शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बारावी अनुत्तीर्ण हॉकीपटूला क्रीडागुणाचा ‘गोल’

By admin | Updated: June 27, 2015 23:57 IST

क्रीडा संघटनेतील वादामुळे, तसेच मुदतीमध्ये प्रस्ताव सादर न केल्याने शहरातील बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना २५ क्रीडागुणांचा लाभ मिळालेला नाही.

मिलिंद कांबळे , पिंपरी क्रीडा संघटनेतील वादामुळे, तसेच मुदतीमध्ये प्रस्ताव सादर न केल्याने शहरातील बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना २५ क्रीडागुणांचा लाभ मिळालेला नाही. यामुळे वर्ष वाया जाण्याच्या भीतीने विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत सापडले आहेत. या बेफिकिरीमुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळ सुरू झाला आहे. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणारे महाराष्ट्र राज्यात शेकडो विद्यार्थी आहेत. दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास अशा खेळाडू विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार २५ गुण दिले जातात. अशा खेळाडूंची यादी संबंधित खेळाच्या राज्य संघटनेतर्फे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे ३१ मार्चपर्यंत सादर करावी लागते. मात्र, काही संघटनांतर्फे विद्यार्थ्यांची नावे महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाकडे मुदतीत दिली गेली नाहीत. त्यामुळे राज्यातील अनेक अनुत्तीर्ण खेळाडू विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना क्रीडागुणांचा लाभ मिळाला नाही. ‘‘महाराष्ट्र हॉकी संघटना अधिकृत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पत्र महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय आणि पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास १८ जूनला दिले आहे. मात्र, आॅलिम्पिक समितीच्या मान्यतेच्या प्रश्नांमुळे या संदर्भात कायदेशीर सल्ला घेणार असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. तसेच, जिल्हा क्रीडा कार्यालयास पत्र दिले आहे. मुदतीपूर्वीच पात्र पाच विद्यार्थ्यांची यादी सादर केली आहे,’’असे या संदर्भात महाराष्ट्र हॉकी संघटनेचे सचिव इक्रम खान यांनी सांगितले. अद्याप या संदर्भात उत्तर मिळाले नाही. ‘‘सर्व खेळांच्या खेळाडूंच्या याद्या मुदतीमध्ये जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे पाठविण्यात आल्या आहेत. अनुत्तीर्ण झाल्यानंतर काही विद्यार्थी खेळाडू जागे होतात. ३१ मार्च या ठरलेल्या मुदतीमध्ये अर्जांचे प्रस्ताव विविध क्रीडा संघटनांकडून सादर केले जातात. सदर खेळाडूंना त्यांचा लाभ मिळतो,’’अशी माहिती जिल्हा क्रीडाधिकारी सुहास पाटील यांनी दिली. दोन वेगवेगळ्या हॉकी संघटनेच्या वादात खेळाडूला लाभ मिळाला नाही. महाराष्ट्र हॉकी संघटना आणि हॉकी महाराष्ट्र अशा दोन संघटना राज्यात कार्यरत आहेत. हा वाद न्यायालयात आहे. अधिकृत संघटना ठरत नसल्याने शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावी अनुत्तीर्ण झालेल्या राज्य हॉकीपटूस क्रीडागुण मिळाले नाहीत. वर्षभरात खेळासाठी घाम गाळून उत्तम कामगिरी करूनही गुणांचा लाभ मिळत नसल्याने अनेक गुणवान खेळाडू नैराश्येच्या गर्तेत सापडले आहेत. यामुळे त्याचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. या नैराश्येतून विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.