शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

'महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद'चे वैभव शासन नियुक्त एजन्सीने घालवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 13:10 IST

राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या टीईटी परीक्षेच्या निकालात बदल करण्यासाठी परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी काही उमेदवारांकडून पैैसे घेतल्याचे समोर आले...

राहुल शिंदे

पुणे :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) समकक्ष संस्था म्हणून काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे (Maharashtra State Council Of Examination) पाहिले जात होते. मात्र, २०१७ पासून परिषदेकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी थेट शासनाकडून एजन्सी निवडण्यास सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून खऱ्या अर्थाने परीक्षा परिषदेच्या कामाला घरघर लागली. केवळ याच संस्थेमध्ये नाही तर इतरही शैैक्षणिक संस्थांच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. ही चिंतेची बाब असून, त्यामुळे परिषदेचे वैभव गेले असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या टीईटी परीक्षेच्या निकालात बदल करण्यासाठी परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी काही उमेदवारांकडून पैैसे घेतल्याचे समोर आले. त्यामुळे परीक्षा परिषदेतील सर्वच कारभारात चव्हाट्यावर आला. जी. ए. सॉफ्टवेअर एजन्सीची निवड राज्य शासनाने सुमारे चार वर्षांपूर्वी केली होती. या कंपनीकडे केवळ टीईटी परीक्षेचीच नाही तर तीन ते चार परीक्षांची जबाबदारी देण्यात आली. परीक्षेसारखे गोपनीय काम एकाच संस्थेला देण्यामागचा हेतू काय होता, हे समोर येण्याची आवश्यकता आहे.

राज्य परीक्षा परिषदेच्या परीक्षा घेण्याचे काम शासन नियुक्त एजन्सीकडे दिले त्याच दिवशी परिषदेची स्वायत्ता संपुष्टात आली. कारण एजन्सीकडून केल्या जाणाऱ्या चुकीच्या कामांना विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली केली जात होती. २०१७ पूर्वी परिषदेच्या अध्यक्ष व आयुक्तांकडून अत्यंत गोपनीय पध्दतीने एजन्सीची निवड केली जात होती. त्यामुळे परीक्षा परिषदेकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा पारदर्शक होत होत्या.

पुढील काळात परिषदेकडे विविध जिल्हा परिषदांतील पदांची भरती, अकोला येथील महाबीज आदी परीक्षा घेण्याची जबाबदारी दिली जात होती. राज्यातील बहुतांश सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून वर्ग तीन व चार पदांच्या परीक्षा घेण्यासाठी परिषदेकडे विचारणा केली जात होती. मात्र,परीक्षा परिषदेला एवढ्या परीक्षा घेण्यासाठी वेळ कमी पडत होता. त्यामुळेच परिषदेची तुलना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी केली जात होती.

राजकीय हस्तक्षेप थांबवावा

परीक्षेतून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे परीक्षा परिषदेकडे असणाऱ्या २५ कोटींच्या ठेवी २०० कोटींवर गेल्या होत्या; परंतु शासन नियुक्त एजन्सीने स्वायत्ततेसह परिषदेची तिजोरीसुध्दा खाली केली. त्यामुळे परिषदेला गतवैैभव प्राप्त करून देण्यासाठी राजकीय हस्तक्षेप थांबवावा लागणार आहे, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणexamपरीक्षाMaharashtraमहाराष्ट्र