शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

३७० कलमानंतर आरक्षणही रद्द करण्याचा सरकारचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 16:27 IST

पुण्यात वडार समाजाच्या वतीने सत्ता संपादन मेळाव्याचे आयोजन केले होते़.  मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ . 

पुणे : आरएसएस हे आरक्षणवादी नाही़. ज्याप्रमाणे जम्मू काश्मीरमध्ये मुक्ती मोहम्मदसाहेबांचा वापर करुन नंतर ३७० कलम रद्द केले़,त्याप्रमाणे महाराष्ट्र, हरियाणा, झारखंडच्या निवडणुका संपल्यानंतर संपूर्ण सत्ता त्यांच्या ताब्यात येणार आहे़,त्यामुळे ते आरक्षण संपविल्याशिवाय राहणार नाही़, आरक्षित वर्गाने सावध होणे हीच वेळ आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले़.  पुण्यात वडार समाजाच्या वतीने सत्ता संपादन मेळाव्याचे आयोजन केले होते़.  मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ . अ‍ॅड़ आंबेडकर यांनी सांगितले की, भाजपाने वंचित समाजाला केवळ आश्वासने दिली़. मात्र त्यांना सत्ता दिली नाही़ तर आरक्षण संदर्भात मोहन भागवत यांनी आरक्षणावर समीक्षा झाली पाहिजे, असे म्हटले आहे़.  त्यामुळे ते आरक्षण संपविल्याशिवाय राहणार नाहीत़.  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी म्हणून अस्तित्व कमी होऊ लागले आहे़. त्यामुळे ज्यांना जिंकून येणार नाही असे वाटते ते जिंकणारा पक्ष म्हणून भाजपमध्ये जात आहे़.  ज्यांनी भ्रष्टाचार केला ते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवाले भाजपमध्ये जात आहे़.  त्यामुळे भाजप चोरांचा पक्ष होतोय का असा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले़ . २ जी घोटाळा झाला तेव्हा बीजेपी, आरएसएस, अण्णा हजारे पुढे आले़ मात्र, त्यांना सोडल्यावर अण्णा झोपले होते आणि भाजपने पुरावा दिला नसल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला़.  आघाडी संदर्भात आम्ही काँग्रेसला ऑफर दिली आहे़. . आमची उद्या आणि परवा बैठक आहे़.  त्यात निर्णय होईल़ वेळ कमी असून आम्ही कोणासाठी थांबणार नाही़.  आम्ही पुढे आगेकुच करणाऱ आमच्याच पक्षातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना आम्ही उमेदवारी देणार आहोत़ बाहेरच्या उमेदवारांना आम्ही उमेदवारी देणार नसल्याचे आंबेडकर यांनी सांगितले़.  मेळाव्यात बोलताना ते म्हणाले, आपली सत्तास्थाने धोक्यात आल्यावर ते सर्व भाजपमध्ये जात आहे़ मावळे गेले, आता राजेही जात आहे़.  इतकी वर्षे त्यांनी सर्व निधी स्वत:साठी वापरला़,निधीची कमरतता नाही़. ती उपेक्षित समाजाला देण्याची नियत पाहिजे़ त्यासाठी आपण सत्तेत बसले पाहिजे़ इलेक्शन म्हणजे स्वत:ला विकण्याचा दिवस हे बंद झाले पाहिजे़ यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव नवनाथ पडळकर, अनिता जाधव, प्रभावती वाडकर, प्रियंका सोळंकी यांची भाषणे झाली़ महासचिव अनिल जाधव यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते़ या मेळाव्यात अनेकांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला़ .   

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBJPभाजपा