शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
2
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
3
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
4
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
5
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
6
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
7
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
8
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
9
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
10
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
11
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
12
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
13
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
14
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
15
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
16
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
17
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
18
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
19
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!

नवरा बायको भांडतात... नंतर एकत्र चहा पितात; शिवसेना-भाजप 'राड्या'वर चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 16:07 IST

अधिवेशनात आरक्षणावर दोन दिवस चर्चा घेण्याची मागणी

एखाद्या कुटुंबात नवरा बायको भांडतात आणि मग एकत्र चहा पीत बसतात. राजकारणात एखाद्या घटनेवरून विषय समाप्त होत नाही असं सूचक वक्तव्य भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. काल सेनाभवन समोर झालेल्या सेना भाजप कार्यकर्त्यांचा मारामारी बद्दल ते बोलत होते. दरम्यान देशविरोधी बोलणाऱ्याच्या सुरात तुम्ही का सूर मिसळता असा सवाल देखील त्यांनी सेनेला विचारला. तसेच विशेष अधिवेशन झालं नाही तर आत्ता होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात तरी आरक्षण प्रश्नावर चर्चा करायला दोन दिवस राखून ठेवा अशी मागणी पाटील यांनी केली.

पुण्यात आज चंद्रकांत पाटील यांचा कडून वात्सल्य फाऊंडेशन चा माध्यमातून वंचित मुलींना नवीन ड्रेस चे वाटप करण्यात आले.त्यावेळी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

काल झालेल्या मारामारी बद्दल बोलताना पाटील म्हणाले , "आता निदर्शनं देखील करायची नाहीत का? परवानगी घेऊन २० जणांची निदर्शनं होती. पोलिसांनी त्यांना अटक पण केली. सेना भवनासमोर निदर्शनं केली.. काही दिवसांपूर्वी भाजप कार्यालयासमोर सेनेने निदर्शनं केली. काँग्रेसने पण प्रयत्न केला."

 

राम मंदिर प्रश्नावर सेनेच्या भूमिकेवर देखील त्यांनी टीका केली."हिंदूंच्या विषयावर बोलायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. इथेच तर दुराव्याला सुरुवात झाली आहे. तुम्ही हिंदुत्व सोडलं. सर्वांनी सलोख्याने राम मंदिर बांधायला सुरुवात केली आहे. काँग्रेस ने आणि देशविरोधी ताकदीने जे करायचं ते चालवलेले आहेच. त्याला तुम्ही राष्ट्रीय म्हणता तर त्यांना सपोर्ट कसे करता?हे क्लेशदायक आहेच. एका खुर्ची पायी .. . "

दरम्यान ही महापालिका निवडणुकांची नांदी आहे का याबाबत बोलताना पाटील म्हणले ,"त्याग करणे हा स्थायीभाव आहे आपल्या संस्कृतीचा. पण खुर्ची पायी त्याग केला असं नाही तर सगळं सुरळीत चालावे म्हणून घेतलेला निर्णय होता.रोज उठून काही तरी देश विरोधी ताकदीने म्हणायचं आहे त्यात तुम्ही सुरात सुर कुठे मिसळता? "

सेना भाजप एकत्र येण्याचा शक्यता संपल्या आहेत का असं विचारल्यावर मात्र त्यांनी सूचक वक्तव्य केलं. पाटील म्हणाले ," एखाद्या कुटुंबात नवरा बायको भांडतात आणि मग एकत्र चहा पीत बसतात. राजकारणात एखाद्या घटनेवरून विषय समाप्त होत नाही."

आरक्षणावर अधिवेशनात २ दिवस चर्चेची मागणी 

 पावसाळी अधिवेशनात आरक्षण प्रश्नावर चर्चा करायला दोन दिवस दिले पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली. पाटील म्हणाले ,"जे जे मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरतील त्यांचा पाठीशी आम्ही आहोत.

विशेष अधिवेशन मागता मागता रूटीन अधिवेशन आलं. त्यात किमान २ दिवस आरक्षण प्रश्नावर चर्चा करायला द्या.काय होतं २ तास चर्चा करता तेव्हा सगळ्यांना बोलता येत नाही. विशेष अधिवेशन असेल तर नीट सूचना देता येतात."

दरम्यान नव्या राजकीय गणितं जुळण्याचा शक्यातेवरून पाटील म्हणाले ," विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली की रणनीती ठरवू. पण बाकी मध्यावदी निवडणुका वगैरे सगळ्या पुड्या सोडल्या जातात.१८ महिन्यात १ दिवस ही असा नाही गेला की नवीन गणितं मांडली गेली नाहीत." 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेRam Mandirराम मंदिरBJPभाजपाMaratha Reservationमराठा आरक्षण