शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
6
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
7
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
8
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
9
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
10
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
11
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
12
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
13
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
14
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
15
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
16
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
17
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
18
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
19
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
20
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!

शासकीय इमारतींवर मिळकतकराचा कोट्यवधींचा बोजा

By admin | Updated: April 30, 2015 00:17 IST

शहरात २००५ नंतर बांधण्यात आलेल्या कोणत्याही शासकीय इमारतीसाठी मिळकतकर आकारण्यात आला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पुणे : शहरात २००५ नंतर बांधण्यात आलेल्या कोणत्याही शासकीय इमारतीसाठी मिळकतकर आकारण्यात आला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षांपासून या नवीन इमारतींच्या बांधकाम क्षेत्राची तसेच कर आकारणीसाठी आवश्यक असलेली इतर माहिती महापालिका प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली जात आहे. मात्र, माहिती तर सोडाच; पण या पत्रांना साधे उत्तर देण्याची तसदीही या विभागाकडून अद्यापपर्यंत एकदाही घेण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांच्या दारात थकबाकीसाठी बँड पथक वाजविणारी महापालिका शासकीय विभागांच्या कर आकारणीसाठी या विभागांसमोर बँड वाजविणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शहरातील शासकीय विभागांच्या इमारतींना कर आकारणीची मुभा महापालिकेस आहे. त्यानुसार, २००५ पूर्वीच्या अनेक इमारतींना महापालिका प्रशासनाकडून मिळकतकर लावण्यात आला असून, तो नियमितपणे वसूलही केला जात आहे. मात्र, पालिकेप्रमाणेच यादेखील शासनाच्या संस्था असल्याने त्यांना कर आकारला जाऊ नये, असा वाद अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे राज्यशासनाने यावर तोडगा काढण्यासाठी या इमारतींची कर आकारणी नगररचना विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्यामार्फत करून त्याप्रमाणे कर निश्चित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर २०१२ पर्यंत शासनाकडून शहरात नव्याने बांधलेल्या इमारतींना कर आकारणी करण्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याची नेमणूकच करण्यात आली नाही. यामुळे महापालिकेचे मिळकतकराचे कोट्यवधींचे उत्पन्न बुडत असल्याने मुख्य सभेनेच यात हस्तक्षेप करून शासनाकडून अधिकारी नेमला जात नसल्याने या इमारतींना कर आकारणी करण्याचे अधिकार पालिकेकडून करसंकलन विभागप्रमुखांना देण्यात आले आहेत. त्यानुसार, गेल्या दहा वर्षांपासून पालिकेकडून या नवीन इमारतींची माहिती बांधकाम विभागाकडे मागितली जात आहे. मात्र, ती देण्यास टाळाटाळ केली जात असून, काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा या बांधकामाची माहिती मागण्यात आल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मिळकतकरावरून सुरू असलेल्या वादामुळे शासकीय इमारतींच्या करांचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. शासनाच्या संस्थांनी एकमेकांकडून कर घेऊ नये, असे संकेत असल्याचे सांगत कर भरण्यास टाळाटाळ केली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात महापालिका ही जनतेला सेवा पुरवीत असताना, शासनाकडून कोणत्याही सवलती दिल्या जात नाहीत. रस्त्यांवरील दिवे नागरिकांसाठी असले तरी, त्याचे बिल व्यावसायिक दरानेच आकारले जाते. तर पाणीपुरवठा आणि मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठीही पालिकेस वीजदरात सवलत दिली जात नाही. त्याचा बोजा थेट नागरिकांवर पडतो. याशिवाय या इमारतींना पाणी पुरविण्याची तसेच इतर स्वच्छतेच्या सुविधा पुरविण्याची जबाबदारी पालिकेवर असताना, कर का आकारला जाऊ नये, असा प्रश्नही उपस्थित होतो.