शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

हगणदरीमुक्त जिल्हा यंदा तरी अशक्यच

By admin | Updated: March 3, 2015 22:56 IST

जानेवारीअखेरपर्यंत सुमारे १ लाख १९ हजार ४३९ कुटुंबांकडे अद्याप शौचालये नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ‘हगणदरीमुक्त जिल्हा’ मोहीम यावर्षी तरी कागदावरच राहणार आहे.

बापू बैलकर ल्ल पुणेनिर्मलग्राम मोहिमेंतर्गत जिल्हा परिषदेने ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील उर्वरित गावे हगणदरीमुक्त करण्याचा ध्यास घेतला असला, तरी जानेवारीअखेरपर्यंत सुमारे १ लाख १९ हजार ४३९ कुटुंबांकडे अद्याप शौचालये नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ‘हगणदरीमुक्त जिल्हा’ मोहीम यावर्षी तरी कागदावरच राहणार आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, स्थानिक आमदार यांच्या उपस्थितीत ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या, ग्रामस्थ आदींनी मार्च २०१५ अखेर तालुके निर्मलग्राम करण्याची शपथ घेतली होती. उर्वरित १ लाख ३६ हजार ७२८ कुटुंबांना शौचालये बांधून देऊन जिल्हा १00 टक्के हगणदरीमुक्त करण्याचा मानस आहे. यासाठी प्रत्येक तालुक्याला एक पालक अधिकारीही नेमला. मात्र जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला असता, हे उद्दिष्ट पूर्ण करणे अवघड असल्याचे चित्र आहे. यातील अडचणी वरिष्ठ पातळीवर सोडविल्या जाणे आवश्यक असताना, त्याकडे डोळेझाक करून फक्त उद्दिष्ट पूर्ण करण्याचा तगादा लावला जात असल्याचे तालुकास्तरावरून सांगितले जात आहे.१,३६,७२८ कुटुंबांपैकी जानेवारीअखेर १७,२८९ कुटुंबांनी शौचालये बांधली. अद्याप १ लाख १९ हजार ४३९ कुटुंबांकडे शौचालये नाहीत. हा अनुशेष मोठा आहे. पंचायत समिती, सरपंच, ग्रामसेवक व पदाधिकारी यांच्यावर असलेली ही जबाबदारी ते मार्चअखेर किती पार पडतात याकडे लक्ष लागले आहे.४शासनाने दिलेले उद्दिष्ट मात्र सुमारे ८0 टक्के पूर्ण झाले आहे. अजून एक महिना असून, उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वास उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) राहुल साकोरे यांनी व्यक्त केला. शासनाने २४,७८५ शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी १७,२८९ शौचालये बांधली आहेत. २२८ गावे निर्मलग्राम पुरस्कार करावयाची होती, त्यातील ३0 गावे निर्मलग्राम पुरस्कारप्राप्त झाली आहेत. विभक्त कुटुंबांमुळे आकडा वाढला४भोर तालुक्यात फक्त ३८७ कुटुंबांकडे शौचालये बांधणे बाकी आहे असे पंचायत समितीतून सांगण्यात आले; मात्र जिल्हा परिषदेतून घेतलेल्या आकडेवारीवरून तेथे जानेवारी अखेरपर्यंत २३६५ कुटुंबांकडे शौचालये नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत पालक अधिकारी नितीन माने यांना विचारले असता, निर्मल ग्राम पुरस्कारप्राप्त गावांव्यतिरिक्त गावांतील काम हाती घेतले होते. यातील फक्त ३८७ कुटुंबे शिल्लक आहेत. विभक्त कुटुंबांमुळे हा आकडा जास्त दिसत आहे. खेडमध्ये १३ हजार ३७५ कामे बाकी४खेड तालुक्यात ६६४१ कुटुंबांकडे शौचालये नसल्याचे जिल्हा परिषद प्रशासन सांगत आहे. मात्र, प्रत्यक्षात तिथे १३ हजार ३७५ शौचालयांची कामे बाकी आहेत. फेबु्रवारीत १६४ कामे पूर्ण झाली आहेत. अजून काही गावांचा अहवाल पंचायत समितीला दाखल झाला नसल्याचे गटविकास अधिकारी अजिंक्य पवार यांनी सांगितले. जानेवारी २0१५ अखेरपर्यंत जिल्ह्यातील निर्मलग्रामची स्थितीतालुका कुटुंबे किती बांधली शिल्लकआंबेगाव ४३६८४ १८९८ ५0७२बारामती ५४७६४ १00२ ९४४२भोर ३१८२४ १९२१ २३६५दौंड ४९0९९ १२१८ १४७२३जुन्नर ६६७३८ ८१७ ८१९३खेड ६0७१८ १४३५ ६६४१मावळ ३९६९२ ८७३ १0३४२मुळशी २७६५५ २५0९ ४४४पुरंदर ३४0७२ ११८८ ७६६६शिरूर ५५५२६ १७0३ १३१६३वेल्हे १११९९ ४६३ १४८३एकूण ६३९१६९ १७२८९ ११९४३९