शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
6
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
7
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
8
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
9
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
10
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
11
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
12
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
13
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
14
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
15
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
16
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
17
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
18
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
19
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
20
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

निम्म्या शिक्षण संस्था भ्रष्टाचाराने ग्रस्त आहेत - सत्यपाल सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:57 AM

भारत तरुणांचा देश आहे, या तरुणांना दिशा देण्यासाठी दर्जेदार शिक्षक आणि शिक्षणव्यवस्था असली पाहिजे. आज केवळ १० टक्के शिक्षण संस्था उत्कृष्ट कामगिरी करीत असून, ४० टक्क्यांपेक्षा अधिक संस्था भ्रष्टाचाराने ग्रस्त आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांनी केले.

पुणे : भारत तरुणांचा देश आहे, या तरुणांना दिशा देण्यासाठी दर्जेदार शिक्षक आणि शिक्षणव्यवस्था असली पाहिजे. आज केवळ १० टक्के शिक्षण संस्था उत्कृष्ट कामगिरी करीत असून, ४० टक्क्यांपेक्षा अधिक संस्था भ्रष्टाचाराने ग्रस्त आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांनी केले.एमआयटीच्या वतीने आयोजित दुसºया नॅशनल टीचर्स काँग्रेसच्या समारोपाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सिंग बोलत होते. या वेळी एशियन हेरिटेज फाउंडेशनचे संस्थापक राजीव सेठी, अलका सिंग, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष डी. पी. अगरवाल यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.डॉ. सिंग म्हणाले, ‘डॉक्टर, इंजिनीअर, शिक्षक, पत्रकार यांसारखी समाजाचे आरोग्य सांभाळणारी माणसे आजकाल आत्महत्या करत आहेत, गुन्हे करत आहेत. हे सगळे पाहिल्यानंतर समाजाचे आरोग्य धोक्यात आल्याचे जाणवते. सृजनशीलता, संशोधन आणि आध्यात्म यांच्या संगमातून चारित्र्यसंपन्न नागरिक घडू शकतो. मेकॉलेने आदर्श भारतीय शिक्षण व्यवस्था मोडकळीस आणली व गुलामगिरी निर्माण करणारी व्यवस्था आणली. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही आपण त्याला सावरू शकलेलो नाही.डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, ‘अनेक देश वैदिक शिक्षणाकडे वळत आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण तत्पर असले पाहिजे. सर्व प्रकारच्या शिक्षकांसाठी एखादी संस्था असली पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.’उच्च शिक्षित विद्यार्थी शिपाई पदासाठी!शिपाई पदासाठी पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतलेले उमेदवार अर्ज करीत आहेत, ही बाब चिंतेची आहे. आंतरशाखीय शिक्षणाचा उपयोग करून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करायला हवेत. तशा प्रकारची धोरणे आखली पाहिजेत, असे मत राजीव सेठी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Puneपुणे