शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

इथून पुढे 'बंद' ला पाठिंबा नाही; इंदापूरातील शहर व्यापारी संघाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 10:39 IST

पक्ष, संघटनांकडून वारंवार पुकारण्यात येणाऱ्या बंदमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान

इंदापूर : वारंवार पुकारण्यात येणाऱ्या बंदमुळे होणारी गळचेपी व नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मारक ठरणाऱ्या अशा बंदच्या वेळी दुकाने, व्यवसाय बंद ठेवायचा नाही, असा निर्णय इंदापूर शहर व्यापारी संघाने सर्वानुमते घेतला आहे.

बंदचे इशारे व व्यापाऱ्यांनी घेतलेला निर्णय याच्या पार्श्वभूमीवर दुकाने, व्यवसाय याचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेऊन योग्य ती कार्यवाही व्हावी. निर्भयपणाने आमचे व्यापार उदीम चालू राहतील, यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती इंदापूर शहर व्यापारी संघाने निवेदनाद्वारे तहसीलदार व पोलिस निरीक्षकांकडे केली आहे.

कोणती ही घटना घडल्यास वेगवेगळे पक्ष किंवा संघटना निषेध म्हणून शहर बंदचे आवाहन करतात. शहरातील सर्व व्यापारीवर्ग, छोटे व्यापारी, लघु उद्योग, फेरीवाले, पथारी व पदपथावरील छोटे व्यावसायिक यांना बंदमध्ये सहभागी व्हावे लागते. असे बंद वारंवार झाल्यामुळे व्यापाऱ्यांचे, लघु, मध्यम व्यवसाय असणाऱ्यांचे, दुकानात असणाऱ्या कामगार, मोलमजुरी करणारे बांधव यांचे अतोनात नुकसान होत आहे, असे संघाने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मागील काही वर्षात कोरोना काळ व मागील दसरा, दिवाळी आदी सण-वारांच्या दिवशीही अशा प्रकारचे बंद ठेवण्यात आले. ही बाब प्रशासनास संघाने वेळोवेळी निदर्शनास आणून दिली आहे. निवेदनेही दिलेली आहेत. तथापि यासंदर्भात प्रशासन, सामाजिक संघटना, सर्वच पक्ष यांनी त्याची दखल घेतलेली नाही. येथून पुढे व्यवसाय, उद्योगांना मारक ठरणाऱ्या अशा बंदच्या काळात दुकाने, व्यवसाय बंद ठेवायचे नाहीत, असा निर्णय इंदापूर शहर व्यापारी संघाच्या वतीने निर्णय घेण्यात आला आहे. याचा गांभीयनि विचार करून दुकाने, व्यवसायाचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेऊन योग्य ती कार्यवाही व्हावी व निर्भयपणाने आमचे व्यापारउदीम चालू राहणेस सहकार्य करावे, अशी अपेक्षा निवेदनात शेवटी करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरagitationआंदोलनbusinessव्यवसायPoliticsराजकारण