शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Nitin Raut: भाजपने लावलेल्या सवयीमुळेच सरकार अडचणीत; वीजबिल प्रत्येकाला भरावेच लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 18:59 IST

महावितरणवर ५६ हजार कोटींचा बोजा आला आहे. हे पैसे महावितरण कुठून आणणार

पुणे : राज्यात शेतकऱ्यांच्या वीजपुरवठा गेल्या काही दिवसापासून महावितरणने पुर्णपणे खंडित केला होता. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून, जनावरांच्या व माणसांच्या पिण्याचा प्रश्न गंभीर झाल्याचे दिसून आले. त्यावर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलने केली. तर काही मंत्र्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा दिला. त्यावर भाष्य करताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

''भाजपने लावलेल्या सवयीमुळेच महावितरण अडचणीत असल्याचे ते म्हणाले आहेत. तर वीजबिल प्रत्येकाला भरावेच लागणार असेही त्यांनी यावेळी संगितले आहे. पुण्यात बावधन येथे नाना पटोले यांच्या मुलीच्या लग्नात आले होते. याप्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

राऊत म्हणाले, वीज फुकटात कधीपासून मिळायला लागली. वीज फुकटात तयार होते की, हवेतून तयार होते की पाण्यातून तयार होते. विजेला लागणारा कोळसा विकत घ्यावा लागतो, विजेचा प्लांट चालवण्यासाठी पैसे लागतात. कर्ज काढावे लागते, त्यासाठी बँकेला व्याज द्यावे लागते. मग वीज वापरता तर बिल देण्यासाठी अडचण काय आहे.

''मी जेव्हापासून या खात्याचा पदभार सांभाळला तेव्हापासून २४ तास वीजपुरवठा देण्याचा प्रयत्न केला. चक्रीवादळाच्या, अतिवृष्टीच्या काळातही हा प्रयत्न केला. मुंबई अंधारात असतानाही सातत्याने वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न केला याकडे कुणाचाही लक्ष नाही. शेतकऱ्यांसाठी आम्ही कृषीपंप, विजजोडणीचा कार्यक्रम आणला. भरलेल्या वीजबिलातून ६६ टक्के रक्कम ही संबंधित जिल्ह्याला दिली जाते. त्यातून विजेचे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करू शकता, नवीन ट्रान्सफॉर्मर घेता येऊ शकतात, नवीन लाईन टाकता येते तर मग विजेचे बिल का भरत नाहीत असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. महावितरणवर ५६ हजार कोटींचा  बोजा आला आहे. हे पैसे महावितरण कुठून आणणार. त्यामुळे लोकांना वीजबिल प्रत्येकाला भरावेच लागेल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.'' 

टॅग्स :PuneपुणेNitin Rautनितीन राऊतmahavitaranमहावितरणelectricityवीजFarmerशेतकरी