शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

प्रसिद्धीसाठी मी देवदर्शनाला जात नाही ;शरद पवारांचा अमित शाहंना अप्रत्यक्ष टाेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 20:52 IST

प्रसिध्दीसाठी मी देवदर्शनाला जात नाही. मला कोणत्याही गोष्टीचे अवडंबर करायला आवडत नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अमित शाहंचा नामोल्लेख टाळत अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

पुणे : मी कधीच वारीला जात नाही, मात्र वारीचा अनादरही करत नाही. काही कामानिमित्त सोलापूर भागात गेलो तर मोजक्या लोकांसह पंढरपूरला जाऊन विठोबाचे दर्शन घेतो. दुस-या दिवशी वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रांमध्ये फोटो यावा, अशी कधीच अपेक्षा नसते. प्रसिध्दीसाठी मी देवदर्शनाला जात नाही. मला कोणत्याही गोष्टीचे अवडंबर करायला आवडत नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अमित शाहंचा नामोल्लेख टाळत अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

राष्ट्र सेवा दलातर्फे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते शामसुंदर महाराज सोन्नर लिखित 'उजळावया आलो वाटा' या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी एस.एम.जोशी सभागृहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पवार बोलत होते. याप्रसंगी तुकाराम महाराजांचे वंशज बापूसाहेब महाराज देहूकर, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयाचे मुख्य चोपदार राजाभाऊ चोपदार, सुभाष वारे, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त प्रकाश परांजपे, महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘सध्या टीव्ही, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टी समोर येतात. हा विज्ञानाचा चमत्कार असला तरी पुढील पिढी तंत्रज्ञानाचा वापर योग्य पध्दतीने कसा करेल, ही बाब चिंताजनक बनली आहे. देशाच्या, समाजाच्या हिताच्या गोष्टी, विचार यातून पुढे यायल्या हव्यात. पूर्वीच्या काळी अशी कोणतीही माध्यमे उपलब्ध नसताना किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन झाले. विठोबाच्या दर्शनाने सामान्य माणूस, शेतक-यांना मानसिक, वैचारिक, बौध्दिक आधार आणि आत्मविश्वास मिळतो. नामदेवांनी संतपरंपरेचा विचार देशात सर्वदूर पोहोचवला. शेतक-यांमध्ये किर्तनातून आत्मविश्वास जागवण्याची, धर्मकांड करणा-या प्रवृत्तीच्या आहारी न जाता संतविचार मनावर ठसवण्याची नितांत गरज आहे.’ आजही स्त्रियांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदललेला नाही. कर्तृत्व ही केवळ पुरुषांची मक्तेदारी नाही. स्त्रीसुध्दा तितकीच कर्तृत्ववान आहे. स्त्रीची महती संतांनी किर्तनातून अनेक वर्षांपूर्वी अधोरेखित केली.

देहूकर म्हणाले, ‘संतांनी देव जगवला आणि समाज जागवला. आम्ही मनूस्मृतीला नावे ठेवत नाही; मात्र आद्यक्रांतीचे जनक संतच आहेत, यात शंका नाही. तुकाराम महाराजांना त्या काळातही लोकशाही अभिप्रेत होती. ज्यांनी गाथा वाचली, तो माणूस कधीच आत्महत्या करणार नाही. संताकडे दूरदृष्टी, सुधारणेची दृष्टी होती. समग्रतेचा विचार सांगितला. चांगल्या संस्कारांचा दुष्काळ पडला तर मानवता मरेल. तेच संस्कार, विचार जिवंत ठेवले तर मानवता जिवंत राहील.

 दरम्यान 'नवसाकारणे होती पुत्र तर का करणे लगे पती' असं सांगत संत तुकाराम महाराजांनी 400 वर्षांपूर्वी अंधश्रध्दा निर्मूलनाचे काम केले, याचे उदाहरण तुकाराम महाराजांचे वंशज पुण्यातील कार्यक्रमात व्यासपीठावरून देत होते. त्यावेळी 'आंबे खाऊन मुले होतात', असा टोमणा शरद पवारांनी संभाजी भिडेंचे नाव न घेता लगावला.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारAmit Shahअमित शाहsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी