शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय इमारतींवर मिळकतकराचा कोट्यवधींचा बोजा

By admin | Updated: April 30, 2015 00:17 IST

शहरात २००५ नंतर बांधण्यात आलेल्या कोणत्याही शासकीय इमारतीसाठी मिळकतकर आकारण्यात आला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पुणे : शहरात २००५ नंतर बांधण्यात आलेल्या कोणत्याही शासकीय इमारतीसाठी मिळकतकर आकारण्यात आला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षांपासून या नवीन इमारतींच्या बांधकाम क्षेत्राची तसेच कर आकारणीसाठी आवश्यक असलेली इतर माहिती महापालिका प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली जात आहे. मात्र, माहिती तर सोडाच; पण या पत्रांना साधे उत्तर देण्याची तसदीही या विभागाकडून अद्यापपर्यंत एकदाही घेण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांच्या दारात थकबाकीसाठी बँड पथक वाजविणारी महापालिका शासकीय विभागांच्या कर आकारणीसाठी या विभागांसमोर बँड वाजविणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शहरातील शासकीय विभागांच्या इमारतींना कर आकारणीची मुभा महापालिकेस आहे. त्यानुसार, २००५ पूर्वीच्या अनेक इमारतींना महापालिका प्रशासनाकडून मिळकतकर लावण्यात आला असून, तो नियमितपणे वसूलही केला जात आहे. मात्र, पालिकेप्रमाणेच यादेखील शासनाच्या संस्था असल्याने त्यांना कर आकारला जाऊ नये, असा वाद अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे राज्यशासनाने यावर तोडगा काढण्यासाठी या इमारतींची कर आकारणी नगररचना विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्यामार्फत करून त्याप्रमाणे कर निश्चित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर २०१२ पर्यंत शासनाकडून शहरात नव्याने बांधलेल्या इमारतींना कर आकारणी करण्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याची नेमणूकच करण्यात आली नाही. यामुळे महापालिकेचे मिळकतकराचे कोट्यवधींचे उत्पन्न बुडत असल्याने मुख्य सभेनेच यात हस्तक्षेप करून शासनाकडून अधिकारी नेमला जात नसल्याने या इमारतींना कर आकारणी करण्याचे अधिकार पालिकेकडून करसंकलन विभागप्रमुखांना देण्यात आले आहेत. त्यानुसार, गेल्या दहा वर्षांपासून पालिकेकडून या नवीन इमारतींची माहिती बांधकाम विभागाकडे मागितली जात आहे. मात्र, ती देण्यास टाळाटाळ केली जात असून, काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा या बांधकामाची माहिती मागण्यात आल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मिळकतकरावरून सुरू असलेल्या वादामुळे शासकीय इमारतींच्या करांचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. शासनाच्या संस्थांनी एकमेकांकडून कर घेऊ नये, असे संकेत असल्याचे सांगत कर भरण्यास टाळाटाळ केली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात महापालिका ही जनतेला सेवा पुरवीत असताना, शासनाकडून कोणत्याही सवलती दिल्या जात नाहीत. रस्त्यांवरील दिवे नागरिकांसाठी असले तरी, त्याचे बिल व्यावसायिक दरानेच आकारले जाते. तर पाणीपुरवठा आणि मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठीही पालिकेस वीजदरात सवलत दिली जात नाही. त्याचा बोजा थेट नागरिकांवर पडतो. याशिवाय या इमारतींना पाणी पुरविण्याची तसेच इतर स्वच्छतेच्या सुविधा पुरविण्याची जबाबदारी पालिकेवर असताना, कर का आकारला जाऊ नये, असा प्रश्नही उपस्थित होतो.