शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

नवरा बायको भांडतात... नंतर एकत्र चहा पितात; शिवसेना-भाजप 'राड्या'वर चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 16:07 IST

अधिवेशनात आरक्षणावर दोन दिवस चर्चा घेण्याची मागणी

एखाद्या कुटुंबात नवरा बायको भांडतात आणि मग एकत्र चहा पीत बसतात. राजकारणात एखाद्या घटनेवरून विषय समाप्त होत नाही असं सूचक वक्तव्य भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. काल सेनाभवन समोर झालेल्या सेना भाजप कार्यकर्त्यांचा मारामारी बद्दल ते बोलत होते. दरम्यान देशविरोधी बोलणाऱ्याच्या सुरात तुम्ही का सूर मिसळता असा सवाल देखील त्यांनी सेनेला विचारला. तसेच विशेष अधिवेशन झालं नाही तर आत्ता होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात तरी आरक्षण प्रश्नावर चर्चा करायला दोन दिवस राखून ठेवा अशी मागणी पाटील यांनी केली.

पुण्यात आज चंद्रकांत पाटील यांचा कडून वात्सल्य फाऊंडेशन चा माध्यमातून वंचित मुलींना नवीन ड्रेस चे वाटप करण्यात आले.त्यावेळी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

काल झालेल्या मारामारी बद्दल बोलताना पाटील म्हणाले , "आता निदर्शनं देखील करायची नाहीत का? परवानगी घेऊन २० जणांची निदर्शनं होती. पोलिसांनी त्यांना अटक पण केली. सेना भवनासमोर निदर्शनं केली.. काही दिवसांपूर्वी भाजप कार्यालयासमोर सेनेने निदर्शनं केली. काँग्रेसने पण प्रयत्न केला."

 

राम मंदिर प्रश्नावर सेनेच्या भूमिकेवर देखील त्यांनी टीका केली."हिंदूंच्या विषयावर बोलायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. इथेच तर दुराव्याला सुरुवात झाली आहे. तुम्ही हिंदुत्व सोडलं. सर्वांनी सलोख्याने राम मंदिर बांधायला सुरुवात केली आहे. काँग्रेस ने आणि देशविरोधी ताकदीने जे करायचं ते चालवलेले आहेच. त्याला तुम्ही राष्ट्रीय म्हणता तर त्यांना सपोर्ट कसे करता?हे क्लेशदायक आहेच. एका खुर्ची पायी .. . "

दरम्यान ही महापालिका निवडणुकांची नांदी आहे का याबाबत बोलताना पाटील म्हणले ,"त्याग करणे हा स्थायीभाव आहे आपल्या संस्कृतीचा. पण खुर्ची पायी त्याग केला असं नाही तर सगळं सुरळीत चालावे म्हणून घेतलेला निर्णय होता.रोज उठून काही तरी देश विरोधी ताकदीने म्हणायचं आहे त्यात तुम्ही सुरात सुर कुठे मिसळता? "

सेना भाजप एकत्र येण्याचा शक्यता संपल्या आहेत का असं विचारल्यावर मात्र त्यांनी सूचक वक्तव्य केलं. पाटील म्हणाले ," एखाद्या कुटुंबात नवरा बायको भांडतात आणि मग एकत्र चहा पीत बसतात. राजकारणात एखाद्या घटनेवरून विषय समाप्त होत नाही."

आरक्षणावर अधिवेशनात २ दिवस चर्चेची मागणी 

 पावसाळी अधिवेशनात आरक्षण प्रश्नावर चर्चा करायला दोन दिवस दिले पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली. पाटील म्हणाले ,"जे जे मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरतील त्यांचा पाठीशी आम्ही आहोत.

विशेष अधिवेशन मागता मागता रूटीन अधिवेशन आलं. त्यात किमान २ दिवस आरक्षण प्रश्नावर चर्चा करायला द्या.काय होतं २ तास चर्चा करता तेव्हा सगळ्यांना बोलता येत नाही. विशेष अधिवेशन असेल तर नीट सूचना देता येतात."

दरम्यान नव्या राजकीय गणितं जुळण्याचा शक्यातेवरून पाटील म्हणाले ," विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली की रणनीती ठरवू. पण बाकी मध्यावदी निवडणुका वगैरे सगळ्या पुड्या सोडल्या जातात.१८ महिन्यात १ दिवस ही असा नाही गेला की नवीन गणितं मांडली गेली नाहीत." 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेRam Mandirराम मंदिरBJPभाजपाMaratha Reservationमराठा आरक्षण