शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

३७० कलमानंतर आरक्षणही रद्द करण्याचा सरकारचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 16:27 IST

पुण्यात वडार समाजाच्या वतीने सत्ता संपादन मेळाव्याचे आयोजन केले होते़.  मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ . 

पुणे : आरएसएस हे आरक्षणवादी नाही़. ज्याप्रमाणे जम्मू काश्मीरमध्ये मुक्ती मोहम्मदसाहेबांचा वापर करुन नंतर ३७० कलम रद्द केले़,त्याप्रमाणे महाराष्ट्र, हरियाणा, झारखंडच्या निवडणुका संपल्यानंतर संपूर्ण सत्ता त्यांच्या ताब्यात येणार आहे़,त्यामुळे ते आरक्षण संपविल्याशिवाय राहणार नाही़, आरक्षित वर्गाने सावध होणे हीच वेळ आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले़.  पुण्यात वडार समाजाच्या वतीने सत्ता संपादन मेळाव्याचे आयोजन केले होते़.  मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ . अ‍ॅड़ आंबेडकर यांनी सांगितले की, भाजपाने वंचित समाजाला केवळ आश्वासने दिली़. मात्र त्यांना सत्ता दिली नाही़ तर आरक्षण संदर्भात मोहन भागवत यांनी आरक्षणावर समीक्षा झाली पाहिजे, असे म्हटले आहे़.  त्यामुळे ते आरक्षण संपविल्याशिवाय राहणार नाहीत़.  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी म्हणून अस्तित्व कमी होऊ लागले आहे़. त्यामुळे ज्यांना जिंकून येणार नाही असे वाटते ते जिंकणारा पक्ष म्हणून भाजपमध्ये जात आहे़.  ज्यांनी भ्रष्टाचार केला ते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवाले भाजपमध्ये जात आहे़.  त्यामुळे भाजप चोरांचा पक्ष होतोय का असा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले़ . २ जी घोटाळा झाला तेव्हा बीजेपी, आरएसएस, अण्णा हजारे पुढे आले़ मात्र, त्यांना सोडल्यावर अण्णा झोपले होते आणि भाजपने पुरावा दिला नसल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला़.  आघाडी संदर्भात आम्ही काँग्रेसला ऑफर दिली आहे़. . आमची उद्या आणि परवा बैठक आहे़.  त्यात निर्णय होईल़ वेळ कमी असून आम्ही कोणासाठी थांबणार नाही़.  आम्ही पुढे आगेकुच करणाऱ आमच्याच पक्षातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना आम्ही उमेदवारी देणार आहोत़ बाहेरच्या उमेदवारांना आम्ही उमेदवारी देणार नसल्याचे आंबेडकर यांनी सांगितले़.  मेळाव्यात बोलताना ते म्हणाले, आपली सत्तास्थाने धोक्यात आल्यावर ते सर्व भाजपमध्ये जात आहे़ मावळे गेले, आता राजेही जात आहे़.  इतकी वर्षे त्यांनी सर्व निधी स्वत:साठी वापरला़,निधीची कमरतता नाही़. ती उपेक्षित समाजाला देण्याची नियत पाहिजे़ त्यासाठी आपण सत्तेत बसले पाहिजे़ इलेक्शन म्हणजे स्वत:ला विकण्याचा दिवस हे बंद झाले पाहिजे़ यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव नवनाथ पडळकर, अनिता जाधव, प्रभावती वाडकर, प्रियंका सोळंकी यांची भाषणे झाली़ महासचिव अनिल जाधव यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते़ या मेळाव्यात अनेकांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला़ .   

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBJPभाजपा