शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

सत्तेचा मार्ग थेट दिल्ली नाही व्हाया अयोध्या : हुकूमचंद सावला 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 12:05 PM

देशातील १०० कोटी भारतवासियांची वज्रमूठ जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मंदिर निर्माणाचे कार्य अशक्य आहे...

ठळक मुद्देविश्व हिंदू परिषद पुणेतर्फे धर्मसभेचे आयोजन 

पुणे : रामजन्मभूमी हा सर्वांच्या श्रद्धा आणि आस्थेचा विषय आहे. त्यामुळे केंद्र सरकार अयोध्येमध्ये राममंदिराची उभारणी करु शकते, त्याकरीता न्यायालय किंवा समाजाला विचारण्याची गरज नाही. आता देशामध्ये सत्तेत जाण्याचा मार्ग थेट दिल्ली नसून व्हाया अयोध्या आहे. त्यामुळे कॉंग्रेससह प्रत्येक पक्षाचे राजकारणी येथे येत आहेत. राष्ट्रीय चरित्र निर्मितीकरीता राममंदिर आवश्यक आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष हुकूमचंदजी सावला यांनी केले. विश्व हिंदू परिषद पुणेच्या वतीने अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर भव्य श्रीराम मंदिर निर्माणासाठी संसदेत कायदा करावा, या मागणीसाठी पुण्यात बाजीराव रस्त्यावरील नातूबाग मैदानावर धर्मसभेचे आयोजन करण्यात आले.  यावेळी कागशिला पिठाधिश्वर  महंत साध्वी प्रज्ञा भारतीय जी, प.पू. अतुलशास्त्री भगरे गुरुजी, दादा वेदक, पांडुरंग राऊत, रवींद्र वंजारवाडकर, सभेचे संयोजक किशोर चव्हाण, श्रीकांत चिल्लाळ यांसह संत महात्म्य उपस्थित होते. खासदार अनिल शिरोळे यांना राममंदिर निर्माण कायद्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. साध्वी प्रज्ञा भारतीय म्हणाल्या, भारत देश स्वतंत्र झाला, नागरिक स्वतंत्र झाले, मात्र आजही रामलल्ला स्वतंत्र नाही. हिंदूंनी संघटित होऊन राममंदिर निर्माणाकरीता पुढाकार घ्यायला हवा. राज्य व केंद्र सरकारने जर ठरविले, तर मंदिर उभारणी सहज शक्य आहे. तीन तलाक सारखा कायदा न्यायालय करु शकते, मग राममंदिर निर्माणाचा कायदा का होऊ शकत नाही, असा सवालही त्यांनी केला.     प.पू.अतुलशास्त्री भगरे गुरुजी म्हणाले, देशातील १०० कोटी भारतवासियांची वज्रमूठ जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मंदिर निर्माणाचे कार्य अशक्य आहे. सरकारच्या भरवशावर राहणे योग्य नाही. कोणाला न दुखावता राममंदिर होणार नाही. त्यामुळे मंदिर निर्मितीकरीता रामभक्तांची शक्ती एकवटली पाहिजे़खासदार अनिल शिरोळे यांनी देखील राममंदिर उभारणीकरीता सरकार आपल्या सोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला. धनंजय गायकवाड, नितीन महाजन, अतुल सराफ, गणेश वनारसे, नाना क्षीरसागर, केतन घोडके, श्रीपाद रामदासी आदींनी सभेच्या आयोजनात सहभाग घेतला. मंदार परळीकर यांनी सूत्रसंचालन केले. उत्तमराव उर्फ भाऊराव कुदळे यांनी प्रास्ताविक केले. किशोर चव्हाण यांनी निवेदनाचे वाचन केले. श्रीकांत चिल्लाळ यांनी आभार मानले.   

टॅग्स :PuneपुणेAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरGovernmentसरकार