शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

Nitin Raut: भाजपने लावलेल्या सवयीमुळेच सरकार अडचणीत; वीजबिल प्रत्येकाला भरावेच लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 18:59 IST

महावितरणवर ५६ हजार कोटींचा बोजा आला आहे. हे पैसे महावितरण कुठून आणणार

पुणे : राज्यात शेतकऱ्यांच्या वीजपुरवठा गेल्या काही दिवसापासून महावितरणने पुर्णपणे खंडित केला होता. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून, जनावरांच्या व माणसांच्या पिण्याचा प्रश्न गंभीर झाल्याचे दिसून आले. त्यावर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलने केली. तर काही मंत्र्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा दिला. त्यावर भाष्य करताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

''भाजपने लावलेल्या सवयीमुळेच महावितरण अडचणीत असल्याचे ते म्हणाले आहेत. तर वीजबिल प्रत्येकाला भरावेच लागणार असेही त्यांनी यावेळी संगितले आहे. पुण्यात बावधन येथे नाना पटोले यांच्या मुलीच्या लग्नात आले होते. याप्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

राऊत म्हणाले, वीज फुकटात कधीपासून मिळायला लागली. वीज फुकटात तयार होते की, हवेतून तयार होते की पाण्यातून तयार होते. विजेला लागणारा कोळसा विकत घ्यावा लागतो, विजेचा प्लांट चालवण्यासाठी पैसे लागतात. कर्ज काढावे लागते, त्यासाठी बँकेला व्याज द्यावे लागते. मग वीज वापरता तर बिल देण्यासाठी अडचण काय आहे.

''मी जेव्हापासून या खात्याचा पदभार सांभाळला तेव्हापासून २४ तास वीजपुरवठा देण्याचा प्रयत्न केला. चक्रीवादळाच्या, अतिवृष्टीच्या काळातही हा प्रयत्न केला. मुंबई अंधारात असतानाही सातत्याने वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न केला याकडे कुणाचाही लक्ष नाही. शेतकऱ्यांसाठी आम्ही कृषीपंप, विजजोडणीचा कार्यक्रम आणला. भरलेल्या वीजबिलातून ६६ टक्के रक्कम ही संबंधित जिल्ह्याला दिली जाते. त्यातून विजेचे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करू शकता, नवीन ट्रान्सफॉर्मर घेता येऊ शकतात, नवीन लाईन टाकता येते तर मग विजेचे बिल का भरत नाहीत असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. महावितरणवर ५६ हजार कोटींचा  बोजा आला आहे. हे पैसे महावितरण कुठून आणणार. त्यामुळे लोकांना वीजबिल प्रत्येकाला भरावेच लागेल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.'' 

टॅग्स :PuneपुणेNitin Rautनितीन राऊतmahavitaranमहावितरणelectricityवीजFarmerशेतकरी