शहरं
Join us  
Trending Stories
1
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
2
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
3
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
5
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
6
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
7
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
8
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
9
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
10
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
11
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
12
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
13
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
14
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
15
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार
16
वायुप्रदूषणामुळे भारतात २०२३ मध्ये झाले २० लाख मृत्यू, संशोधन अहवालातील माहिती
17
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
18
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
19
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
20
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?

Nitin Raut: भाजपने लावलेल्या सवयीमुळेच सरकार अडचणीत; वीजबिल प्रत्येकाला भरावेच लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 18:59 IST

महावितरणवर ५६ हजार कोटींचा बोजा आला आहे. हे पैसे महावितरण कुठून आणणार

पुणे : राज्यात शेतकऱ्यांच्या वीजपुरवठा गेल्या काही दिवसापासून महावितरणने पुर्णपणे खंडित केला होता. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून, जनावरांच्या व माणसांच्या पिण्याचा प्रश्न गंभीर झाल्याचे दिसून आले. त्यावर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलने केली. तर काही मंत्र्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा दिला. त्यावर भाष्य करताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

''भाजपने लावलेल्या सवयीमुळेच महावितरण अडचणीत असल्याचे ते म्हणाले आहेत. तर वीजबिल प्रत्येकाला भरावेच लागणार असेही त्यांनी यावेळी संगितले आहे. पुण्यात बावधन येथे नाना पटोले यांच्या मुलीच्या लग्नात आले होते. याप्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

राऊत म्हणाले, वीज फुकटात कधीपासून मिळायला लागली. वीज फुकटात तयार होते की, हवेतून तयार होते की पाण्यातून तयार होते. विजेला लागणारा कोळसा विकत घ्यावा लागतो, विजेचा प्लांट चालवण्यासाठी पैसे लागतात. कर्ज काढावे लागते, त्यासाठी बँकेला व्याज द्यावे लागते. मग वीज वापरता तर बिल देण्यासाठी अडचण काय आहे.

''मी जेव्हापासून या खात्याचा पदभार सांभाळला तेव्हापासून २४ तास वीजपुरवठा देण्याचा प्रयत्न केला. चक्रीवादळाच्या, अतिवृष्टीच्या काळातही हा प्रयत्न केला. मुंबई अंधारात असतानाही सातत्याने वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न केला याकडे कुणाचाही लक्ष नाही. शेतकऱ्यांसाठी आम्ही कृषीपंप, विजजोडणीचा कार्यक्रम आणला. भरलेल्या वीजबिलातून ६६ टक्के रक्कम ही संबंधित जिल्ह्याला दिली जाते. त्यातून विजेचे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करू शकता, नवीन ट्रान्सफॉर्मर घेता येऊ शकतात, नवीन लाईन टाकता येते तर मग विजेचे बिल का भरत नाहीत असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. महावितरणवर ५६ हजार कोटींचा  बोजा आला आहे. हे पैसे महावितरण कुठून आणणार. त्यामुळे लोकांना वीजबिल प्रत्येकाला भरावेच लागेल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.'' 

टॅग्स :PuneपुणेNitin Rautनितीन राऊतmahavitaranमहावितरणelectricityवीजFarmerशेतकरी