शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नवरा बायको भांडतात... नंतर एकत्र चहा पितात; शिवसेना-भाजप 'राड्या'वर चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 16:07 IST

अधिवेशनात आरक्षणावर दोन दिवस चर्चा घेण्याची मागणी

एखाद्या कुटुंबात नवरा बायको भांडतात आणि मग एकत्र चहा पीत बसतात. राजकारणात एखाद्या घटनेवरून विषय समाप्त होत नाही असं सूचक वक्तव्य भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. काल सेनाभवन समोर झालेल्या सेना भाजप कार्यकर्त्यांचा मारामारी बद्दल ते बोलत होते. दरम्यान देशविरोधी बोलणाऱ्याच्या सुरात तुम्ही का सूर मिसळता असा सवाल देखील त्यांनी सेनेला विचारला. तसेच विशेष अधिवेशन झालं नाही तर आत्ता होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात तरी आरक्षण प्रश्नावर चर्चा करायला दोन दिवस राखून ठेवा अशी मागणी पाटील यांनी केली.

पुण्यात आज चंद्रकांत पाटील यांचा कडून वात्सल्य फाऊंडेशन चा माध्यमातून वंचित मुलींना नवीन ड्रेस चे वाटप करण्यात आले.त्यावेळी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

काल झालेल्या मारामारी बद्दल बोलताना पाटील म्हणाले , "आता निदर्शनं देखील करायची नाहीत का? परवानगी घेऊन २० जणांची निदर्शनं होती. पोलिसांनी त्यांना अटक पण केली. सेना भवनासमोर निदर्शनं केली.. काही दिवसांपूर्वी भाजप कार्यालयासमोर सेनेने निदर्शनं केली. काँग्रेसने पण प्रयत्न केला."

 

राम मंदिर प्रश्नावर सेनेच्या भूमिकेवर देखील त्यांनी टीका केली."हिंदूंच्या विषयावर बोलायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. इथेच तर दुराव्याला सुरुवात झाली आहे. तुम्ही हिंदुत्व सोडलं. सर्वांनी सलोख्याने राम मंदिर बांधायला सुरुवात केली आहे. काँग्रेस ने आणि देशविरोधी ताकदीने जे करायचं ते चालवलेले आहेच. त्याला तुम्ही राष्ट्रीय म्हणता तर त्यांना सपोर्ट कसे करता?हे क्लेशदायक आहेच. एका खुर्ची पायी .. . "

दरम्यान ही महापालिका निवडणुकांची नांदी आहे का याबाबत बोलताना पाटील म्हणले ,"त्याग करणे हा स्थायीभाव आहे आपल्या संस्कृतीचा. पण खुर्ची पायी त्याग केला असं नाही तर सगळं सुरळीत चालावे म्हणून घेतलेला निर्णय होता.रोज उठून काही तरी देश विरोधी ताकदीने म्हणायचं आहे त्यात तुम्ही सुरात सुर कुठे मिसळता? "

सेना भाजप एकत्र येण्याचा शक्यता संपल्या आहेत का असं विचारल्यावर मात्र त्यांनी सूचक वक्तव्य केलं. पाटील म्हणाले ," एखाद्या कुटुंबात नवरा बायको भांडतात आणि मग एकत्र चहा पीत बसतात. राजकारणात एखाद्या घटनेवरून विषय समाप्त होत नाही."

आरक्षणावर अधिवेशनात २ दिवस चर्चेची मागणी 

 पावसाळी अधिवेशनात आरक्षण प्रश्नावर चर्चा करायला दोन दिवस दिले पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली. पाटील म्हणाले ,"जे जे मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरतील त्यांचा पाठीशी आम्ही आहोत.

विशेष अधिवेशन मागता मागता रूटीन अधिवेशन आलं. त्यात किमान २ दिवस आरक्षण प्रश्नावर चर्चा करायला द्या.काय होतं २ तास चर्चा करता तेव्हा सगळ्यांना बोलता येत नाही. विशेष अधिवेशन असेल तर नीट सूचना देता येतात."

दरम्यान नव्या राजकीय गणितं जुळण्याचा शक्यातेवरून पाटील म्हणाले ," विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली की रणनीती ठरवू. पण बाकी मध्यावदी निवडणुका वगैरे सगळ्या पुड्या सोडल्या जातात.१८ महिन्यात १ दिवस ही असा नाही गेला की नवीन गणितं मांडली गेली नाहीत." 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेRam Mandirराम मंदिरBJPभाजपाMaratha Reservationमराठा आरक्षण