शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

देशात फॅस्टिटवादी विचारसरणीच्या आधारे कारभार सुरु : कुमार केतकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 16:55 IST

देशात फॅसिस्ट विचारसरणीच्या आधारे राजकारभार सुरु असल्याटी टीका खासदार कुमार केतकर यांनी केली आहे.

पुणे :  संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक लक्ष्मण शास्त्री जाेशी यांच्यावर धर्मनिरपेक्ष आणि समानतेच्या विचारांचा माेठा पगडा हाेता. अंधश्रद्धा, धार्मिक असहिष्णुता, जमावाद्वारे होणारे गैरकृत्यासारख्या विचारात ते सतत लढत राहिले. जर्मनीत हिटलरचा उदय होऊन जगात फॅसिस्टवादी विचारसरणीचा प्रचार झाला. त्यामुळे जगाचे आतोनात नुकसान झाले. आजही देशात फॅसिस्टवादी विचारसरणीच्या आधारे राजकारभार चालविला जात आहे, जो देशाचा सर्वात मोठा शत्रू आहे.” असे विचार खासदार आणि जेष्ठ विचारवंत कुमार केतकर यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे डॉ. अरूधंती खांडकर यांनी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्यावर लिहिलेल्या ‘स्वीमिंग अपस्ट्रीम’ या पुस्तकाच्या प्रकाशन झाले. त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड हे उपस्थित होते.

केतकर म्हणाले,“ विचार, तत्वज्ञ, विज्ञान व तंत्रज्ञान आणि कल्पनांचा नेतृत्व करणारे राज्य महाराष्ट्र आहे. हे राज्य शाहु, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांच्या पायावर भक्कमपणे उभारलेला आहे. येथील तत्वज्ञांनांनी आणि विचारवंतांनी विज्ञानाची कास धरण्याचा विचार मांडला आहे. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे ब्राम्हण म्हणून जन्माला आले असले, तरी त्यांनी ब्राम्हणी व्यवस्थेला विरोध केला. ते अंधश्रद्धा आणि अस्पृश्य विचारसरणीच्या विरोधात उभे राहिले. त्यांना समानतेच्या तत्वावर आधारीत समाज हवा होता. त्यांचा आग्रह म्हणजे विज्ञानाच्या मूल्यांवर सर्व बाबी पडताळून पाहणे. सध्या देशात फॅसिस्टवादी विचारसरणींचा बोलबाला आहे. नागरिकांना भ्रमित करून त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेतला जात आहे. गांधीजी आणि कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर असला तरी ते हिंदुइझमच्या विरोधात नव्हते.”

टॅग्स :PuneपुणेmitएमआयटीCentral Governmentकेंद्र सरकार