शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

हर्षवर्धन पाटलांना ‘ ईव्हीएम ’ ची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 21:30 IST

संकल्पपत्र एवढ्या उशिरा आणून आणि त्यामुळे जुन्याच घोषणा करून भाजपाने निवडणुकीआधीच हार मान्य केल्याची स्थिती आहे.

पुणे : देशात नरेंद्र मोदी यांची लाट नसून मतदार त्यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे आघाडीसाठी राज्यात चांगले वातावरण असल्याचे सांगत काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी ईव्हीएम मशिनबाबत मात्र भीती व्यक्त केली आहे. ईव्हीएम यंत्रणेबाबत निवडणुकीत सतर्क राहावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पाटील यांनी ईव्हीएम मशिनवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नागपूर येथील उमेदवार नाना पटोले यांनी ईव्हीएमबाबत उच्च न्यायालयात तक्रार दिली आहे. त्याचा आधार घेत पाटील म्हणाले, निवडणुक पारदर्शकपणे पार पडणे आवश्यक आहे. आता कोणतीही लाट नाही. सरकारविषयी रोष आहे. संकल्पपत्र एवढ्या उशिरा आणून आणि त्यामुळे जुन्याच घोषणा करून भाजपाने निवडणुकीआधीच हार मान्य केल्याची स्थिती आहे. त्यामुळे आता ईव्हीएम यंत्रणेवर बारकाईन लक्ष द्यावे लागले. त्यासाठी नियोजन करावे लागणार आहे. ईव्हीएमबाबत तक्रार दिल्यास निवडणुक आयोगाने त्याची तातडीने दखल घेऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशाबाबत विचारले असता पाटील यांनी त्याला बगल दिली. पक्ष सोडण्याबाबत त्यानांच विचारा असे सांगत त्यांनी बोलण्याचे टाळले. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही यावेळी उपस्थित होते. त्यांनाही या मुद्यावर बोलण्यास नकार दिला.------------सर्व प्रश्नांची उत्तरे मिळालीबारामती लोकसभा मतदारसंघातील काही जणांच्या अडचणी होत्या. दहा दिवसांपासून चर्चा सुरू होती. एक-एक प्रश्नाची उत्तरे मिळत गेली. त्यानंतर सोमवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. भोरमध्येही मेळावा घेण्यात आला आहे. सासवडमध्ये सर्वजण कामाला लागले आहेत, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे याच विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस