शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
2
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
3
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
4
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
5
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
6
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
7
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
8
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
9
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
10
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
11
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
12
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
13
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
14
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
15
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
16
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
18
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!
19
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
20
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!

सूर्योदय पाहायला गेलेल्या विद्यार्थ्यांचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तीन मुली जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 6:44 PM

नारायणपूरमध्ये आल्यानंतर मंदिराजवळील वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून समोरील दुकानांना जोरदार धडकली...

सासवड : पुरंदर तालुक्यातील नारायणपूर येथे भीषण अपघाताची घटना घडली असून पुण्यातील एमआयटी काॅलेजचे दोन विद्यार्थी जागीच ठार झाले. नारायणपूरमध्ये आल्यानंतर मंदिराजवळील वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून समोरील दुकानांना जोरदार धडकली. या भीषण अपघातात गौरव जितेंद्र ललवाणी, रा. रायपूर, (छत्तीसगड) आणि रजत मोहता, कलकत्ता (पश्चिम बंगाल) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

साकेत ढागा, रोहित कुमार, वसुंधरा रस्तोगी, पूर्वी सिंग, ओमिया सिंग (हे पाच जण विविध प्रांतातील असून पूर्ण नाव पत्ता समजू शकला नाही) सर्वांना जखमी अवस्थेत अधिक उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, अपघातातील सर्व विद्यार्थी देशाच्या विविध भागांतील असून पुणे येथे एमआयटी कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. यामधील मयत दोघे बी कॉममध्ये असून इतर विविध पदवीचे शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना पुरंदर तालुक्यातील बोपगावमधील कानिफनाथ मंदिरापासून सूर्योदय पाहायचा असल्याने एक्सयूव्ही ३०० ही गाडी भाड्याने घेऊन सोमवार, दि. ३ रोजी पहाटे पुणे कापूरहोळमार्गे नारायणपूरवरून सासवडच्या दिशेने येत होते. पहाटे चारच्या दरम्यान नारायणपूरमध्ये आल्यानंतर मंदिराजवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून हॉटेल मेघमल्हार आणि शिवलक्ष्मी व्हरायटीज या दुकानावर जाऊन आदळली.

भल्या पहाटे जोरदार आवाज झाल्याने श्रीदत्त मंदिराचे व्यवस्थापक भरत क्षीरसागर मराठा महासंघाचे तालुका उपाध्यक्ष रामभाऊ बोरकर, भानुदास बोरकर, सचिन झेंडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. समोरचे दृश्य पाहून लगेचच परिसरातील नागरिकांना बोलावून घेतले. तसेच पोलिसांना फोन करून जखमींना पुणे येथे पाठवून दिले. सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात दोन मृतांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. तर आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून माजी नगरसेवक मुन्ना शिंदे यांनी मृतदेह त्यांच्या राज्यात नेण्यासाठी सर्व व्यवस्था केली. सासवड पोलीस स्टेशनचे वतीने पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड