शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

आठ बाय दहा च्या खोलीत राहिल्याने पूरग्रस्तांच्या प्रश्नांची जाण : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 20:48 IST

कोथरूड विधानसभा मतदार संघ व पानशेत पूरग्रस्त समिती यांच्या संयुक्त विद्यामाने पूरग्रस्ताचे प्रलंबित प्रश्न सोडविल्याबद्दल महसूल व मदत पूर्नवसन मंत्री चंद्रकांत पाटील व पुर्नवसन व पुर्नस्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्यांनी अापल्या अाठवणींना उजाळा दिला.

पुणे : मी स्वत: वडील, सख्खी, सावत्र आई आणि सात बहिणी असे तब्बल अकरा लोकांचे कुटुंब मुंबईत आठ बाय दहाच्या खोलीत अनेक वर्षे राहिलो आहे. आमच्याकडे पाहुणे आल्यानंतर तुम्ही कसे झोपता असा प्रश्न करत, असे भावनीक होत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पानशेत पूरग्रस्त १० बाय १२ च्या खोलीत कसे राहत असतील यांची पूर्ण जाणीव आपल्या असल्याचे सांगितले. यामुळेच पानशेतसह संपूर्ण राज्यातील विविध प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपला पुढाकार असल्याचे त्यांनी येथे स्पष्ट केले.

    कोथरूड विधानसभा मतदार संघ व पानशेत पूरग्रस्त समिती यांच्या संयुक्त विद्यामाने पूरग्रस्ताचे प्रलंबित प्रश्न सोडविल्याबद्दल महसूल व मदत पूर्नवसन मंत्री चंद्रकांत पाटील व पुर्नवसन व पुर्नस्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी , नगरसेविका माधुरी सहस्रबुधे , मंजुषा खर्डेकर, जंयत भावे, दिपक पोटे, राजेंद्र शिळिमकर, पुरग्रस्ताचे प्रश्न सोडविणारे मंगेश खराटे यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना पाटील यांनी सांगितले की, राज्यात सत्तेवर आल्यावर प्रथम आपल्याला पाच वर्षांत काय-काय कामे करायचे हे निश्चित केले व तसे लिहून देखील काढले. यामध्ये राज्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे हे एक काम होते. काही प्रश्न मार्गी देखील लावले. 

    आमचे सरकार सर्वसामान्याचे सरकार असून, त्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही गेल्या चार वर्षांत अनेक निर्णय घेतले. यामध्ये सर्वसामान्यांसाठी जाचक असलेले अनेक ब्रिटीश कालीन कायदे रद्द केले.  आकारी पड जमीन, क्लास वनच्या जमिनीचे क्लास टूमघ्ये रुपातर, गावठाण हद्द वाढीचा निर्णय अनेक निर्णय घेतले. यामध्ये सध्या राज्यातील अनेक प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनी देणे शक्य नाही. यामुळे सध्याच्या दरानुसार तब्बल पाच पट अधिक पैसे देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला असून, यासाठी तब्बल १ लाख कोटी रुपयांचा भूर्दंड शासनाला सहन करावा लागणार आहे. कायदे करण्यासाठी आपण शासना सोबत भांडतो, परंतु कायदे झाल्यानंतर ते पाळण्याची जबाबदारी देखील आपली असल्याचे त्यांनी येथे स्पष्ट केले. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कोपरे, शिवणेचा प्रश्न देखील सोडविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे पाटील यांनी येथे स्पष्ट केले. २५ वर्षांनंतरही किल्लारी भूकंपग्रस्त उपेक्षितकिल्लारी भूकंपग्रस्ताचे अनेक प्रश्न २५ वर्षांनंतर देखील सुटलेले नाहीत. त्यावेळी राज्याचे सत्ताकेंद्र पुण्यात होते. त्यांना देखील हे प्रश्न मार्गी लावता आले नाही. असा टोला पुर्नवसन व पुर्नस्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचे नाव न घेता लावला. परंतु गेल्या चार वर्षांत राज्यात सत्तेवर आलेल्या भारतीय जनात पक्षाने प्रकल्पग्रस्ताचे अनेक प्रश्न मार्गी लावले असून, आगामी काळात देखील अधिकाधिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाnewsबातम्या