पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास सांगवी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा : ग्रामस्थांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 02:43 PM2021-07-28T14:43:50+5:302021-07-28T14:45:16+5:30

वर्षानुवर्ष कमी दाबाच्या पाण्याचा प्रश्न कायम; जुन्या जलवाहिन्या बदल्याची मागणी 

Handa Morcha on Sangvi GramPanchayat if water supply is not regular: Villagers' warning | पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास सांगवी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा : ग्रामस्थांचा इशारा

पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास सांगवी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा : ग्रामस्थांचा इशारा

googlenewsNext

सांगवी : सांगवी (ता. बारामती ) ग्रामपंचायतीकडून अपुरा,अनियमित व अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच ठोस उपाययोजना राबवून स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा न केल्यास महिला व आबालवृद्धांसह ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा माजी सरपंच भानुदास जगताप यांनी ग्रामपंचायतीस निवेदनाद्वारे दिला आहे.

सध्या जिल्ह्यात सामाधानकारक पाऊस झाला असताना देखील परिसरात पाणी टंचाईचा प्रश्न कायम आहे. पाणी मुबलक असून देखील पाणी पुरवठ्याच्या योग्य नियोजन अभावी मुबलक पाणी पुरवठा होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

सांगवी गावात दोन दिवसाआड दूषित व अपुऱ्या पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे. मिलिंदनगर येथे वर्षानुवर्ष पाण्याचा प्रश्न कायम असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. गावात दोन दिवसाआड पिण्याचे पाणी सोडण्यात येत आहे. कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने तीन ते चार दिवस पाणी कसे पूरवायचे हा मोठा प्रश्न आता ग्रामस्थांपुढे निर्माण झाला आहे.


ग्रामपंचायतीची दीड लाख क्षमतेची पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. पाणी पुरवठा करत असताना पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरलेली असताना सोडल्यास पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होत असतो,गावात इतर ठिकाणी पूर्वीपासून चार इंच पाईपलाईन आहेत. तर मिलिंदनगर येथे तीन इंच पाईपलाईन असल्याने कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यातही तीन दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने आता संतप्त महिलांनी शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून संताप व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
...................................
मिलिंदनगर परिसरात ग्रामस्थांच्या मागणीनुसार योग्य ती काळजी घेऊन स्वच्छ व पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणार आहोत. 

- चंद्रकांत तावरे, सरपंच सांगवी ग्रामपंचायत
........................
सध्या कॅनॉलच्या कामकाजामुळे साठवण तलावात पाणी अल्प प्रमाणात असल्याने पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. मागील महिनाभरापूर्वी जल प्राधिकरणाने सांगवीतील जुन्या पाण्याच्या जलवाहिन्यांचे सर्वेक्षण केले आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर गावातील सर्वच नवीन जलवाहिन्यांचे नव्याने कामकाज करण्यात येणार आहे. यामुळे वर्षानुवर्षे चालत असलेली पाण्याची समस्या मिटणार आहे. 
- संजय चांदगुडे, ग्रामविकास अधिकारी. 

Web Title: Handa Morcha on Sangvi GramPanchayat if water supply is not regular: Villagers' warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.