शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

देशात फॅस्टिटवादी विचारसरणीच्या आधारे कारभार सुरु : कुमार केतकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 16:55 IST

देशात फॅसिस्ट विचारसरणीच्या आधारे राजकारभार सुरु असल्याटी टीका खासदार कुमार केतकर यांनी केली आहे.

पुणे :  संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक लक्ष्मण शास्त्री जाेशी यांच्यावर धर्मनिरपेक्ष आणि समानतेच्या विचारांचा माेठा पगडा हाेता. अंधश्रद्धा, धार्मिक असहिष्णुता, जमावाद्वारे होणारे गैरकृत्यासारख्या विचारात ते सतत लढत राहिले. जर्मनीत हिटलरचा उदय होऊन जगात फॅसिस्टवादी विचारसरणीचा प्रचार झाला. त्यामुळे जगाचे आतोनात नुकसान झाले. आजही देशात फॅसिस्टवादी विचारसरणीच्या आधारे राजकारभार चालविला जात आहे, जो देशाचा सर्वात मोठा शत्रू आहे.” असे विचार खासदार आणि जेष्ठ विचारवंत कुमार केतकर यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे डॉ. अरूधंती खांडकर यांनी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्यावर लिहिलेल्या ‘स्वीमिंग अपस्ट्रीम’ या पुस्तकाच्या प्रकाशन झाले. त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड हे उपस्थित होते.

केतकर म्हणाले,“ विचार, तत्वज्ञ, विज्ञान व तंत्रज्ञान आणि कल्पनांचा नेतृत्व करणारे राज्य महाराष्ट्र आहे. हे राज्य शाहु, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांच्या पायावर भक्कमपणे उभारलेला आहे. येथील तत्वज्ञांनांनी आणि विचारवंतांनी विज्ञानाची कास धरण्याचा विचार मांडला आहे. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे ब्राम्हण म्हणून जन्माला आले असले, तरी त्यांनी ब्राम्हणी व्यवस्थेला विरोध केला. ते अंधश्रद्धा आणि अस्पृश्य विचारसरणीच्या विरोधात उभे राहिले. त्यांना समानतेच्या तत्वावर आधारीत समाज हवा होता. त्यांचा आग्रह म्हणजे विज्ञानाच्या मूल्यांवर सर्व बाबी पडताळून पाहणे. सध्या देशात फॅसिस्टवादी विचारसरणींचा बोलबाला आहे. नागरिकांना भ्रमित करून त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेतला जात आहे. गांधीजी आणि कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर असला तरी ते हिंदुइझमच्या विरोधात नव्हते.”

टॅग्स :PuneपुणेmitएमआयटीCentral Governmentकेंद्र सरकार