शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

अस्वस्थ करणा-या घटनांमुळे समाजात एकप्रकारचे भीतीचे वातावरण - गोविंद निहलानी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 8:15 PM

ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी आजची वास्तविकता समाजासमोर येईल असे चित्रपट निर्माण होण्याची गरज व्यक्त केली.

पुणे, दि. 16 -  अस्वस्थ करणाऱ्या घटनांमुळे समाजात एकप्रकारचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजात नक्की काय चाललंय हे कुणीच समजू शकलेले नाही. ते जाणून घ्यायचे झाल्यास धोका पत्करावा लागतो आणि ते धाडस केले तर शांतीपूर्ण जीवन कदाचित जगू शकणार नाही अशी धास्ती लोकांना वाटते, अशा शब्दात समाजातील मानसिकतेवर बोट ठेवत ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी आजची वास्तविकता समाजासमोर येईल असे चित्रपट निर्माण होण्याची गरज व्यक्त केली.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय व फेडरेशन आॅफ फिल्म सोसायटीज आॅफ इंडिया यांच्यातर्फे आयोजित रसास्वाद सिनेमाचा या शिबिराच्या समारोप वेळी ते बोलत होते. संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक श्यामला वनारसे, सुषमा दातार आणि समन्वय सतीश जकातदार उपस्थित होते. गोविंद निहलानी यांच्या ती आणि इतर या चित्रपटाच्या अंगाने यावेळी चर्चा झाली. 

जेव्हा कधी अस्वस्थ करणाऱ्या घटना घडतात तेव्हा समाज हा पूर्णतः गोंधळलेल्या आणि भयग्रस्त वातावरणात असतो. शोषण आणि गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात  आपल्याला आवाज तर उठवायचा असतो पण अपल्याला किन्वा कुटुंबाला काही होणार तर नाही ना? याची धास्ती  कायम असते.वास्तविक जगाला तोंड देणे इतके सोपे नसते, अशी समाजाची मानसिक अवस्था त्यांनी नेमकेपणे मांडली.

चित्रपट आणि नाटक यात विशेष फरक नसल्याचे सांगून निहलानी पुढे म्हणाले की समांतर चित्रपट आला तेव्हा हे नाटक आहे की चित्रपट ही चर्चा व्हायची. संवाद जास्त , एकाच ठिकाणचे दृष्य नसणे म्हणजे चित्रपट असे समजले जायचे. चित्रपट माध्यमाची जी बलस्थाने आहेत, त्याचा वापर व्हावा असा मतप्रवाह होता. मात्र फॉर्म कोणताही असो त्यातील आशय आणि मांडणी महत्वपूर्ण असते. जसे चित्र एक रंगाने काय किंवा पन्नास रंगांनी रंगविले तरी  त्यातून व्यक्त होणे गरजेचे असते.  आज दोन्ही माध्यमातील अंतर कमी झाले आहे. चांगल्या ठिकाणचे चित्रीकरण आणि मोठे कॅमेरे हे गरजेचेच असते असे नाही. माध्यम कुठलेही असले तरी त्यातून प्रभावशाली कलाकृती समोर येणे आवश्यक आहे. समारोपानंतर शिबिरात सहभागी प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्रे देण्यात आली.