शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

गांधी शांती यात्रा ९ जानेवारीला पुण्यात : यशवंत सिन्हांकडे नेतृत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 21:26 IST

नागरिकत्व कायदा दुरूस्तीला विरोध

ठळक मुद्देराष्ट्र मंच, फ्रेंड्स ऑफ डेमॉक्रसी, शेतकरी जागर मंच यांनी गांधी शांती यात्रेचे केले आयोजन १० जानेवारीला सकाळी ९ वाजता यात्रा संगमनेर, नाशिककडे होईल रवाना

पुणे: राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी व नागरिकत्व सुधारणा कायदा जबरदस्तीने अंमलात आणून केंद्र सरकार देशात विभाजनवादी धोरण अवलंबत आहे असा आरोप करून त्याला विरोध म्हणून मुंबई ते दिल्ली दरम्यान गांधी शांती यात्रा काढण्यात येत आहे.  ही यात्रा ९ जानेवारीला पुण्यात येत असून माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा या यात्रेत नेतृत्व करत आहे.   राष्ट्र मंच, फ्रेंड्स ऑफ डेमॉक्रसी, शेतकरी जागर मंच यांनी गांधी शांती यात्रेचे आयोजन केले आहे. गांधी भवनच्या वतीने ९ जानेवारीला सायंकाळी साडेपाच वाजता गंधी भवन येथे शांती यात्रेचे स्वागत करण्यात येणार अहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष कुमार सप्तर्षी यांनी ही माहिती दिली. गांधी भवन येथे स्वागत कार्यक्रमानंतर यशवंत सिन्हा व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जाहीर सभेद्वारे पुण्यातील सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच उपस्थित नागरिकांबरोबर संवाद साधणार आहेत.गांधी भवन येथे ९ जानेवारीला रात्री यात्रेचे मुक्काम असेल. १० जानेवारीला सकाळी ९ वाजता यात्रा संगमनेर, नाशिककडे रवाना होईल. युवक क्रांती दलाचे (युक्रांद) कार्यकर्ते यात्रेत सहभागी होणार असल्याचे सप्तर्षी यांनी सांगितले.  नाशिकहून सुरत, आणंद, राजकोट, पोरबंदर, उदयपूर, आग्रा, मथुरा,अलीगढ, राजघाट या मार्गे यात्रा दिल्लीत पोहचेल.

टॅग्स :PuneपुणेYashwant Sinhaयशवंत सिन्हाcongressकाँग्रेसcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक