शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
2
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
3
"कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
4
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
5
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
6
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
7
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
8
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
9
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
10
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
11
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
12
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
13
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
14
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
15
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
16
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
17
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
18
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
19
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
20
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल

मराठा आरक्षणावर सरकारने काढलेला जीआर चुकीचा : पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 7:52 PM

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने काढलेला जीआर हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे, महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारचा चुकीचा निर्णय कुठल्या सरकारने घेतला नव्हता.

पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने काढलेला जीआर हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे, महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारचा चुकीचा निर्णय कुठल्या सरकारने घेतला नव्हता.मुख्यमंत्री आरक्षणाच्या मुद्द्यावर पळ काढत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय.

                    शुक्रवारी पुण्यात आयोजित दुष्काळ निर्मूलन परिषदेला पृथ्वीराज चव्हाण यांनी हजेरी लावली त्यावेळी ते बोलत होते.मराठा आरक्षण मिळावे ही भूमिका आहे मात्र सध्याच्या 52 टक्के आरक्षणाला धक्का लागायला नको अशी काँग्रेसची भूमिका आहे, मराठा आरक्षणाबाबत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल हा एकमताचा नाही असं दिसतंय तसेच सरकार सभागृहाच्या पटलावर हा अहवाल ठेवणार असे ही दिसत असल्याचे चव्हाण म्हणाले. मात्र सरकारने याबाबत जो जीआर काढला आहे ते पाहता मुख्यमंत्री आपली जबाबदारी झटकत आहेत, एक मंत्र्यांकडे याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांना देत येणार नाही हा निर्णय स्वतः मुख्यमंत्र्यांनीचं घेतली पाहिजे, राज्यातील एक तृतीयांश लोकांचा हा प्रश्न आहे मात्र मुख्यमंत्री पळ काढतायत असा आरोप करत जी समिती याबाबत निर्णय घेईल त्या निर्णयाला पूर्णपणे मुख्यमंत्रीच जबाबदार असतील असे चव्हाण म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे तुम्हाला क्रेडिट घ्यायचे ते घ्या आम्ही अभिनंदन करू आमचा विरोध नाही फक्त निर्णय लवकर घ्या फसवाफसवी करू नका असे चव्हाण म्हणाले. 

                    शिवसेनेच्या चलो अयोध्या यात्रेबाबत बोलताना, गेल्या चार वर्षात वेळवेळी राममंदिराचा मुद्दा राज्यकर्त्यांनी पुढे करत राजकारण केले आता बरोबर निवडणूक आल्या त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरणाचे हे सगळे प्रयत्न असल्याचे चव्हाण म्हणाले, निवडणुका जश्या जवळ येतील तसा हा मुद्दा अधिक तापवला जाईल आणि निवडणुकीनंतर पुन्हा सगळे विसरून जातील हा सगळा पोरखेळ सुरू आहे अशी टीका चव्हाण यांनी केली..राज्यात अनेक गंभीर प्रश्न आहेत दुष्काळ चिंताजनक आहे मात्र सरकार याबाबत गंभीर नाही असही चव्हाण म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलेले ठळक मुद्दे :

  • मराठ्यांना आरक्षण देताना सध्याच्या ५२ टक्के टक्के आरक्षणाला धक्का नको 
  •  सरकारने काढलेल्या जीआरवरून मुख्यमंत्री जबाबदारी झटकत असल्याची टीका 
  • राज्यातील एक तृतीयांश लोकांचा प्रश्न असताना मुख्यमंत्री पळ काढत असल्याचा घणाघात 
  • सरकारने लवकर निर्णय घ्यावा,फसवाफसवी करू नये 
  • सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही 
  • आगामी निवडणुका बघून धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न 
टॅग्स :PuneपुणेPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस