शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

शेतक-यांबाबत सरकार दुटप्पी - रघुनाथ पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 6:32 AM

शेतकरी आठवडेबाजार अनधिकृत ठरवून शासनाच्या शेतकरीविरोधी भूमिकेला महापालिका पाठिंबा देत आहे. आठवडेबाजार ही संकल्पना बंद करून शेतकºयांच्या मुलांचा रोजगार बंद करण्याचा घाट घातला जात आहे.

बाणेर -  शेतकरी आठवडेबाजार अनधिकृत ठरवून शासनाच्या शेतकरीविरोधी भूमिकेला महापालिका पाठिंबा देत आहे. आठवडेबाजार ही संकल्पना बंद करून शेतकºयांच्या मुलांचा रोजगार बंद करण्याचा घाट घातला जात आहे. एकीकडे मुख्यमंत्री शेतकºयांच्या पोरांनी नोकरीकडे न वळता, व्यवसाय करण्याची भाषा करतात आणि पणन विभाग शेतकºयांच्या आठवडेबाजाराला वेळेवर परवानगी देत नाही, हे दुट्टपी धोरण शेतकरीविरोधी आहे, अशी टीका शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी केली.बालेवाडी येथे पालिकेच्या रिकाम्या जागेत ३ वर्षे सुरू असलेला शेतकरी बाजार बंद करण्यासाठी नोटीस देऊन अतिक्रमण कारवाई करण्यात आली होती. कारवाईच्या विरोधात आज (दि. ८) शेतकरी संघटना, शेतकरी गट व नागरिक रस्त्यावर उतरले होते. बालेवाडी येथील दसरा चौकात कारवाईसाठी आलेल्या प्रशासनाच्या कर्मचाºयांना विरोध दर्शवण्यात आला. यानंतर विविध शेतकरी गटांच्या शेतकºयांनी आपला माल रस्त्याच्या कडेला मांडून भाजीबाजार भरवला. या प्रसंगी रघुनाथ पाटील या ठिकाणी आले होते.बालेवाडी येथील पालिकेच्या रिकाम्या जागेत चालू असलेल्या गुरुवारच्या शेतकरी बाजाराला ५ मार्च रोजी पालिकेने कारवाईची नोटीस दिली होती. याविरोधात शेतकºयांनी शासनाच्या आठवडेबाजारानुसार परवानगी मागीतली असल्याचे सांगितले; परंतु शासन विलंब करीत आहे, ही बाब निदर्शनास आणून दिली.बालेवाडी येथील ४० सोसायट्यांमधील नागरिकांनी आठवडेबाजार सुरू ठेवण्यासाठी लेखी पाठिंबा दिला आहे. बालेवाडी गावठाण व लक्ष्मीमाता मंदिर परिसरातील सोसायट्या यांना जवळ असणारा हा आठवडेबाजार आहे. या आठवडेबाजारात थेट शेतकºयांकडून ग्राहकांकडे भाजी, फळभाज्या विक्रीसाठी येतात. ३ वर्षे सुरू असलेला बाजार अचानक बंद करण्यामागे स्थानिक राजकारण असल्याचे बोलले जात आहे.काही दिवसांपूर्वी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त याच परिसरात आणखी एक आठवडेबाजार सुरू झाला आहे. यामुळे बालेवाडी गावाजवळील जुना आठवडेबाजार बंद करण्यासाठी कारवाई होत असल्याचे सांगण्यात येत आहे.पुण्यात ४८ शेतकरी बाजार सुरू आहेत. आठवड्यातून काही तास भाजीविक्री करण्यात येते. शासनाच्या जून २०१४ च्या संकल्पनेनुसार पणन विभागाच्या सूचना पाळून आठवडेबाजारात शेतकरी भाजीपाला विक्री करतात; परंतु पालिका अधिकारी अनधिकृत विक्रेत्यांच्यावर कारवाई न करता आठवडेबाजार बंद करण्याचा प्रयत्न करीत आहेत. - नरेंद्र पवार, स्वामीसमर्थ शेतकरी गट१ पाटील म्हणाले की, शेतकरी जगवण्यासाठी शासन खरंच धोरण राबवत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन अपयशी ठरत आहे. शेतकºयांच्या मागण्या पूर्ण होत नाही. यातून शेतकरी आपला माल शहरात घेऊन आला, तर त्याला तो विकला जाऊ देत नाही. शेतकरी आठवडेबाजारात अफू, मटका, गांज्याची विक्री होत नाही. मग, हे बाजार अनधिकृत का ? ठरवले जात आहे. मुख्यमंत्री विधानसभेच्या आवारात आठवडेबाजार भरवत असतील, तर पुण्यात मोकळ्या जागेत भरवले जाणारे अठवडेबाजार अनधिकृत कशासाठी ठरवले जात आहेत. शहरातील व्यापरी व अनधिकृत विक्रेते यांच्याशी हातमिळवणी करून पालिका अधिकारी कारवाईचा घाट घालत आहे.२ आठवडे बाजार संयोजक लहू बालवडकर म्हणाले की, तीन वर्षे शेतकरी आठवडेबाजार वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा रितीने पालिकेच्या मोकळ्या जागेत सुरू आहे. शेतकºयांना व्यापारी ठरवून शेतकºयाचा माल ग्राहकांना मिळू नये यासाठी पालिकेचे काही अधिकारी हाताशी धरून कारवाई केली जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी