शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

Maharashtra Political Crisis: पुण्याचे पालकमंत्री पद अजितदादांकडून कोल्हापूरच्या दादांकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 19:29 IST

सर्व जबाबदारी भारतीय जनता पार्टीवर असून त्यांच्याकडून पुणे जिल्ह्याला काय मिळेल याची उत्सुकता

पुणे : महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, त्या सरकारात पुणे जिल्ह्याला चांगला मान होता, मग आता नव्या शिंदेशाहीत पुणे जिल्ह्याचे ते वैभव कायम राहणार का असा प्रश्न जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. त्यातच शिवसेनेच्या बंडखोरांमध्ये पुण्यातून कोणीच नसल्याने सर्व जबाबदारी भारतीय जनता पार्टीवर असून त्यांच्याकडून पुणे जिल्ह्याला काय मिळेल याची उत्सुकता आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ, भोसरीचे आमदार महेश लांडगे या तिघांची नावे सध्या चर्चेत आहेत. तरीही भाजपाच्या धक्कातंत्रांला अनुसरून आणखी काही नावे अचानक पुढे येण्याची शक्यता आहे. त्यात कॅन्टोन्मेट विधानसभेचे आमदार सुनिल कांबळे, दौंडचे आमदार राहूल कूल, शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची नावे अचानक पुढे येऊ शकतात. पुणे शहर व जिल्ह्यानेही भाजपाला आतापर्यंत विधानसभेला बराच मोठा हात दिला आहे. पुणे शहरात तर सन २०१४ ते १९ या पंचवार्षिकमध्ये ८ ही जागा भाजपाच्या ताब्यात होत्या. त्यामुळेच नव्या मंत्रीमंडळात पुणे जिल्ह्याला चांगली संधी मिळेल अशी भाजपाच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मुळचे कोल्हापूरचे असले तरी निवडून मात्र पुण्यातील कोथरूडमधून आले आहेत. युती सरकारमध्ये ते विधानपरिषदेचे आमदार होते. ते मंत्री होतेच, कोल्हापूरचे पालकमंत्रीही होते व पुण्याचे गिरीश बापट खासदार झाल्यावर पुण्याचेही पालकमंत्रीपद त्यांच्याकडेच आले. देवेंद्र फडणवीस यांच्या खालोखाल त्यांना पक्षात मान आहे. त्यामुळेच या सरकारात उपमुख्यमंत्री ठेवले गेले तर ते त्यांच्याकडेच दिले जाण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे. तसे झाले तर पुण्याचा मान नव्या सरकारमध्येही कायम राहील, फक्त अजित पवार यांच्याऐवजी चंद्रकांत पाटील यांचे नाव असेल.

मात्र त्यामुळेच पुण्यात अन्य मंत्रीपदे दिली जातील का, ती कोणती असतील असा प्रश्न आहे. भाजपाच्या ६ आमदारांमध्ये माधूरी मिसाळ ज्येष्ठ आहेत. यावेळीच त्यांना संधी होती, तसा दावाही त्यांनी केला होता, मात्र सरकारचे आले नाही. आता अडीच वर्षांनी पुन्हा संधी आल्याने ते पुन्हा दावा करतील असे दिसते आहे. पुण्यातून आतापर्यंत एकही महिला मंत्री झालेली नाही. ती संधी साधायचे पक्षाने ठरवल्यास मिसाळ यांचे नाव अग्रभागी असेल असे सांगितले जात आहे. मंत्रीपदासाठी पिंपरी-चिंचवडचाही विचार भाजपाकडून होऊ शकतो. तिथे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे नाव घेतले जात आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळUddhav Thackerayउद्धव ठाकरेchandrakant patilचंद्रकांत पाटीलAjit Pawarअजित पवार