शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
2
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
3
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
4
कल्याण-डोंबिवलीत महायुतीने मतदानाआधीच अर्धी लढाई जिंकली, तब्बल १९ उमेदवार बिनविरोध
5
Jalgaon Municipal Election 2026: भाजपा-शिंदेसेनेचा विजयाचा 'षटकार'! युतीचे १२ उमेदवार बिनविरोध, वाचा संपूर्ण यादी
6
'हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिका इराणमध्ये घुसण्यास तयार'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
7
KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
8
Municipal Election 2026: अर्ज माघारीसाठी ५०-६० लाखांचं आमिष, विरोधी उमेदवारांच्या घरच्यांवरही दबाव; मनसेचा खळबळजनक आरोप
9
Viral Video: "बिहारमध्ये २०-२५ हजारांत मुली मिळतात", कॅबिनेट मंत्र्यांच्या पतीचं वादग्रस्त वक्तव्य
10
Uma Bharti : "लाजिरवाणं, अत्यंत कलंकित; आयुष्याची किंमत २ लाख..."; उमा भारतींचा भाजपाला घरचा आहेर
11
PHOTOS: लग्नाच्या रोमान्सनंतर थेट टेनिस कोर्टवर... ४५ वर्षांची व्हीनस विल्यम्स रचणार इतिहास
12
Rahul Gandhi : "पाणी नाही, विष वाटलं, प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत"; राहुल गांधी आक्रमक, विचारले संतप्त सवाल
13
मनसेच्या बंडखोर उमेदवार अनिशा माजगावकर नॉट रिचेबल! खासदाराच्या मुलीविरोधात मैदानात 
14
Thane Municipal Election 2026: ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचे पाच नगरसेवक बिनविरोध विजयी
15
८५ वर्षांवरील वयोवृद्धांना यंदा मतदान केंद्रावरच यावे लागणार, केंद्रांवर ज्येष्ठांसाठी सुविधा
16
पाकिस्तानच्या हाती लागला मोठा खजिना; देशाची गरिबी दूर होणार? पीएम शरीफ म्हणाले...
17
एकटी पाहून घरात घुसला, बळजबरी करू लागला, तरुणीने कुऱ्हाड उचलली आणि...
18
KFC आणि Pizza Hut च्या पॅरेंट कंपन्यांचं होणार मेगा मर्जर; McDonald’s आणि Domino’s चं टेन्शन वाढणार
19
मुंबईत मनसेला खिंडार, एकाचवेळी ११ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; भाजपात प्रवेश, कारण काय?
20
NPS मध्ये ऐतिहासिक सुधारणा: बँका स्थापन करू शकतील पेन्शन फंड, शुल्क आणि पैसे काढण्याचे नियमही बदलले
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय आयुक्त कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 19:03 IST

सातारा जिल्ह्यातील खंडाळा एमआयडीसीच्या सुमारे ३५० प्रकल्पबाधित व खातेदार शेतक-यांनी सोमवारी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढला.

पुणे: सातारा जिल्ह्यातील खंडाळा एमआयडीसाठी केल्या जात असलेल्या भूसंपादनास  स्थानिक शेतक-यांचा विरोध आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून विविध स्तरावर निवेदने देवून न्याय मिळत नसल्याने सुमारे ३५० प्रकल्पबाधित व खातेदार शेतक-यांनी सोमवारी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढला.तसेच आयुक्तांकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने मंत्रालयाच्या दिशेने मोर्चा मार्गस्थ झाला. पुढील आठ दिवसात मोर्चा मुंबईत दाखल करण्याचे शेतकरी संघटना किसान मंचचे नियोजन आहे.

खंडाळा एमआयडीसीच्या टप्पा क्रमांक १ ,२,३ आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ साठी केसुर्डी,धनगरवाडी,शिवाजीनगर खंडाळा,बावडा,मावशी,मोर्वे ,भादे ,अहिरे या गावातील शेतक-यांच्या तब्बल दोन हजार हेक्टर जमिनीचे संपादन केले जात आहे. मात्र,केवळ ६० हेक्टर जमिनीचे संपादन करण्यास काही शेतक-यांनी संमती दर्शविली आहे. उर्वरित सर्व शेतक-यांचा भूसंपादनाच्या प्रक्रियेस विरोध असून त्यांनी याबाबत आक्षेप नोंदविला आहे. परंतु, गेल्या दहा वर्षांपासून त्यांच्या मागण्यांकडे दूर्लक्ष केले जात असल्याने प्रकल्पग्रस्त व खातेदारांनी १२ जानेवारी रोजी पायी अर्धनग्न मोर्चा सुरू केला. सोमवारी सकाळी कात्रज येथून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. सुमारे तीन तास विभागीय आयुक्तांशी शेतकरी संघटनेची झालेली चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे पुण्यातून मंत्रालयावर मोर्चा काढण्यासाठी मोर्चेकरी मार्गस्थ झाले आहेत,असे शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष प्रमोद जाधव यांनी सांगितले.

जाधव म्हणाले, शासनाने शेतक-यांच्या जमिनी कवडीमोल भावाने संपादित केल्या आहेत.तसेच ज्या प्रयोजनासाठी जमिनी स्वीकारल्या त्यासाठी वापर केला जात नाही.एमआयडीसीच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे ८५० एकर,दुस-या टप्प्यासाठी केसुर्डी गावची ८३० एकर आणि राष्ट्रीय महामार्गासाठी सुमारे १०० एकर जमिन सपादित केली आहे. मात्र,तिस-या टप्प्यामधील संपूर्ण सात गावामधील जमिन नीरा देवधर प्रकल्पातील लाभ क्षेत्रात येत असल्याने संबंधित जमिनीवरील मारलेले शिक्के काढण्यात यावेत,असे शिफारस पत्र खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिले आहे.भूसंपादनास विरोध करण्यासाठी शेतकरी संघटना किसान मंचतर्फे खंडाळा ते मत्रालयापर्यंत मोर्चा काढला जात आहे.विभागीय आयुक्तांनी शेतक-यांच्या मागण्याची पूर्तता करण्यासाठी अवधी मागितला. तसेच कोणेतेही लेखी आश्वासन दिले नाही. त्यामुळे दररोज ३० ते ४० किलोमिटर दररोज पायी प्रवास करून पुढील आठ दिवसात मोर्चा मंत्रालयावर जावून धडकणार आहे,असेही प्रमोद जाधव यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनSatara areaसातारा परिसरMIDCएमआयडीसी