शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरीत कामगारांच्या मृत्यूला सरकारच जबाबदार;कामगार संघटनांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 19:38 IST

कामगारांच्या सुरक्षिततेकडे केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष नाही.

ठळक मुद्देनियोजन व व्यवस्थेच्या अभावाचे बळी

पुणे: देशात लाखोंच्या संख्येने गरीब कामगारांचे स्थलांतर सुरू आहे. केंद्र व राज्य सरकार त्यांची काहीही व्यवस्था करत नसल्याने आजार अपघात यातून त्यांच्यातील अनेकांचे बळी जात आहेत अशी टीका ‘सीटू’ या कामगार संघटनेने केली. सरकारच हे बळी घेत आहे असा आरोप कामगार संघटनांकडून करण्यात येत आहे.‘सीटू’ या संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड म्हणाले, लॉकडाऊन काळामध्ये स्थलांतरित कामगार व नागरिक अस्वस्थ झाले आहेत. त्यांना त्यांच्या गावी जायचे आहे. अन्नधान्य आणि पैसा नसल्यामुळे त्यांना उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे मिळेल त्या मार्गाने पायी चालत, टँकरमध्ये बसून अत्यंत असुरक्षित पद्धतीने हे कामगार त्यांच्या राज्यात, त्यांच्या गावी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मोठे अपघात होऊन कामगारांचा बळी जात आहे.शुक्रवारी पहाटे औरंगाबाद मध्ये जालन्यातील मिलमध्ये काम करणारे १७ कामगार रेल्वे ट्रॅकने पायी चालत असताना थकल्यामुळे फ्लायओवहर जवळ  झोपून गेले आणि अशा झोपेतच असताना मालगाडी खाली चिरडले गेले. त्याचबरोबर नाशिक -मुंबई - आग्रा रोडवर नाशिकच्या जवळ कसारा घाटामधे पायी चालणाऱ्या एका कामगाराचा ह्रदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. एक कामगार अपघातामध्ये मृत्यू पावला आहे. अशा अनेक घटना राज्यभर आणि देशभरामध्ये होत आहेत. डॉ. कराड म्हणाले, कामगारांच्या सुरक्षिततेकडे केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष नाही. आंध्रप्रदेशमध्ये एलजी पॉलिमर कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी कुठलीही सुरक्षिततेचे उपाय न केल्यामुळे आणि प्रोटॉकल न  पाळल्यामुळे धोकादायक वायू लिंक होऊन ११ कामगार व नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. एक हजार  जणांना बाधा झाली. या घटना अत्यंत हृदयद्रावक व चिंताजनक आहेत.कामगारांच्या जीविताच्या सुरक्षिततेची आणि जगण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारवर आहे. ही जबाबदारी पार पाडणे तर सोडाच उलट  केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश या भाजपशासित सरकारने तीन कायदे वगळता सर्व कायदे तीन वषार्साठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेबद्दल चे कायदेही स्थगित करण्यात आले आहेत. कापोर्रेट आणि मालकांना जास्तीत जास्त नफा मिळावा यासाठी हे कामगार विरोधी धोरण घेतले आहे. कामगारांचे घटनादत्त अधिकार काढून घेतले जात आहेत. केंद्र व राज्य सरकारने हे कामगार विरोधी धोरण बंद करावे व स्थलांतरित कामगारांसाठी पुरेशा मोफत ट्रेन सुरु कराव्या, राज्यांतर्गत त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी बसेसची सुविधा करावी आणि दरम्यानच्या काळात अन्न व औषधोपचाराची सोय करावी अशी मागणी सिटूसह  सर्व कामगार संघटना करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूAccidentअपघातcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादGovernmentसरकार