शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

गोवारीकरांनी ‘पानिपत’ करताना केला ‘विश्वास’घात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 13:50 IST

बौध्दिक संपदेची चोरी केल्याचा आरोप

ठळक मुद्देविश्वास पाटील यांची उच्च न्यायालयात धावचित्रपटाची कथा, प्रसंग, पात्रे आपल्या कादंबरीवर बेतलेली आहेत, असा आरोप

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक ‘पानिपतकार’ विश्वास पाटील यांनी आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ या चित्रपटाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. चित्रपटाची कथा, प्रसंग, पात्रे आपल्या कादंबरीवर बेतलेली आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. चित्रपटासाठी पूर्वपरवानगी न घेतल्याने कॉपीराईट कायद्याचा भंग झाला असून, बौध्दिक संपदेची चोरी झाल्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. आशुतोष गोवारीकर प्रोडक्शन्स, निर्माते रोहित शेलाटकर, सुनिता गोवारीकर आणि रिलायन्स एंटरटेनमेंटकडून भरपाईची मागणी केली आहे. विश्वास पाटील यांच्या परवानगीशिवाय त्यांची ‘पानिपत’ ही लोकप्रिय कादंबरी आणि ‘रणांगण’ या नाटकातील प्रसंग, कथा आणि बरासचा भाग चोरल्याचे त्यांचे म्हणणे आहे.‘लोकमत’शी बोलताना विश्वास पाटील म्हणाले, माझ्या ‘पानिपत’ या कादंबरीतील आत्मा आणि ध्येयाचीच चित्रपटाद्वारे चोरी करण्यात आली आहे. कादंबरी १९८८ मध्ये प्रकाशित झाली. त्यापूर्वी पानिपतची लढाई म्हणजे पराभव, काळिमा असेच मानले जायचे. जबाबदार इतिहासकारांनीही याबाबात हिणकसपणे लिहिले. मी पानिपतबाबत खूप संशोधन केले, कागदपत्रांचा अभ्यास केला आणि त्यातील अभिमानास्पद बाब, लढवय्या भूमिका वाचकांसमोर आणल्या. ‘पानिपत’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर धक्काच बसला. वाड:मयचौर्याविरोधात न्याय मिळावा, यासाठी मी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.कान्स फिल्म फेस्टिव्हलदरम्यान, रोहित शेलटकर हे लेखक संजय पाटील यांना भेटले आणि ‘पानिपत’विषयी चर्चा केली. संजय पाटील यांनी संहिता लिहिली आणि शेलटकर यांच्या मुंबईमधील आॅफिसमध्ये संहितेचे वाचनही झाले. संजय पाटील यांनी संहिता लिहिण्यापूर्वी विश्वास पाटील यांची परवानगीही घेतली होती. मात्र, कालांतराने रोहित शेलटकर यांनी संजय पाटील यांच्यापासून फारकत घेत विषयच थांबवला. ‘पानिपत’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर धक्काच बसला. आपल्या कादंबरीतील पात्रे, घटना, प्रसंग आणि बराचदा भाग पूर्वपरवानगीशिवाय चोरला गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे २३ नोव्हेंबर रोजी या प्रकरणाबाबत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. दिग्दर्शक, निर्मात्याकडून संहिता मागवून घेणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे विश्वास पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.‘पानिपत’विषयी...विश्वास पाटील यांना १९९२मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ‘महानायक’ आणि ‘झाडाझडती’ या त्यांच्या कादंबरीही वाचकांमध्ये लोकप्रिय ठरल्या. ‘पानिपत’ ही कादंबरी १९८८ मध्ये प्रकाशित झाली. कादंबरीच्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन १९९१ मध्ये झाले. त्यानंतर गुजराती, पंजाबी, कन्नड आणि इतर अनेक भाषांमध्ये ‘पानिपत’ने ठसा उमटवला. भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये कादंबरीच्या जवळपास तीन लाख प्रतींची आजवर विक्री झाली आहे. विश्वास पाटील यांनी ‘पानिपत’ या कादंबरीवर आधारित ‘रणांगण’ हे नाटक लिहिले. वामन केंद्रे यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले. दिल्ली, जबलपूर, गोवा, हैदराबाद आणि इतर अनेक शहरांमध्ये ‘रणांगण’चे जवळपास ४०० प्रयोग सादर झाले. ‘पानिपत’ या कादंबरीपूर्वी इतिहासातील या घटनेकडे कधीच अभिमानाने पाहण्यात आले नव्हते. विश्वास पाटील यांनी या विषयावर तब्बल ८ वर्ष संशोधन केले. पानिपतच्या लढाईचे विविध कंगोरे बारकाईने जाणून घेतले आणि भाऊसाहेब या लढवय्याची ओळख महाराष्ट्रालाच नव्हे, तर साºया देशाला करुन दिली.

......

बौध्दिक संपदेचे रक्षण करणे, मला महत्वाचे वाटते. कवी, लेखक यांना मिळणारे उत्पन्न खूप कमी असते. त्यामुळे ते शक्यतो कोर्टाच्या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळे दिग्दर्शक, निर्माते वाड:मयचौर्याचे धाडस करुन लेखकांचे नुकसान करतात. ‘पानिपत’च्या निमित्ताने दिग्दर्शक, निर्मात्यांना धडा शिकवावा, यासाठी मी हे पाऊल उचलले आहे.- विश्वास पाटील

टॅग्स :PuneपुणेPanipat MovieपानिपतAshutosh Gowarikarआशुतोष गोवारिकरVishwash Patilविश्वास पाटील cinemaसिनेमा