शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

पती शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ; पत्नीचा दावा सबळ पुराव्यांअभावी कोर्टाने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 17:00 IST

पत्नीचा दावा सबळ पुराव्यांअभावी फेटाळत तिला २ महिन्यांच्या आत पतीच्या घरी परत जाऊन वैवाहिक संबंध पुनर्स्थापित करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश न्यायालयाने दिला आहे

पुणे: पती शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ असल्याचा आरोप करत त्याला सोडून गेलेल्या पत्नीला कौटुंबिक न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. पत्नीचा दावा सबळ पुराव्यांअभावी फेटाळत तिला दोन महिन्यांच्या आत पतीच्या घरी परत जाऊन वैवाहिक संबंध पुनर्स्थापित करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश न्यायाधीश गणेश अंबादास घुले यांनी दिला आहे. केवळ आरोप करणे आणि ते कायदेशीररित्या सिद्ध करणे या दोन भिन्न बाबी असल्याचे न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे. याचिकाकर्ते पतीची बाजू ॲड. मयूर साळुंके, ॲड. अजिंक्य साळुंके, ॲड. अमोल खोब्रागडे,ॲड. पल्लवी साळुंके यांनी मांडली.

माधव आणि माधवी ( नावे बदलली आहेत) यांचा विवाह २०२१ मध्ये झाला होता. मात्र काही काळानंतर स्मिता या पतीचे घर सोडून निघून गेल्या. त्यामुळे राकेश यांनी हिंदू विवाह अधिनियमच्या अंतर्गत वैवाहिक नातेसंबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. पत्नीने कोणताही सबळ कारणाशिवाय आपला त्याग केला असून, तिला परत नांदायला येण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली.पतीच्या याचिकेला उत्तर देताना माधवी यांनी अत्यंत गंभीर आरोप केले. पती हा संशयी स्वभावाचा असून, तो शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ आहे. लग्नानंतर एकदाही शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नाहीत आणि पतीचे शरीर संबंधापूर्वीच वीर्यस्खलन होत असे, असेही तिने आपल्या लेखी जबाबात म्हटले. तसेच पत्नीने दुसर्या न्यायालयात विवाह रद्द करण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल केल्याचेही म्हटले. याउलट, पतीने आपल्या याचिकेत आणि पुराव्यात हे सर्व आरोप फेटाळून लावले. आपण शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम असून, मधुचंद्रावेळी आणि त्यानंतरही त्यांच्यात आनंदी शारीरिक संबंध होते, असे पतीने ठामपणे सांगितले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे आणि पुरावे तपासले. पत्नीने पतीच्या शारीरिक क्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असले तरी, आपला दावा सिद्ध करण्यासाठी कोणताही वैद्यकीय पुरावा किंवा तज्ज्ञ साक्षीदाराची साक्ष नोंदवली नाही, असे न्यायालयाने नमूद केले.

हिंदू धर्मशास्त्रानुसार विवाह हा एक पवित्र संस्कार आहे. किरकोळ कारणे किंवा सिद्ध न झालेले आरोप यावरून ही महत्त्वपूर्ण संस्था मोडता कामा नये. पती-पत्नीमधील नातेसंबंध टिकवण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करणे अपेक्षित आहे- ॲड. अजिंक्य साळुंके, पतीचे वकील

कौटुंबिक न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, पती-पत्नी विभक्त राहत असतील तर त्यांना एकत्र आणणे आणि समुपदेशनाने मार्ग काढणे हा न्यायालयाचा मुख्य उद्देश असतो. प्रत्येक लहान-सहान गोष्टीसाठी किंवा सिद्ध न होणाऱ्या आरोपांसाठी न्यायालयीन प्रक्रियेचा वापर टाळावा. जेव्हा एक पक्ष दुसऱ्यावर गंभीर आरोप करतो, जसे की या प्रकरणात पत्नीने पतीच्या शारीरिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले, तेव्हा ते आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी पूर्णपणे आरोप करणाऱ्या पक्षाची असते. जबाबदारीशिवाय केलेले आरोप कायदेशीर प्रक्रियेत टिकू शकत नाहीत- ॲड. मयूर साळुंके, पतीचे वकील

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयhusband and wifeपती- जोडीदारDivorceघटस्फोटmarriageलग्नWomenमहिला