शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

त्याने 'तिला' भुलवून थेट आसामला नेलं; पोलिसांनी जंगजंग पछाडून परत आणलं ..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 16:46 IST

आमचे चहाचे मळे आहेत, असे सांगून एका २२ वर्षाच्या तरुणीला त्याने भूलविले आणि आसामामध्ये पळून नेले़..

ठळक मुद्देकाकाला पाहताच ती गळ्यात पडून रडली

पुणे : आमचे चहाचे मळे आहेत, असे सांगून एका २२ वर्षाच्या तरुणीला त्याने भूलविले आणि आसामामध्ये पळून नेले़. एका सुखी मध्यमवर्गीय कुटुंबाच्या दृष्टीने हा धक्काच होता़. मुलीच्या आईकडून त्या मुलाचा नंबर घेतल्यावर तो थेट आसाममध्ये लोकेशन दाखवत होता़. लष्कर पोलिसांनी चिकाटीने थेट आसामाला जाऊन विविध अडचणीला तोंड देत या तरुणीला शोधून तिच्या पालकांच्या हवाली केले़. लष्कर भागातील मध्यमवर्गीय कुटुंबातील ही तरुणी काही दिवसांपूर्वी सायंकाळी अचानक घरातून निघून गेली़. तिच्या पालकांनी परिसरात, मित्रांकडे शोध घेऊनही ती न सापडल्याने रात्री ते लष्कर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी आले़. पोलिसांनी त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली़ तेव्हा या तरुणीचे एका मुलाबरोबर प्रेमसंबंध असल्याची माहिती पुढे आली़. मुलीच्या आईने तिच्याकडचे त्या मुलाचे फोननंबर पोलिसांना दिले़. त्यापैकी एक नंबर बंद होता तर दुसºया नंबरचे ठिकाणी पोलिसांनी शोधून काढले़, ते लोकेशन होते. थेट आसाममधील़ आता इतक्या लांबचे मोबाईल लोकेशन पोलिसांना मिळाले होते़. त्याशिवाय त्यांच्या हातात दुसरा कोणताही पुरावा नव्हता़. या एका धाग्यावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले यांनी पोलिसांना तिचा आसामात जाऊन शोध घेण्याचा आदेश दिला़. सहायक फौजदार भालचंद्र साबळे पाटील, पोलीस शिपाई आबासाहेब धावडे आणि महिला पोलीस शिपाई माधुरी काटकर हे तरुणीचा शोध घेण्यासाठी आसामला निघाले़. त्यांच्याबरोबर मुलीचा भाऊ आणि काकाही होते़. गुवाहाटी येथे पोहचल्यावर त्यांनी स्थानिक पोलिसांची मदत घेतली़ आणि त्याचा शोध घेण्यास सुरुवात केला़. आसाम येथील पोलीस अधिकारी चौधरी यांनी या पथकाबरोबर रायफलधारी पोलीस व उपनिरीक्षक मदतीला दिले़ पहिले दोन दिवस त्यांना काहीही माहिती हाती लागू शकली नाही़. मात्र, तिसऱ्या दिवशी गुवाहाटीपासून ४०० किमीवर असलेल्या एका गावात त्या मुलाचे लोकेशन आढळून आले़. पोलिसांचे पथक मजलदरमजल करीत दऱ्या डोंगरातून प्रवास करीत त्या गावात पोहचले़. तेव्हा त्यांना तिथे या मुलीचा शोध लागला़. मुलाबरोबर पळून आल्यानंतर तिला खरी वस्तूस्थिती लक्षात आली होती़. त्यामुळे आपण पळून आल्याचा तिला पश्चाताप झाला होता़ ती मला इथे राहायचे नाही असे म्हणत होती़. अखेर पोलिसांनी तिला स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले़ आणि पुण्यात परत असून तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले़. क्षणाच्या मोहाला बळी पडून जीवनाची दिशा चुकणाऱ्या एका तरुण मुलीला पोलिसांनी आपल्या चिकाटीने आणि कर्तव्यदक्षतेने पुन्हा एकदा नवे आयुष्य सुरु करण्याची संधी दिली़. ............खरे वास्तव आले पुढे या तरुणीला त्याने चांगलेच भुलविले होते़ हे पथक त्यांच्या गावात पोहचले, त्यांनी शोधत घराजवळ पोहचले़. लांबूनच या तरुणीने आपला काका आणि भावाला पाहताच धावत ती त्यांच्याकडे आली आणि रडत रडतच काकाच्या गळ्यात पडली़. मी चुकले़ मला येथून घेऊन चला असे सांगून लागली़. पुण्यातील ही तशी दुर्मिळ घटना पण, मिरा भाईंदर व अन्य राज्यातील अनेक मुलींना हे तरुण भुलवूुन लग्न करुन घरी आणतात़. काही दिवस त्यांच्याबरोबर राहतात़. तेथून बांगला देश केवळ १२ किमी अंतरावर आहे़. तेथील बड्या बागायतदार व इतरांना या मुलींची विक्री केली जात असल्याचे वास्तव स्थानिक पोलिसांनी सांगितले़. 

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी