शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

ग्रामीण महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 13:14 IST

बहुतांश ग्रामीण महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना अनुदानित तुकडीत प्रवेश देण्याऐवजी विना अनुदानित तुकडीमध्ये प्रवेश दिला जातो.

ठळक मुद्देअनुदानित तुकड्यांचे शुल्क कमी असल्याने तिथे मिळवण्यास प्रयत्नशील महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना विना अनुदानित तुकडीत प्रवेश घेण्याबाबत आग्रह

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या बहुतांश ग्रामीण महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना अनुदानित तुकडीत प्रवेश देण्याऐवजी विना अनुदानित तुकडीमध्ये प्रवेश दिला जातो. परिणामी विद्यार्थ्यांना अधिकचे शुल्क भरून महाविद्यालयातील द्वितीय व तृतीय वर्षात प्रवेश घ्यावा लागतो. एका अर्थाने ग्रामीण भागातील महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लुटच केली जात आहे.राज्य शासनाकडून विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील तुकड्यांना अनुदानित व विना अनुदानित तत्त्वावर मान्यता दिली जाते.अनुदानित तुकड्यांचे शुल्क कमी असल्याने सर्वच विद्यार्थी अनुदानित तुकडीमध्ये प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करतात.तसेच विना अनुदानित तुकड्यांचे शुल्क अधिक असल्याने काही महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना विना अनुदानित तुकडीत प्रवेश घेण्याबाबत आग्रह केला जातो.मात्र,विद्यार्थ्यांना अनुदानित तुकडीत प्रवेश दिला तर त्यांचा आर्थिक भार कमी होऊ शकतो.त्यामुळे प्राचार्यांनी स्वत:च विद्यार्थ्यांना अनुदानित तुकडीत प्रवेश देण्याबाबत पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.परंतु,बहुतांश प्राचार्यांकडून याबाबत प्रयत्न केले जात नाहीत. घरा जवळील महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आपल्या परिसरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात. सर्व साधारणपणे प्रथम वर्ष कला व वाणिज्य अभ्यासक्रमाच्या अनुदानित व विना अनुदानित या दोन्ही तुकड्यांमध्ये १२० विद्यार्थी प्रवेश घेतात. परंतु, काही विद्यार्थी प्रथम वर्षात अनुत्तीर्ण झाल्यामुळे किंवा त्यांनी शिक्षण सोडून दिल्यामुळे अनुदानित तुकडीत जागा रिक्त राहतात. त्यामुळे विना अनुदानित तुकडीतील विद्यार्थ्यांना द्वितीय व तृतीय वषार्साठी अनुदानित तुकडीत प्रवेश देणे शक्य होते. परंतु,महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांचे प्रवेश विना अनुदानित तुकडीतच कायम ठेवले जातात.साधारणपणे महाविद्यालयात द्वितीय वषार्साठी १० ते २० जागा रिक्त होतात. तर तृतीय वर्षात २० ते ४० जागा रिक्त होतात. त्यामुळे महाविद्यालयाकडून या जागांवर विना अनुदानित तुकडीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देवून दिलासा देता येऊ शकतो. परंतु, शिष्यवृत्ती संदभार्तील प्रशासकीय कामकाज वाढणार असल्यामुळे महाविद्यालयांकडून या प्रवेशाबाबत टाळाटाळ केली जाते, असे बोलले जात आहे.-अनुदानित व विना अनुदानित दोन्ही तुकड्यांमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.त्यामुळे शिष्यवृत्तीचे कारण पुढे करून विद्यार्थ्यांना अनुदानित तुकडीत प्रवेश देण्याबाबत टाळाटाळ करणे अयोग्य आहे. विना अनुदानित तुकडीतील विद्यार्थ्यांना द्वितीय व तृतीय वर्षात अनुदानित तुकडीत प्रवेश दिल्याने विद्यार्थ्यांचा शुल्काचा भार कमी होईल.त्यामुळे विद्यार्थी हिताचा विचार करून प्राचार्यांनी प्रवेश देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.-डॉ. विजय नारखेडे,सहसंचालक,उच्च शिक्षण,पुणे विभाग

टॅग्स :Puneपुणेcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीGovernmentसरकारEducationशिक्षणfraudधोकेबाजी