शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रात पाण्याची मोटार सोडताना विजेच्या धक्क्याने ४ शेतकऱ्यांचा दुर्देवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 14:47 IST

राजगड पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू

नसरापूर  : भोर तालुक्यातील निगडे या गावामध्ये नदीपात्रात पाण्याची मोटार सोडत असताना विजेचा धक्का लागून एकाच गावातील चार शेतकरी घटनास्थळी मृत्युमुखी पडल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत बापलेकांचा समावेश आहे. गुंजवणी नीरा नदीपात्रातील पाण्यात मोटार ढकलत असताना अचानक गेलेली वीज परत आल्याने आणि पाण्यात वीजप्रवाह उतरल्यामुळे चौघांचा जागीच मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

 या दुर्दैवी घटनेत निगडे येथील विठ्ठल सुदाम मालुसरे (वय ४८वर्षे), सनी विठ्ठल मालुसरे(वय २४ वर्षे), अमोल चंद्रकांत मालुसरे (वय ३५ वर्षे), आनंदा ज्ञानोबा जाधव (वय ५८ वर्षे) (सर्व रा. निगडे ता.भोर जि. पुणे) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे असून चौघांचे मृतदेह मिळाले असून घटनास्थळी ग्रामस्थ, महसूल, महावितरण, राजगड पोलीस दाखल झाले आहेत. आमदार संग्राम थोपटे, पोपटराव सुके, कुलदीप कोंडे, जीवन कोंडे आदी नेतेगण यावेळी घटना स्थळी उपस्थित होते. 

निगडे ( ता. भोर) येथील गुंजवणी नदीपात्रातील लगत असणाऱ्या शेतासाठी पाणी लागत होते. विज पुरवठा खंडीत असताना घटनेतील चारही जणांनी अवजड असलेला पाणी ओढण्याचा शेती पंप पाण्यात सोडत होते. तेव्हा खंडीत वीजपुरवठा पुन्हा सुरळीत झाल्याने विजेच्या धक्याने चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने निगडे गावावर दुःखाचा डोंगर उभा राहीला आहे. सदर घटना गुरुवारी (दि.१५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. राजगड पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Puneपुणेbhor-acभोरelectricityवीजSocialसामाजिकFarmerशेतकरीDeathमृत्यू