शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

Indian Air Force: १९७१ च्या युद्धात हवाई दलाच्या दैदिप्यमान कामगिरीमुळे पाकिस्तानचे तुकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 21:13 IST

निवृत्त वैमानिकांनी जागवला युद्धाचा थरार : हवाई दल दिन, ७१ च्या युद्धाचे स्वर्णिम वर्ष उत्साहात

ठळक मुद्देनिवृत्त अधिकाऱ्यांनी युद्धाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त अनेक आठवणींना दिला उजाळा

पुणे : १९७१ च्या युद्धात भारतीय हवाई दलाने दैदिप्यमान कामगिरी केली. वैमानिकांनी पाकिस्तानच्या हवाई दलाची धूळधाण उडविली. शत्रू प्रदेशात भारतीय सैनिकांना उतरवत शत्रूला नामोहरम केले. सातत्याने गगन भरारी घेत शत्रूची विमाने पाडली. यात भारतीय विमानांचेही नुकसान झाले. मात्र, भारतीय अभियंत्यांनी मोलाची कामगिरी बजावत काही तासांत ही विमाने पुन्हा उड्डाणासाठी सज्ज केली. या एकत्रित प्रयत्नांमुळेच पाकिस्तानला अपमानजनक पराभव या युद्धात स्वीकारावा लागला असे म्हणत १९७१ च्या युद्धातील थरारक घटनांचा उलगडा या युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या वैमानिकांनी केला.

८९ वा भारतीय हवाई दल दिन आणि १९७१ च्या युद्धाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त लोहगाव येथील एअर फोर्स स्टेशन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एअर स्टेशनचे प्रमुख एअर कमांडर वीरेंद्र असुदान, निवृत्त एअर मार्शल ए. आर. गांधी आणि निवृत्त वायुसेना अधिकारी यावेळी उपस्थित होते.

भारत पाकिस्तान युद्धाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी पुण्यात दाखल झालेल्या स्वर्णिम विजय मशालीचे स्वागत यावेळी करण्यात आले. या मशालीला गांधी यांनी पुष्पचक्र अर्पण करून १९७१ च्या युद्धातील शहिदांना आदरांजली वाहिली. या युद्धात सहभागी असलेल्या निवृत्त वायुसेना अधिकाऱ्यांचा यावेळी गांधी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर प्रत्यक्ष युद्धात सहभाग नोंदवलेल्या वैमानिकांनी त्यांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला.

सुखोई, ब्रम्होस, आकाश क्षेपणास्त्राचे प्रदर्शन

८९ व्या हवाई दल दिनानिमित्त लोहगाव विमानतळावर विशेष कार्यक्रमात लढाऊ विमान सुखोई एमकेआय ३०, ब्रम्होस क्षेपणास्त्र, आकाश क्षेपणास्त्र तसेच वायू दलातर्फे वापरली जाणाऱ्या इतर शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. तसेच भारतीय हवाई दलाच्या इतिहासाची साक्ष देणारे स्टॉल यावेळी लावण्यात आले होते.

निवृत्त अधिकाऱ्यांनी युद्धाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त अनेक आठवणींना दिला उजाळा

भारतीय हवाई दलाची स्थापना ८ ऑक्टोबर १९३२ या दिवशी झाली. भारतीय हवाई दलात १ लाख ७० हजार अधिकारी आणि जवान आहेत. तर, सुमारे दीड हजार विमान आहेत. भारतीय हवाई दल हे जगातील चौथ्या क्रमांकाचे हवाई दल आहे. १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात भारतीय हवाई दलाने उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. या कार्यक्रमात निवृत्त अधिकाऱ्यांनी युद्धाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त अनेक आठवणींना उजाळा दिला.

टॅग्स :PuneपुणेairforceहवाईदलSocialसामाजिकIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र