्यावेळीही महाविकास आघाडी एकत्र लढली तर पुणे महापालिकेवर आघाडीची सत्ता येईल. 

आमदार झाल्यावर पुढील रणनीती कशी असणार असे विचारले असता धंगेकर म्हणाले, आता स्वतः आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या मतदार संघातील लोकांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर आपल्या कामाचे प्राधान्य ठरवणार आहे.  

मुक्ताताईंशी जवळचे नाते 

 मुक्ताताई आणि मी १५ वर्षे एकत्र काम करतोय. स्मार्ट सिटी, महापालिकेतील कामे करताना आम्ही एकत्र होतो. मला कुठल्याही कामात अडचण आल्यास मार्गदर्शनासाठी मी मुक्ता ताईंकडे जात असे. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदराची भावना होती. टिळक दाम्पत्यांचे नेतृत्व त्या करत होत्या. टिळकांचा वारसा मुक्ताताईंनी पुढे नेला होता. म्हणूनच मी निवडून आल्यावर टिळक कुटुंबियांच्या भेटीला गेलो. तसेच मुक्ताताईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुढील कामासाठी त्यांचा आशीर्वाद घेतला. 

म्हणून मला उपोषणाला बसावं लागलं 

निवडणुकीच्या प्रचाराची वेळ संपल्यावरही चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस लोकंना भेटत होते. हे पोलिसांना माहीत असूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. मात्र माझ्यावर गुन्हा दाखल होतो. यावरून असे स्पष्ट होते की, पोलीस त्यांच्या बाजूने आहेत. मग आपण साधी माणसं कोणाकडे जाणार. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर हुकूमशाही केली मग उपोषणाला बसावं लागलं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटले हे पोलिसांना आणि निवडणूक आयोगाला माहित होते. त्यावेळी निवडणूक आयोगाने त्यांना नोटीसही दिली नाही उलट मलाच दिली. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रVotingमतदानElectionनिवडणूक