शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांनीच धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यावा; 'आप' ची मागणी

By राजू इनामदार | Updated: February 21, 2025 15:29 IST

कायदाच असे सांगतो की, खासदार किंवा आमदार गुन्ह्यांसाठी दोषी आढळल्यास त्यांना अपीलासाठी ३ महिन्यांचा कालावधी न देता सभागृहाचे सदस्यत्व त्वरीत रद्द करावे

पुणे: महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनीच आता राज्य सरकारमधील दोन मंत्र्यांचे त्वरीत राजीनामे घ्यावेत अशी मागणी आम आदमी पार्टीने (आप) केली. अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे व कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे दोघेही गुन्हेगारी कृत्याशी संबधित गोष्टींमुळे अडचणीत आले आहेत, त्यातील कोकाटे यांनी तर न्यायालयाने शिक्षाही सुनावली आहे, तरीही ते राजीनामे द्यायला तयार नसल्याने आता राज्यपालांनीच यात भूमिका घ्यावे असे आप ने म्हटले आहे.

आप चे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सांगितले की, यासंदर्भात कायदाच असे सांगतो की खासदार किंवा आमदार गुन्ह्यांसाठी दोषी आढळल्यास, त्यांना अपीलासाठी तीन महिन्यांचा कालावधी न देता त्यांचे सभागृहाचे सदस्यत्व त्वरीत रद्द करावे, त्यांना अपात्र ठरवावे. यातील मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप होत आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घातल्याचा त्यांच्यावर होत असलेला आरोप गंभीर आहे, त्याचबरोबर कृषीमंत्री असताना त्यांनी कोट्यवधीचे घोटाळे केल्याचे पुरावेही दिले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सांगत आहेत. असे असताना त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ त्यांना पाठीशी घालत आहेत, आरोप झाले म्हणून कोणी दोषी होत नाही असे समर्थन करत आहेत.

दुसऱ्या प्रकरणात कृषीमंत्री कोकाटे यांनी न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा व ५० हजार रूपये दंड ठोठावला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याची खोटी कागदपत्रे सरकारला सादर करून त्यांनी व त्यांच्या बंधूंनी सरकारी सदनिका लाटली असल्याचे पुराव्याने सिद्ध झाले असल्यानेच त्यांना न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. मात्र त्याचबरोबर अपील करण्याची संधी दिली आहे. तेच कारण देत कोकाटेही आपण राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही असे सांगत आहेत. हा निर्लज्जपणाचा कळस असल्याची टीका किर्दत यांनी केली. हा प्रकार तर कायद्याचा भंग करणारा आहे, कोकाटे यांच्यामध्ये नैतिकता नसली तरी कायद्यासमोर सगळे समान असल्याने ते राजीनामा देत नसलीत तर पक्षनेतृत्वाने तो घेतला पाहिजे मात्र याही प्रकरणात त्यांच्या पक्षाचे नेते त्यांना पाठबळच देत आहेत.

भारतीय लोकशाहीचे वैशिष्ट्य असे आहे की अशा प्रकारचा पेच निर्माण होत असेल तर त्यात काय करायला हवे याचे स्पष्ट दिशादर्शन त्यात आहे. या प्रकरणात राज्यपाल योग्य भूमिका घेऊ शकतात. घटनेनेच त्यांना तसा अधिकार दिला आहे. ते सरकारचे घटनात्मक प्रमुख आहेत. सरकारचे नेतृत्व या दोघांचे राजीनामे घेत नसेल, त्यांच्या पक्षाचे नेतेही त्यांना पाठीशी घालत असतील तर आता राज्यपालांनीच आपला घटनेने दिलेला अधिकार अमलात आणावा व दोघांचेही राजीनामे त्वरीत घ्यावेत अशी मागणी किर्दत यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेAam Admi partyआम आदमी पार्टीDhananjay Mundeधनंजय मुंडेManikrao Kokateमाणिकराव कोकाटेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार