शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

संशोधनाचा पायाच कच्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:15 IST

विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध क्षमता विकसित होतात. त्यात तार्किक विचार, गणितीय क्षमता, प्रात्यक्षिकांमुळे कार्य संस्कृती आदींचा समावेश ...

विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध क्षमता विकसित होतात. त्यात तार्किक विचार, गणितीय क्षमता, प्रात्यक्षिकांमुळे कार्य संस्कृती आदींचा समावेश करता येईल. एखाद्या कंपनीमध्ये रोजगारासाठी गेल्यानंतर विद्यार्थ्यांना कंपनीकडून देण्यात आलेले कोणतेही काम करावे लागते. विद्यार्थ्यांना पायाभूत ज्ञान असेल तर ते कोणत्याही ठिकाणी काम करू शकतात. त्यातही अनेक कंपन्यांमध्ये विज्ञानातील मूलभूत ज्ञान असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मूलभूत विज्ञानापासून दूर जाणे योग्य नाही.

गेल्या काही वर्षांपासून इयत्ता बारावीत विज्ञान शाखेत किती गुण मिळतात याला फारसे महत्त्व राहिले नाही. बारावीनंतरच्या सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व परीक्षा द्यावी लागते. त्यामुळे नीट, जेईई, एमएचसीईटी आदी प्रवेशपूर्व परीक्षांच्या अभ्यासाकडेच विद्यार्थी अधिक लक्ष देतात. त्यामुळे केवळ ८५ ते ९५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक टक्के गुण असणारे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. परिणामी सर्वसाधारणपणे ५५ ते ७५ टक्के गुण असणारे विद्यार्थीच बीएस्सी अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांचा कल तात्काळ रोजगार देणाऱ्या अभ्यासक्रमांकडे असल्याचे दिसून येते. परिणामी संशोधन क्षेत्रात काम करणारे विद्यार्थी हे मध्यम स्तरावरील असतात.

मूलभूत विज्ञानाच्या माध्यमातून संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती दिल्या जातात. मात्र, एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत त्यांची संख्या खूपच मर्यादित आहे. विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्राकडे वळावे यासाठीच आयसरसारख्या संस्थांची निर्मिती झाली. त्यामुळे गेल्या दहा-बारा वर्षांत या संस्थांमधून मोठ्या प्रमाणात उत्कृष्ट दर्जाचे नावीन्यपूर्ण संशोधन झाले आहे. तथापि, नोबेल पारितोषिक मिळू शकेल या दर्जाचे काम होण्यासाठी बराच वाव आहे, ही वस्तुस्थिती आहे.

गेल्या काही वर्षांचा विचार करता प्रत्येक विद्यार्थी आता केवळ नोकरीचा विचार करीत असल्याचे दिसून येते. त्यातही आयटी क्षेत्रात नोकरीच्या संधी अधिक आहेत. मात्र, बीएस्सी, एमएस्सी, एमटेक, आयसरमधील पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना किंवा विज्ञान शाखेत एखाद्या विषयात सुवर्णपदक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यालाही आयटीमधील नोकरीच्या दर्जाचे पॅकेज मिळत नाही. त्यामुळे एमएस्सी, बी.ई./एम.ई. (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इ.) अभ्यासक्रम केलेले विद्यार्थीसुद्धा आयटी क्षेत्राकडे वळत आहेत. परिणामी मूलभूत संशोधनाकडे दुर्लक्ष होत आहे.

विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्राकडे वळावे यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न झाले असून, अजूनही मोठ्या प्रमाणात करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांनी मूलभूत विज्ञानाकडे वळावे यासाठी शासनाने ‘इन्स्पायर’, के.व्ही.पी.वायसारख्या अनेक योजना राबविल्या आहेत. मात्र, या सर्व योजनांना ही मर्यादा आहे, असे दिसून येते. त्यामुळे फक्त शासनाच्या किंवा विद्यापीठाच्या पातळीवर अवलंबून न राहता उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था व महाविद्यालये यांनी आपल्या स्तरावर वेगवेगळ्या प्रोत्साहनपर योजना राबविण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी प्रात्यक्षिकांमधून अनेक बाबी शिकत असतात. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत शिक्षकांनी पारंपरिक शिक्षण पद्धतीव्यतिरिक्त इतर वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण पद्धती वापरून विद्यार्थ्यांना आपल्या विषयात आवड निर्माण होईल यादृष्टीने स्वत:हून वेगळे प्रयत्न करावे लागतील. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांमध्ये गुंतवून ठेवणे, प्रकल्पांवर आधारित ट्रेनिंग आदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत विज्ञानविषयक रस निर्माण करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विद्यार्थी व पालकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. पालकांनीही मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे; परंतु शिक्षकांनी अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना या पद्धतीने शिकवावे की विद्यार्थ्यांना ‘बीएस्सी’ची निवड करा, असे सांगण्याची वेळच येऊ नये. संशोधन झाले नाही तर ‘इनोव्हेशन’ होणार नाही. इनोव्हेशन झाले नाही तर माणसाच्या गरजांना पूरक अशा वस्तू व सेवांची निर्मिती होऊ शकणार नाही. परिणामी नवीन उद्योग उभे राहू शकणार नाहीत. त्यामुळे संशोधन हे देशाच्या अर्थकारणाशी संबंधित असून, त्याचा पाया मूलभूत विज्ञानावर उभा आहे, हे विसरून चालणार नाही.

- डॉ. के. सी. मोहिते, माजी अधिष्ठाता, विज्ञान विद्याशाखा, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ