शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

वाहतुकीच्या खेळखंडोब्याला सरकारच जबाबदार; पुणे काँग्रेसचे थेट मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 13:38 IST

महायुती सरकार बेजबाबदारपणे वागून सार्वजनिक सेवेबाबत गंभीर नसल्याचे दाखवून देत आहे, काँगेसची टीका

पुणे: शहरातील वाहतुकीच्या खेळखंडोब्याला सरकारच जबाबदार आहे. शहरांतर्गत प्रवासासाठी पुणेकरांचा श्वास असलेल्या पीएमपीएलच्या (PMPML) व्यवस्थापकपदाच्या सातत्याने बदल्या करून सरकार सार्वजनिक सेवेबाबत आपण गंभीर नाही हेच दाखवून देत असल्याची टीका काँग्रेसने केली. प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच पत्र लिहिले आहे. 

एकाही व्यवस्थापकीय संचालकाला सरकार कार्यकाल पूर्ण करू देत नाही. शहरातील सार्वजनिक प्रवासी सेवेसाठी एकमेव असलेल्या या कंपनीचे कामकाज कार्यक्षम व्हावे, असे सरकारला वाटतच नाही. खंबीर, कणखर व्यवस्थापकीय संचालक असेल, त्याला पूर्ण कार्यकाळ मिळेल तर तो काहीतरी करेल. मात्र, सरकार कायमच या पदावरील नियुक्तीबाबत धरसोडपणा करत आहे, असे जोशी यांनी पत्रात म्हटले आहे.

पीएमपीच्या ताफ्यात २ हजार बसगाड्यांची भर घातली जाईल, असे पालकमंत्री अजित पवार यांनी वर्षभरापूर्वी जाहीर केले. मात्र, त्या दृष्टीने काहीही कार्यवाही झालेली दिसत नाही. अनेक बस मार्गांवर प्रवाशांना बसची वाट पाहात तासनतास ताटकळत उभे राहावे लागते. बसशेड्सही अपुऱ्या आहेत. शहराची वस्ती वाढली त्या कारणाने मार्गांची फेररचना करायला हवी आणि त्यासाठी सक्षम प्रमुख अधिकारी प्रदीर्घ काळ तिथे असायला हवा. मात्र, त्याकडे लक्ष देण्याऐवजी महायुती सरकार बेजबाबदारपणे वागून पीएमपीच्या कारभाराचा खेळ खंडोबा करत आहे, असा आरोप मोहन जोशी यांनी केला आहे. कंपनीच्या प्रमुख पदांवरील व्यक्तीला किमान तीन वर्षे तरी बदलू नये, अशी मागणी जोशी यांनी पत्रात केली आहे.

टॅग्स :PuneपुणेEknath Shindeएकनाथ शिंदेPMPMLपीएमपीएमएलChief Ministerमुख्यमंत्रीTrafficवाहतूक कोंडीbikeबाईकcarकार