शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

घोड धरण ९५ टक्के भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 03:02 IST

घोड नदीवर असणाऱ्या घोड धरणाची पाणी साठवणक्षमता ७ हजार ६३९ दलघफू आहे

निमोणे : चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरण ९५.५१ टक्के भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती मुख्य अभियंता प्रकाश लंकेश्वर यांनी दिली.चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड नदीवर असणाऱ्या घोड धरणाची पाणी साठवणक्षमता ७ हजार ६३९ दलघफू आहे. तर, मृत पाणीसाठा २ हजार १७२ दलघफू आहे. उपयुक्त पाणीसाठा ५ हजार ४६७ दलघफू एवढा आहे. तीन दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संतत पाऊस पडल्याने या धरणसाखळीतील डिंभे, वडज, येडगाव ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली. त्यातून ८,५०० क्युसेक्स वेगाने पाणी घोड नदीपात्रात सोडण्यात आले. त्यामुळे धरणात ९५.५१ टक्के पाणीसाठा झाला आहे. पूरनियंत्रणाच्या दृष्टीने आज सकाळी ९ वाजता २ हजार २८०, दुपारी १२.३० वाजता ६ हजार ९६० तर सायंकाळी १० हजार ४४० क्युसेक्स इतक्या वेगाने घोड धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे. याचे नियमन करण्यासाठी कर्मचारी दिवसरात्र तैनात असून अधिकारीही ठाण मांडून आहेत. दरम्यान, याच धरणालगत असलेल्या पुलाला तडे गेल्याने पुलाची सुरक्षा धोक्यात आली आहे. खात्याच्या वतीने या पुलाची त्वरित दुरुस्ती व्हावी, अशी ग्रामस्थांनी पत्राद्वारे केली आहे. पुलाच्या डागडुजीचे काम त्वरित करून घेऊ, असे शाखा अभियंता प्रकाश लंकेश्वर यांनी सांगितले.उजनी भरले ७२ टक्केउजनीवर पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, नगर जिल्ह्यातील कर्जत, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यांतील शेती, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती अवलंबून आहेत; तसेच सोलापूर महानगरपालिका यांचा पाणीपुरवठाही उजनी जलाशयातून होतो. पुणे शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने सर्वच धरणांतून उजनी धरणात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे उजनीच्या पाणीपातळीत वाढ होत असून शेतकरी खूष आहे.बुधवारी दुपारपर्यंत उजनी धरणात दौंड येथून ६० हजार ५०० क्युसेक, तर बंडगार्डन येथून ३४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. बुधवारी दुपारपासून पाण्याचा विसर्ग वाढत आहे. दरम्यान, उजनी धरण व्यवस्थापन उपविभाग भीमानगर यांनी एक परिपत्रक काढून भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा येत आहे. उपयुक्त साठा ९० टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याने या परिस्थितीत पूर नियंत्रणाच्या दृष्टीने भीमा नदीपात्रात पाणी सोडले जाऊ शकते.

टॅग्स :WaterपाणीDamधरण