शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Indian Air Force: १९७१ च्या युद्धात हवाई दलाच्या दैदिप्यमान कामगिरीमुळे पाकिस्तानचे तुकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 21:13 IST

निवृत्त वैमानिकांनी जागवला युद्धाचा थरार : हवाई दल दिन, ७१ च्या युद्धाचे स्वर्णिम वर्ष उत्साहात

ठळक मुद्देनिवृत्त अधिकाऱ्यांनी युद्धाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त अनेक आठवणींना दिला उजाळा

पुणे : १९७१ च्या युद्धात भारतीय हवाई दलाने दैदिप्यमान कामगिरी केली. वैमानिकांनी पाकिस्तानच्या हवाई दलाची धूळधाण उडविली. शत्रू प्रदेशात भारतीय सैनिकांना उतरवत शत्रूला नामोहरम केले. सातत्याने गगन भरारी घेत शत्रूची विमाने पाडली. यात भारतीय विमानांचेही नुकसान झाले. मात्र, भारतीय अभियंत्यांनी मोलाची कामगिरी बजावत काही तासांत ही विमाने पुन्हा उड्डाणासाठी सज्ज केली. या एकत्रित प्रयत्नांमुळेच पाकिस्तानला अपमानजनक पराभव या युद्धात स्वीकारावा लागला असे म्हणत १९७१ च्या युद्धातील थरारक घटनांचा उलगडा या युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या वैमानिकांनी केला.

८९ वा भारतीय हवाई दल दिन आणि १९७१ च्या युद्धाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त लोहगाव येथील एअर फोर्स स्टेशन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एअर स्टेशनचे प्रमुख एअर कमांडर वीरेंद्र असुदान, निवृत्त एअर मार्शल ए. आर. गांधी आणि निवृत्त वायुसेना अधिकारी यावेळी उपस्थित होते.

भारत पाकिस्तान युद्धाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी पुण्यात दाखल झालेल्या स्वर्णिम विजय मशालीचे स्वागत यावेळी करण्यात आले. या मशालीला गांधी यांनी पुष्पचक्र अर्पण करून १९७१ च्या युद्धातील शहिदांना आदरांजली वाहिली. या युद्धात सहभागी असलेल्या निवृत्त वायुसेना अधिकाऱ्यांचा यावेळी गांधी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर प्रत्यक्ष युद्धात सहभाग नोंदवलेल्या वैमानिकांनी त्यांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला.

सुखोई, ब्रम्होस, आकाश क्षेपणास्त्राचे प्रदर्शन

८९ व्या हवाई दल दिनानिमित्त लोहगाव विमानतळावर विशेष कार्यक्रमात लढाऊ विमान सुखोई एमकेआय ३०, ब्रम्होस क्षेपणास्त्र, आकाश क्षेपणास्त्र तसेच वायू दलातर्फे वापरली जाणाऱ्या इतर शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. तसेच भारतीय हवाई दलाच्या इतिहासाची साक्ष देणारे स्टॉल यावेळी लावण्यात आले होते.

निवृत्त अधिकाऱ्यांनी युद्धाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त अनेक आठवणींना दिला उजाळा

भारतीय हवाई दलाची स्थापना ८ ऑक्टोबर १९३२ या दिवशी झाली. भारतीय हवाई दलात १ लाख ७० हजार अधिकारी आणि जवान आहेत. तर, सुमारे दीड हजार विमान आहेत. भारतीय हवाई दल हे जगातील चौथ्या क्रमांकाचे हवाई दल आहे. १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात भारतीय हवाई दलाने उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. या कार्यक्रमात निवृत्त अधिकाऱ्यांनी युद्धाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त अनेक आठवणींना उजाळा दिला.

टॅग्स :PuneपुणेairforceहवाईदलSocialसामाजिकIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र