शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील ६३२ गावे बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 12:12 IST

२२ हजार हेक्टरचे झाले नुकसान : जुन्नर, पुरंदर, बारामती, मावळात सर्वाधिक नुकसान..

ठळक मुद्दे भाजीपाला, भुईमूग, सोयाबीन, द्राक्ष या पिकांना अधिक हानी पोहोचली असल्याची माहिती

पुणे : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ६३२ गावांतील २२ हजार ४०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यामुळे ४० हजार ७४५ शेतकरी बाधित झाले आहेत. जुन्नर, बारामती, पुरंदर आणि मावळ या तालुक्यांत सर्वाधिक नुकसान झाले आहे. भाजीपाला, भुईमूग, सोयाबीन, द्राक्ष या पिकांना अधिक हानी पोहोचली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक बी. जी. पलघडमल यांनी दिली. जून ते ऑक्टोबरअखेरीस जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांनी पावसाची सरासरी ओलांडली आहे. उलट, काही तालुक्यांत ओला दुष्काळ पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मावळ, मुळशीसह काही तालुक्यांत सरासरीपेक्षा ४० ते ५० टक्के अधिक पर्जन्यमान झाले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांत जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली. शेतमालाचेही मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने केलेल्या पाहणीत डाळिंब, द्राक्षे, कांदा, भुईमूग, मका, फुलपिके, भात, बाजरी, बटाटा, ऊस, तृणधान्य, गळीत धान्य, भाजीपाला आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे. जुन्नर तालुक्यात सर्वाधिक ११५ गावांमधील २४ हजार २६० शेतकरी बाधित असून, त्यांच्या १५ हजार ३६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. खालोखाल बारामतीमधील ७८ गावांतील ३,६०० शेतकºयांचे १,८२१ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची नोंद आहे. त्यात २९८ हेक्टर ऊसक्षेत्राचा समावेश आहे, तर मावळ तालुक्यातील १३२ गावांमधील ३ हजार ६७९ शेतकºयांचे १ हजार ५०५ हेक्टर क्षेत्रावरील भातपिकाचे नुकसान झाले आहे. भोर आणि वेल्हे या तालुक्यांत तुलनेने कमी नुकसान झाले आहे. भोर तालुक्यातील २८ गावांमधील १५२ शेतकरी बाधित असून, ३२ हेक्टरवरील भातपिकाचे नुकसान झाले आहे. वेल्हा तालुक्यातील २२ गावांमधील ७३ शेतकºयांचे १९ हेक्टरवरील भात पिकाचे नुकसान झाले आहे. हवेली तालुक्यामधील ६ गावांतील ४८४ शेतकºयांचे १३ हेक्टरवरील भुईमूग, ५५ हेक्टरवरील सोयाबीन आणि १०७ हेक्टरवरील भाजीपाला असे १७५ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील एकूण नुकसानामध्ये भाजीपालापिकाचे सर्वाधिक ७ हजार २५१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. खालोखाल सोयाबीनचे साडेचार हजारांहून अधिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे..........भाजीपाला-फळांचे झालेले नुकसान हेक्टरमध्येडाळिंब    १९५द्राक्षे    १२६७केळी    १२कांदा    १०३१भुईमूग    २४३४मका    ८७फुलपीक    ३०२इतर पिके    ३१९भात    ३३०९सोयाबीन    ४६८६बाजरी    १४१बटाटा    २०२ऊस    २९९गळीत धान्य    ४९भाजीपाला    ७२५१ 

टॅग्स :PuneपुणेmavalमावळJunnarजुन्नरBaramatiबारामतीFarmerशेतकरीRainपाऊस