शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

घोड नदीचे पात्र कोरडे, दिवसाआड पाणीपुरवठा सुरू; बंधाऱ्यांचे ढापे काढल्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 15:02 IST

मंचर ( पुणे ) : घोड नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे ढापे काढण्यात आल्याने नदीपात्र कोरडे पडले आहे. त्यात पावसाने ...

मंचर (पुणे) : घोड नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे ढापे काढण्यात आल्याने नदीपात्र कोरडे पडले आहे. त्यात पावसाने ओढ दिल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची टंचाई नदीकाठच्या गावांना जाणवत असून, काही गावांमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागतोय.

घोड नदीवर आंबेगाव शिरूर तालुक्यात सुमारे २५ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. पावसाळा संपला की बंधाऱ्याचे ढापे टाकून बंधारे पाण्याने भरून घेतले जातात. त्यानंतर या पाण्याचा उपयोग शेतीसाठी तसेच पाणीपुरवठा योजनेसाठी होत असतो. वर्षभर बहुतेक बंधारे पाण्याने तुडुंब भरलेले असतात. पावसाळ्यापूर्वी मे महिन्याच्या अखेरीस संबंधित बंधाऱ्याचे ढापे पाटबंधारे विभागाकडून काढले जातात. यावर्षी त्याप्रमाणे हे ढापे काढण्यात आले आहेत. त्यामुळे नदीपात्र कोरडे पडले आहे. थोड्याशा जागेत पाणीसाठा शिल्लक असला तरी बहुतेक घोड नदी कोरडी झाली आहे. यावर्षी आतापर्यंत दमदार पाऊस झालेला नाही. काही ठिकाणी वळवाचा तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडत असला तरी पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. परिणामी नदीतून अद्याप पाणी वाहिलेले नाही. त्यामुळे नदीकाठच्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतीपंप बंधाऱ्यात टाकून त्याद्वारे पाण्याचा उपसा केला जात होता. आता बंधाऱ्यातील पाण्यानेच तळ गाठल्याने वीजपंप बंद आहेत.

शेतातील पिकांना पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. नदीकाठी असलेल्या विहिरीतून अनेक गावांना पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा होतो. आता या विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. अनेक गावांमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागतोय. सध्या पावसाचे वातावरण झाले असून, सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. नजीकच्या काळात पाऊस पडला नाही तर पाणीटंचाई अजून भीषण होणार आहे.

श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग गावाला घोड नदीकाठी असलेल्या विहिरीतून पाणीपुरवठा होतो. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यालगत सदर विहीर असल्याने वर्षभर पाणीटंचाई जाणवली नाही. मात्र बंधाऱ्याचे ढापे काढण्यात आल्याने आता विहिरीने तळ गाठला आहे. वीजपंप दिवसाआड कसाबसा तीन तास चालू राहतो. त्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा करता येत नाही. शिवाय विजेचा लपंडाव सुरू असतो. घोड नदीला पाणी आल्यानंतरच पाणीपुरवठा सुरळीत होईल.

-वैभव पोखरकर, सरपंच, श्री क्षेत्र वडगाव, काशिंबेग

टॅग्स :riverनदीPuneपुणेMancharमंचर