शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

Exclusive Interview: 'मविआ' एकत्र लढली तर पुणे महापालिकेवरही आघाडीची सत्ता येईल; रवींद्र धंगेकरांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 16:14 IST

महाराष्ट्रात आताच्या सरकारने लोकांचे जीव घेण्याचं काम सुरु केलं आहे

पुणे: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कसबा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत रवींद्र धंगेकर यांनी इतिहास घडवला. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा फडकवून विजय मिळवला. कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात चुरशीची लढत झाली. या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले होते. दोन्ही पक्षाचे दिग्गज नेते या निवडणुकीच्या प्रचारासाठी पुण्यात येऊन गेले. भाजपचे पदाधिकारी तर १०० टक्के आमचाच विजय होईल असा विश्वास व्यक्त करत होते. पण अखेर रवींद्र यांच्या माध्यमातून कसबा विधानसभेत महाविकास आघाडीची सत्ता आली. 

रवींद्र धंगेकर निवडून आल्यावर नागरिकांच्या तोंडी मदतीला धावून येणारा माणूस, गोरगरिबांचा कर्ताधर्ता, अशा प्रतिक्रिया येत होत्या. अनेकांनी तर आता कसब्याचा विकास होणारच असे मतही व्यक्त केले. अशातच रवींद्र धंगेकर यांनी महाविकास आघाडी एकत्र लढली तर पुणे महालिकेवरही आघाडीची सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. पोटनिवडणुकीच्या विजयानंतर लोकमत डिजिटलला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.     

धंगेकर म्हणाले, देशात, राज्यात राजकारण बदलत चालल आहे. आपल्या महाराष्ट्रात तर या सरकारने लोकांचे जीव घेण्याचं काम सुरु केलं आहे. अशा परिस्थितीत एकत्र राहणं गरजेचे आहे. आताही महाविकास आघाडी एकत्र लढण्याचा फायदा आम्हाला झाला. येत्या काही दिवसात महापालिका निवडणुका येणार आहेत. त्यावेळीही महाविकास आघाडी एकत्र लढली तर पुणे महापालिकेवर आघाडीची सत्ता येईल. 

आमदार झाल्यावर पुढील रणनीती कशी असणार असे विचारले असता धंगेकर म्हणाले, आता स्वतः आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या मतदार संघातील लोकांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर आपल्या कामाचे प्राधान्य ठरवणार आहे.  

मुक्ताताईंशी जवळचे नाते 

 मुक्ताताई आणि मी १५ वर्षे एकत्र काम करतोय. स्मार्ट सिटी, महापालिकेतील कामे करताना आम्ही एकत्र होतो. मला कुठल्याही कामात अडचण आल्यास मार्गदर्शनासाठी मी मुक्ता ताईंकडे जात असे. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदराची भावना होती. टिळक दाम्पत्यांचे नेतृत्व त्या करत होत्या. टिळकांचा वारसा मुक्ताताईंनी पुढे नेला होता. म्हणूनच मी निवडून आल्यावर टिळक कुटुंबियांच्या भेटीला गेलो. तसेच मुक्ताताईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुढील कामासाठी त्यांचा आशीर्वाद घेतला. 

म्हणून मला उपोषणाला बसावं लागलं 

निवडणुकीच्या प्रचाराची वेळ संपल्यावरही चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस लोकंना भेटत होते. हे पोलिसांना माहीत असूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. मात्र माझ्यावर गुन्हा दाखल होतो. यावरून असे स्पष्ट होते की, पोलीस त्यांच्या बाजूने आहेत. मग आपण साधी माणसं कोणाकडे जाणार. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर हुकूमशाही केली मग उपोषणाला बसावं लागलं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटले हे पोलिसांना आणि निवडणूक आयोगाला माहित होते. त्यावेळी निवडणूक आयोगाने त्यांना नोटीसही दिली नाही उलट मलाच दिली. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रVotingमतदानElectionनिवडणूक