शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

"माझ्या जीवनातील समस्या मी सोडवू शकत नाही", तलावात उडी मारून तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 11:52 IST

आई, बाबा, आजी,आजोबा आणि भक्ती मला माफ कर मी जगण्याचा खूप प्रयत्न केला, पण काय करू प्राँब्लेम घेऊन मी नाही जगू शकत म्हणून मी शेवटचा निर्णय घेतला असा मेसेज करुन एका तरुणाने कात्रज येथील भिलारेवाडी तलावात उडी मारुन आत्महत्या केली

धनकवडी/पुणे  : आई, बाबा, आजी,आजोबा आणि भक्ती मला माफ कर मी जगण्याचा खूप प्रयत्न केला, पण काय करू प्राँब्लेम घेऊन मी नाही जगू शकत म्हणून मी शेवटचा निर्णय घेतला, असा मेसेज करुन एका तरुणाने कात्रज येथील भिलारेवाडी तलावात उडी मारुन आत्महत्या केली. अग्निशामन दलाच्या जवानाने आज सकाळी ९ वाजल्या सुमारास तलावातून या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. 

जीवनात आलेल्या नैराश्यातून २३ वर्षीय युवकाने कात्रज भिलारेवाडी येथील तलावात उडी मारून आत्महत्या केली असून आत्महत्या करण्यापुर्वी त्याने घरच्यांना मेसेज केला होता. ही घटना सोमवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. शंकर बसवराज कलशेट्टी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. कात्रज अग्निशामक केंद्रातील जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला असून शिवविच्छेदन रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शंकर ने रविवारी रात्री उशिरा घरच्याना मी आत्महत्या करत असल्याचा मेसेज केला होता. मेसेज पाहताच घरातील सदस्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेतली, भारती विद्यापीठ पोलिसांनी रात्री दीड दोन वाजेपर्यंत तपास केला. दरम्यान रविवारी सकाळी पुन्हा तपास केला असता भिलारेवाडी तलावाजवळ चप्पल दिसल्याने पोलिसांनी कात्रज अग्निशामन केंद्राला कळविले. कात्रज अग्निशामक केंद्रातील जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि काही वेळातच तरुणाचा मृत्यूदेह बाहेर काढला. शंकर ने आत्महत्या करण्यापूर्वी ब्लेडने हाताची नस कापली होती.

म्हणून मी शेवटचा निर्णय घेतला

माझ्या जीवनात काही समस्या आहेत, आणि त्या मी सोडवू शकत नाही आणि त्या समस्या संपतही नाहीत त्या फक्त वाढतच आहेत. या सर्व समस्या कोणासोबत शेअर करणे सुद्धा अपमानास्पद वाटते. या सर्व समस्या घेउन मी जगूही शकत नाही. काही दिवसांनी या समस्या अजूनही वाढत जाणार, मी सहन करू शकत नाही. अगोदरच खुप त्रास सहन केला आहे. आता आजिबात सहन होत नाही. म्हणून मी माझ्या स्वत: च्या इच्छेने माझे जीवन संपवत आहे. माझ्या आत्महत्यास कोणालाही जबाबदार धरू नये. पोलिसांनी कोणाचीही विचारपूस करण्याची गरज नाही. आई, बाबा, आजी,आजोबा आणि भक्ती मला माफ कर मी जगण्याचा खूप प्रयत्न केला़ पण काय करू प्राँब्लेम घेऊन मी नाही जगू शकत म्हणून मी शेवटचा निर्णय घेतला असा मेसेज करून शंकर ने आत्महत्या केली.

टॅग्स :DhankawadiधनकवडीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूFire Brigadeअग्निशमन दल