शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

घोड नदीचे पात्र कोरडे, दिवसाआड पाणीपुरवठा सुरू; बंधाऱ्यांचे ढापे काढल्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 15:02 IST

मंचर ( पुणे ) : घोड नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे ढापे काढण्यात आल्याने नदीपात्र कोरडे पडले आहे. त्यात पावसाने ...

मंचर (पुणे) : घोड नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे ढापे काढण्यात आल्याने नदीपात्र कोरडे पडले आहे. त्यात पावसाने ओढ दिल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची टंचाई नदीकाठच्या गावांना जाणवत असून, काही गावांमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागतोय.

घोड नदीवर आंबेगाव शिरूर तालुक्यात सुमारे २५ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. पावसाळा संपला की बंधाऱ्याचे ढापे टाकून बंधारे पाण्याने भरून घेतले जातात. त्यानंतर या पाण्याचा उपयोग शेतीसाठी तसेच पाणीपुरवठा योजनेसाठी होत असतो. वर्षभर बहुतेक बंधारे पाण्याने तुडुंब भरलेले असतात. पावसाळ्यापूर्वी मे महिन्याच्या अखेरीस संबंधित बंधाऱ्याचे ढापे पाटबंधारे विभागाकडून काढले जातात. यावर्षी त्याप्रमाणे हे ढापे काढण्यात आले आहेत. त्यामुळे नदीपात्र कोरडे पडले आहे. थोड्याशा जागेत पाणीसाठा शिल्लक असला तरी बहुतेक घोड नदी कोरडी झाली आहे. यावर्षी आतापर्यंत दमदार पाऊस झालेला नाही. काही ठिकाणी वळवाचा तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडत असला तरी पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. परिणामी नदीतून अद्याप पाणी वाहिलेले नाही. त्यामुळे नदीकाठच्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतीपंप बंधाऱ्यात टाकून त्याद्वारे पाण्याचा उपसा केला जात होता. आता बंधाऱ्यातील पाण्यानेच तळ गाठल्याने वीजपंप बंद आहेत.

शेतातील पिकांना पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. नदीकाठी असलेल्या विहिरीतून अनेक गावांना पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा होतो. आता या विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. अनेक गावांमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागतोय. सध्या पावसाचे वातावरण झाले असून, सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. नजीकच्या काळात पाऊस पडला नाही तर पाणीटंचाई अजून भीषण होणार आहे.

श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग गावाला घोड नदीकाठी असलेल्या विहिरीतून पाणीपुरवठा होतो. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यालगत सदर विहीर असल्याने वर्षभर पाणीटंचाई जाणवली नाही. मात्र बंधाऱ्याचे ढापे काढण्यात आल्याने आता विहिरीने तळ गाठला आहे. वीजपंप दिवसाआड कसाबसा तीन तास चालू राहतो. त्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा करता येत नाही. शिवाय विजेचा लपंडाव सुरू असतो. घोड नदीला पाणी आल्यानंतरच पाणीपुरवठा सुरळीत होईल.

-वैभव पोखरकर, सरपंच, श्री क्षेत्र वडगाव, काशिंबेग

टॅग्स :riverनदीPuneपुणेMancharमंचर