शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग ठरताहेत जीवघेणे

By admin | Updated: April 4, 2015 05:54 IST

पुणे-सोलापूर व पुणे-नाशिक महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असले तरी रेंगाळलेल्या कामामुळे हे महामार्ग जीवघेणे ठरत असल्याचे दिसून येत आहे.

पळसदेव : पुणे-सोलापूर व पुणे-नाशिक महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असले तरी रेंगाळलेल्या कामामुळे हे महामार्ग जीवघेणे ठरत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असले, तरी अनेक ठिकाणी उणिवा राहिला आहेत. अपघातांचे सत्र सुरूच असताना महामार्गावरील पुलाच्या ठिकाणी अपघात घडत आहेत. महामार्गाचे काम सुरू झाल्यानंतर नवीन पुलांची बांधणी झाली. तसेच, हे पूल प्रशस्त झाले. मात्र, जुने पूल (पूर्वीच्या महामार्गावरील) आहे त्या अवस्थेत तसेच आहेत. जुने पूल अरुंद असल्याने त्या ठिकाणी अपघात घडत आहेत. दोन वाहने सुसाट जात असताना व पूल अरुंद असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहने पुलावरून खाली कोसळतात. त्यामुळे महामार्गावरील जुन्या पुलांची रुंदी वाढविणे व सिमेंटचे सुरक्षित कठडे बसविणे गरजेचे असल्याचे मत वाहनचालकांनी व्यक्त केले. ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याने वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. वाहनांना चढ अथवा उताराचे बंधन राहिलेले नाही. यातून पुढे जाण्याची स्पर्धा वाढल्याने अपघातांना आयतेच निमंत्रण मिळत आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जसे प्रशस्त झाले, तसे मात्र जुन्या पुलांची रुंदी वाढविणे, संरक्षक कठडे भक्कम करणे, याकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे जाणवते. त्यामुळे या पुलांवरून व दोन वाहने जात असताना एकमेकांना वाहने घासणे अथवा नियंत्रण सुटल्यास वाहन पुलावरून खाली कोसळण्याचा धोका संभवतो. पुलाचे कठडे तोडून वाहने खाली पडण्याच्या घटना मागील तीन महिन्यांत भिगवण, भादलवाडी, पळसदेव येथील पुलाच्या ठिकाणी घडल्या आहेत. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसते. अपघात झाल्यानंतर पुलाचे कठडे तुटतात. परिणामी पुन्हा अपघाताची शक्यता निर्माण होते. तुटलेले कठडे लवकर बसविले जात नाहीत, कठडे बसविले तर ते लोखंडी बसवून तात्पुरती मलमपट्टी केली जाते.