शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
4
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
5
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
6
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
7
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
8
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
9
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
10
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
11
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
12
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
13
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
14
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
15
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
16
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
17
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
18
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
19
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
20
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप

मराठा आरक्षणावर सरकारने काढलेला जीआर चुकीचा : पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 19:54 IST

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने काढलेला जीआर हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे, महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारचा चुकीचा निर्णय कुठल्या सरकारने घेतला नव्हता.

पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने काढलेला जीआर हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे, महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारचा चुकीचा निर्णय कुठल्या सरकारने घेतला नव्हता.मुख्यमंत्री आरक्षणाच्या मुद्द्यावर पळ काढत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय.

                    शुक्रवारी पुण्यात आयोजित दुष्काळ निर्मूलन परिषदेला पृथ्वीराज चव्हाण यांनी हजेरी लावली त्यावेळी ते बोलत होते.मराठा आरक्षण मिळावे ही भूमिका आहे मात्र सध्याच्या 52 टक्के आरक्षणाला धक्का लागायला नको अशी काँग्रेसची भूमिका आहे, मराठा आरक्षणाबाबत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल हा एकमताचा नाही असं दिसतंय तसेच सरकार सभागृहाच्या पटलावर हा अहवाल ठेवणार असे ही दिसत असल्याचे चव्हाण म्हणाले. मात्र सरकारने याबाबत जो जीआर काढला आहे ते पाहता मुख्यमंत्री आपली जबाबदारी झटकत आहेत, एक मंत्र्यांकडे याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांना देत येणार नाही हा निर्णय स्वतः मुख्यमंत्र्यांनीचं घेतली पाहिजे, राज्यातील एक तृतीयांश लोकांचा हा प्रश्न आहे मात्र मुख्यमंत्री पळ काढतायत असा आरोप करत जी समिती याबाबत निर्णय घेईल त्या निर्णयाला पूर्णपणे मुख्यमंत्रीच जबाबदार असतील असे चव्हाण म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे तुम्हाला क्रेडिट घ्यायचे ते घ्या आम्ही अभिनंदन करू आमचा विरोध नाही फक्त निर्णय लवकर घ्या फसवाफसवी करू नका असे चव्हाण म्हणाले. 

                    शिवसेनेच्या चलो अयोध्या यात्रेबाबत बोलताना, गेल्या चार वर्षात वेळवेळी राममंदिराचा मुद्दा राज्यकर्त्यांनी पुढे करत राजकारण केले आता बरोबर निवडणूक आल्या त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरणाचे हे सगळे प्रयत्न असल्याचे चव्हाण म्हणाले, निवडणुका जश्या जवळ येतील तसा हा मुद्दा अधिक तापवला जाईल आणि निवडणुकीनंतर पुन्हा सगळे विसरून जातील हा सगळा पोरखेळ सुरू आहे अशी टीका चव्हाण यांनी केली..राज्यात अनेक गंभीर प्रश्न आहेत दुष्काळ चिंताजनक आहे मात्र सरकार याबाबत गंभीर नाही असही चव्हाण म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलेले ठळक मुद्दे :

  • मराठ्यांना आरक्षण देताना सध्याच्या ५२ टक्के टक्के आरक्षणाला धक्का नको 
  •  सरकारने काढलेल्या जीआरवरून मुख्यमंत्री जबाबदारी झटकत असल्याची टीका 
  • राज्यातील एक तृतीयांश लोकांचा प्रश्न असताना मुख्यमंत्री पळ काढत असल्याचा घणाघात 
  • सरकारने लवकर निर्णय घ्यावा,फसवाफसवी करू नये 
  • सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही 
  • आगामी निवडणुका बघून धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न 
टॅग्स :PuneपुणेPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस