शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

नवरा बायको भांडतात... नंतर एकत्र चहा पितात; शिवसेना-भाजप 'राड्या'वर चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 16:07 IST

अधिवेशनात आरक्षणावर दोन दिवस चर्चा घेण्याची मागणी

एखाद्या कुटुंबात नवरा बायको भांडतात आणि मग एकत्र चहा पीत बसतात. राजकारणात एखाद्या घटनेवरून विषय समाप्त होत नाही असं सूचक वक्तव्य भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. काल सेनाभवन समोर झालेल्या सेना भाजप कार्यकर्त्यांचा मारामारी बद्दल ते बोलत होते. दरम्यान देशविरोधी बोलणाऱ्याच्या सुरात तुम्ही का सूर मिसळता असा सवाल देखील त्यांनी सेनेला विचारला. तसेच विशेष अधिवेशन झालं नाही तर आत्ता होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात तरी आरक्षण प्रश्नावर चर्चा करायला दोन दिवस राखून ठेवा अशी मागणी पाटील यांनी केली.

पुण्यात आज चंद्रकांत पाटील यांचा कडून वात्सल्य फाऊंडेशन चा माध्यमातून वंचित मुलींना नवीन ड्रेस चे वाटप करण्यात आले.त्यावेळी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

काल झालेल्या मारामारी बद्दल बोलताना पाटील म्हणाले , "आता निदर्शनं देखील करायची नाहीत का? परवानगी घेऊन २० जणांची निदर्शनं होती. पोलिसांनी त्यांना अटक पण केली. सेना भवनासमोर निदर्शनं केली.. काही दिवसांपूर्वी भाजप कार्यालयासमोर सेनेने निदर्शनं केली. काँग्रेसने पण प्रयत्न केला."

 

राम मंदिर प्रश्नावर सेनेच्या भूमिकेवर देखील त्यांनी टीका केली."हिंदूंच्या विषयावर बोलायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. इथेच तर दुराव्याला सुरुवात झाली आहे. तुम्ही हिंदुत्व सोडलं. सर्वांनी सलोख्याने राम मंदिर बांधायला सुरुवात केली आहे. काँग्रेस ने आणि देशविरोधी ताकदीने जे करायचं ते चालवलेले आहेच. त्याला तुम्ही राष्ट्रीय म्हणता तर त्यांना सपोर्ट कसे करता?हे क्लेशदायक आहेच. एका खुर्ची पायी .. . "

दरम्यान ही महापालिका निवडणुकांची नांदी आहे का याबाबत बोलताना पाटील म्हणले ,"त्याग करणे हा स्थायीभाव आहे आपल्या संस्कृतीचा. पण खुर्ची पायी त्याग केला असं नाही तर सगळं सुरळीत चालावे म्हणून घेतलेला निर्णय होता.रोज उठून काही तरी देश विरोधी ताकदीने म्हणायचं आहे त्यात तुम्ही सुरात सुर कुठे मिसळता? "

सेना भाजप एकत्र येण्याचा शक्यता संपल्या आहेत का असं विचारल्यावर मात्र त्यांनी सूचक वक्तव्य केलं. पाटील म्हणाले ," एखाद्या कुटुंबात नवरा बायको भांडतात आणि मग एकत्र चहा पीत बसतात. राजकारणात एखाद्या घटनेवरून विषय समाप्त होत नाही."

आरक्षणावर अधिवेशनात २ दिवस चर्चेची मागणी 

 पावसाळी अधिवेशनात आरक्षण प्रश्नावर चर्चा करायला दोन दिवस दिले पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली. पाटील म्हणाले ,"जे जे मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरतील त्यांचा पाठीशी आम्ही आहोत.

विशेष अधिवेशन मागता मागता रूटीन अधिवेशन आलं. त्यात किमान २ दिवस आरक्षण प्रश्नावर चर्चा करायला द्या.काय होतं २ तास चर्चा करता तेव्हा सगळ्यांना बोलता येत नाही. विशेष अधिवेशन असेल तर नीट सूचना देता येतात."

दरम्यान नव्या राजकीय गणितं जुळण्याचा शक्यातेवरून पाटील म्हणाले ," विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली की रणनीती ठरवू. पण बाकी मध्यावदी निवडणुका वगैरे सगळ्या पुड्या सोडल्या जातात.१८ महिन्यात १ दिवस ही असा नाही गेला की नवीन गणितं मांडली गेली नाहीत." 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेRam Mandirराम मंदिरBJPभाजपाMaratha Reservationमराठा आरक्षण