शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्या जीवनातील समस्या मी सोडवू शकत नाही", तलावात उडी मारून तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 11:52 IST

आई, बाबा, आजी,आजोबा आणि भक्ती मला माफ कर मी जगण्याचा खूप प्रयत्न केला, पण काय करू प्राँब्लेम घेऊन मी नाही जगू शकत म्हणून मी शेवटचा निर्णय घेतला असा मेसेज करुन एका तरुणाने कात्रज येथील भिलारेवाडी तलावात उडी मारुन आत्महत्या केली

धनकवडी/पुणे  : आई, बाबा, आजी,आजोबा आणि भक्ती मला माफ कर मी जगण्याचा खूप प्रयत्न केला, पण काय करू प्राँब्लेम घेऊन मी नाही जगू शकत म्हणून मी शेवटचा निर्णय घेतला, असा मेसेज करुन एका तरुणाने कात्रज येथील भिलारेवाडी तलावात उडी मारुन आत्महत्या केली. अग्निशामन दलाच्या जवानाने आज सकाळी ९ वाजल्या सुमारास तलावातून या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. 

जीवनात आलेल्या नैराश्यातून २३ वर्षीय युवकाने कात्रज भिलारेवाडी येथील तलावात उडी मारून आत्महत्या केली असून आत्महत्या करण्यापुर्वी त्याने घरच्यांना मेसेज केला होता. ही घटना सोमवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. शंकर बसवराज कलशेट्टी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. कात्रज अग्निशामक केंद्रातील जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला असून शिवविच्छेदन रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शंकर ने रविवारी रात्री उशिरा घरच्याना मी आत्महत्या करत असल्याचा मेसेज केला होता. मेसेज पाहताच घरातील सदस्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेतली, भारती विद्यापीठ पोलिसांनी रात्री दीड दोन वाजेपर्यंत तपास केला. दरम्यान रविवारी सकाळी पुन्हा तपास केला असता भिलारेवाडी तलावाजवळ चप्पल दिसल्याने पोलिसांनी कात्रज अग्निशामन केंद्राला कळविले. कात्रज अग्निशामक केंद्रातील जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि काही वेळातच तरुणाचा मृत्यूदेह बाहेर काढला. शंकर ने आत्महत्या करण्यापूर्वी ब्लेडने हाताची नस कापली होती.

म्हणून मी शेवटचा निर्णय घेतला

माझ्या जीवनात काही समस्या आहेत, आणि त्या मी सोडवू शकत नाही आणि त्या समस्या संपतही नाहीत त्या फक्त वाढतच आहेत. या सर्व समस्या कोणासोबत शेअर करणे सुद्धा अपमानास्पद वाटते. या सर्व समस्या घेउन मी जगूही शकत नाही. काही दिवसांनी या समस्या अजूनही वाढत जाणार, मी सहन करू शकत नाही. अगोदरच खुप त्रास सहन केला आहे. आता आजिबात सहन होत नाही. म्हणून मी माझ्या स्वत: च्या इच्छेने माझे जीवन संपवत आहे. माझ्या आत्महत्यास कोणालाही जबाबदार धरू नये. पोलिसांनी कोणाचीही विचारपूस करण्याची गरज नाही. आई, बाबा, आजी,आजोबा आणि भक्ती मला माफ कर मी जगण्याचा खूप प्रयत्न केला़ पण काय करू प्राँब्लेम घेऊन मी नाही जगू शकत म्हणून मी शेवटचा निर्णय घेतला असा मेसेज करून शंकर ने आत्महत्या केली.

टॅग्स :DhankawadiधनकवडीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूFire Brigadeअग्निशमन दल