शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

आठ बाय दहा च्या खोलीत राहिल्याने पूरग्रस्तांच्या प्रश्नांची जाण : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 20:48 IST

कोथरूड विधानसभा मतदार संघ व पानशेत पूरग्रस्त समिती यांच्या संयुक्त विद्यामाने पूरग्रस्ताचे प्रलंबित प्रश्न सोडविल्याबद्दल महसूल व मदत पूर्नवसन मंत्री चंद्रकांत पाटील व पुर्नवसन व पुर्नस्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्यांनी अापल्या अाठवणींना उजाळा दिला.

पुणे : मी स्वत: वडील, सख्खी, सावत्र आई आणि सात बहिणी असे तब्बल अकरा लोकांचे कुटुंब मुंबईत आठ बाय दहाच्या खोलीत अनेक वर्षे राहिलो आहे. आमच्याकडे पाहुणे आल्यानंतर तुम्ही कसे झोपता असा प्रश्न करत, असे भावनीक होत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पानशेत पूरग्रस्त १० बाय १२ च्या खोलीत कसे राहत असतील यांची पूर्ण जाणीव आपल्या असल्याचे सांगितले. यामुळेच पानशेतसह संपूर्ण राज्यातील विविध प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपला पुढाकार असल्याचे त्यांनी येथे स्पष्ट केले.

    कोथरूड विधानसभा मतदार संघ व पानशेत पूरग्रस्त समिती यांच्या संयुक्त विद्यामाने पूरग्रस्ताचे प्रलंबित प्रश्न सोडविल्याबद्दल महसूल व मदत पूर्नवसन मंत्री चंद्रकांत पाटील व पुर्नवसन व पुर्नस्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी , नगरसेविका माधुरी सहस्रबुधे , मंजुषा खर्डेकर, जंयत भावे, दिपक पोटे, राजेंद्र शिळिमकर, पुरग्रस्ताचे प्रश्न सोडविणारे मंगेश खराटे यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना पाटील यांनी सांगितले की, राज्यात सत्तेवर आल्यावर प्रथम आपल्याला पाच वर्षांत काय-काय कामे करायचे हे निश्चित केले व तसे लिहून देखील काढले. यामध्ये राज्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे हे एक काम होते. काही प्रश्न मार्गी देखील लावले. 

    आमचे सरकार सर्वसामान्याचे सरकार असून, त्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही गेल्या चार वर्षांत अनेक निर्णय घेतले. यामध्ये सर्वसामान्यांसाठी जाचक असलेले अनेक ब्रिटीश कालीन कायदे रद्द केले.  आकारी पड जमीन, क्लास वनच्या जमिनीचे क्लास टूमघ्ये रुपातर, गावठाण हद्द वाढीचा निर्णय अनेक निर्णय घेतले. यामध्ये सध्या राज्यातील अनेक प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनी देणे शक्य नाही. यामुळे सध्याच्या दरानुसार तब्बल पाच पट अधिक पैसे देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला असून, यासाठी तब्बल १ लाख कोटी रुपयांचा भूर्दंड शासनाला सहन करावा लागणार आहे. कायदे करण्यासाठी आपण शासना सोबत भांडतो, परंतु कायदे झाल्यानंतर ते पाळण्याची जबाबदारी देखील आपली असल्याचे त्यांनी येथे स्पष्ट केले. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कोपरे, शिवणेचा प्रश्न देखील सोडविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे पाटील यांनी येथे स्पष्ट केले. २५ वर्षांनंतरही किल्लारी भूकंपग्रस्त उपेक्षितकिल्लारी भूकंपग्रस्ताचे अनेक प्रश्न २५ वर्षांनंतर देखील सुटलेले नाहीत. त्यावेळी राज्याचे सत्ताकेंद्र पुण्यात होते. त्यांना देखील हे प्रश्न मार्गी लावता आले नाही. असा टोला पुर्नवसन व पुर्नस्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचे नाव न घेता लावला. परंतु गेल्या चार वर्षांत राज्यात सत्तेवर आलेल्या भारतीय जनात पक्षाने प्रकल्पग्रस्ताचे अनेक प्रश्न मार्गी लावले असून, आगामी काळात देखील अधिकाधिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाnewsबातम्या