शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

जिल्ह्यातील चार लाख कुटूंबांना मिळणार नळजोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या दुर करण्यासाठी येत्या तिन वर्षात १ हजार ८७३ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या दुर करण्यासाठी येत्या तिन वर्षात १ हजार ८७३ गावांमध्ये शंभर टक्के नळ जोडणीची कामे जलजिवन मिशन अंतर्गत हाती घेण्यात येणार आहे. या साठी जलजिवनच्या २ हजार ७७३ कोटींच्या आरखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. या निधीतून दोन हजर योजनांची कामे केली जाणार असून याचा लाभ ३ लाख ७८ हजार ५६९ कुटुंबांना होणार आहे.

जलजीवन योजने अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला ५५ लीटर प्रतिपाणसी प्रतिदिन या प्रमाणे वैयक्तिक नळजोडणीची कामे येत्या ३ वर्षात केली जाणार आहे. ही कामे लक्षात घेऊन जलजिवन योजनेचा आरखडा तयार करण्यात आला आहे. यायोजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी ५० टक्के खर्चाचा हिस्सा उचलणार आहे. तर प्रत्येक गावांना लोकवर्गणीची १० टक्के अट घालण्यात आली आहे. त्यासाठी ५ टक्के रोख आणि पाच टक्के श्रमदाान अशा स्वरूपात लोकसहभाग असणार आहे. जजिल्ह्यात ३४६ गावांमध्ये १०० टक्के नळजोडणीचीकामे यापूर्वी झालेली आहेत. नव्याने १ हजार ८७३ गावांमध्ये नळयोजनेची कामे हाती घ्यावी लागणार आहेत. त्यासाठी २ हजार ७४३ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. यामध्ये या वर्षी ४१४ गावामंध्ये२४३ कोटी रूपयांची कामे प्रस्तावित आहेत. त्यातून सात हजार कुटुंबांना नळजोडणीद्यारे पाणी पुरविण्यात येणार आहे. तर त्यापुढील वर्षात ९६९ गावांमध्ये एक लाख ९८ हजार ८०१ कटुंबांना नळजोडणी २ हजार १३७ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. सन २०२२२-२३ या वर्षात ४९० गावांसाठी ३६२कोटी रूपये खर्च करून १ लाख २० हजार ७७३ कुटुंबांना नळजोडणी देण्याचे उद्दीष्ट आराखड्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

चौकट

यंदा टंचाई आराखड्याला दिली बगल

जिल्ह्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी जिल्हापरिषदेमार्फतपाणी टंचाई निवारणासाठी कृती कार्यक्रम तयार केला जातो. जिल्हाधिाकाऱ्यांकडून या आराखड्याला मंजुरी दिली जाते. या वर्षी ४३ कोटी रूपयांच्या या आरखड्याला मंजुरी दिली आहे. मात्र, त्याचा समावेश जलजिवन मिशनमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे या आरखड्यातील कामे करता येणार नाही. त्यामुळे नळ पाणी पुरवठा योजनेची सर्व कामे यापुढे जलजीवन मिळनमधून करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायती १ हजार ३९९

एकुण गावे १ हजार ८७३

एकुण वाड्या वस्त्या ९१३०

एकुण कुटुंब संख्या ९८०१८९

नळ जोडणी नाेंदणी कुटुंबे ६०१३४०

नळ पाणी पुरवठा योजना नसलेली गावांची संख्या : २०, मुळशी (७) आंबेगाव (४), जुन्नर (३), हवेली (३), भोर (२), खेड (१)

नळ जोडणी नसलेली कुटुंबे ३ लाख ७८ हजार ८४९

-----

चौकट

१०३ गावे होणार टँकरमुक्त

जिल्ह्यात दरवर्षी १०३ गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. या गावात पाणी योजना नसल्याने अनेक अडचणी येतात. नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. यामुळे ही गावे टँकरमुक्त करण्यासाठी जलजिवन मिशन अंतर्गत कामे केली जाणार आहे.

कोट

जिल्ह्यात या वर्षी टंचाई आराखड्याचा समावेश जलजिवन मिशन अंतर्गत करण्यात आला आहे. या द्वारे पाणी योजनांची आणि नळजोडणीची कामे जिल्ह्यात केली जाणार आहे. येत्या दोन वर्षात सर्व कुटुंबाना नळजोडणी देण्याचे उद्दीष्ट असून ही कामे प्रगतीपथावर आहेत.

- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी