शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
2
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
3
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
4
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
5
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
6
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
7
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
8
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
9
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
10
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
11
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
12
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
14
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
15
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
16
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
17
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
18
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
19
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
20
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

थापांचा पाऊस पाडणाऱ्या सरकारला दुष्काळ दिसेना- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 1:32 AM

केंद्रातील मोदी सरकार थापाडे आहे. योजना, आश्वासने आणि थापांचा पाऊस पाडणा-या सरकारला दुष्काळ कुठे आहे, हे दिसत नाही.

खेड/राजगुरुनगर : ‘‘केंद्रातील मोदी सरकार थापाडे आहे. योजना, आश्वासने आणि थापांचा पाऊस पाडणा-या सरकारला दुष्काळ कुठे आहे, हे दिसत नाही. या दुष्काळात गाजराची शेती मात्र बहरली आहे,’’ अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.राजगुरुनगर येथे सोमवारी शेतकरी मेळावा तसेच क्रांतिकारकांच्या स्मारकाचे अनावरण व हुतात्मा राजगुरू पुलाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी झालेल्या सभेत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. या प्रसंगी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, खासदार श्रीरंग बारणे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार नीलम गोºहे, सुरेश गोरे व गौतम चाबुकस्वार, संपर्क नेते रवींद्र मिर्लेकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, जिल्हाप्रमुख राम गावडे, जिल्हा महिला संघटक विजया शिंदे, माजी सभापती रामदास ठाकूर, तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘सरकार शेतकºयांना फसवत आहे. दुष्काळी परिस्थिती असताना दुष्काळ त्यांना दिसत नाही. योजना आणि थापांचा पाऊस त्यांचा सुरू आहे.’’ केवळ गाजराची शेती बहरली आहे, असा टोला त्यांनी केंद्र सरकारच्या कामावर लगावला. संपूर्ण कर्जमुक्तीची शिवसेनेची मागणी असताना कुचकामी व फसवी कर्जमाफी देऊन महाराष्ट्रातील शेतकºयांना फसविण्यात आले.खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील म्हणाले, ‘‘खेडमध्ये राजगुरूंच्या नावाने अनेक संघटना आहेत; मात्र कोणीही यथोचित स्मारक उभारले नाही. १९७८मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते यापूर्वीच्या अर्धपुतळ्याचे उद्घाटन झाले होते. त्या वेळेस त्यांनी तिन्ही शहिदांचे पुतळे उभारण्याची सूचना केली होती. आज ४० वर्षांनी ते पूर्णत्वास आले आहे. डॉ. आंबेडकरांचेही भव्य स्मारक उभारण्याची मागणी आहे. आगामी काळात हे स्मारक उभारले जाईल.’’या वेळी आढळराव यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला. खेड तालुका हा सर्वांत आवडीचा मतदारसंघ असल्याने येथे जास्तीस जास्त निधी देणार असल्याचे त्यांनी नमूद केले. येथील दिलावरखान स्मारक आतापर्यंत सर्वांकडून दुर्लक्षित राहिले; मात्र आपण केंद्रीय पुरातत्त्व खात्याकडे पाठपुरावा करून त्याला ३ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. येथील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी अथक पाठपुरावा करून केदारेश्वर पूल बांधला आहे. बनकरफाटा ते राजगुरुनगर हा नवीन राष्ट्रीय महामार्ग निर्माण करणार आहे. बैलगाडा शर्यतीत अडथळे आणणाºया पेटा संघटनेला धडा शिकवणार आहे, असे ते म्हणाले. या वेळी आमदार सुरेश गोरे यांनी तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेतला. जिल्हा समन्वयक गणेश सांडभोर यांनी आभार मानले.>अजित पवारांना धरणांकडे फिरकू देऊ नकासध्या राष्ट्रवादी पक्षाची भीती वाटते, कारण धरणे सुकू लागली आहेत. धरणांच्या आजूबाजूलाही अजित पवारांना फिरकू देऊ नका, अशी उपरोधिक टीका त्यांनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. न्यायासाठी माझी भूमिका असून ती सरकारविरोधात असली तरी मला त्याची फिकीर नसल्याचे ठाकरे म्हणाले. भगव्याचे राज्य येणारच, असे सांगून बैलगाडा शर्यत सुरू करणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे