शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

संशोधनाचा पायाच कच्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:15 IST

विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध क्षमता विकसित होतात. त्यात तार्किक विचार, गणितीय क्षमता, प्रात्यक्षिकांमुळे कार्य संस्कृती आदींचा समावेश ...

विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध क्षमता विकसित होतात. त्यात तार्किक विचार, गणितीय क्षमता, प्रात्यक्षिकांमुळे कार्य संस्कृती आदींचा समावेश करता येईल. एखाद्या कंपनीमध्ये रोजगारासाठी गेल्यानंतर विद्यार्थ्यांना कंपनीकडून देण्यात आलेले कोणतेही काम करावे लागते. विद्यार्थ्यांना पायाभूत ज्ञान असेल तर ते कोणत्याही ठिकाणी काम करू शकतात. त्यातही अनेक कंपन्यांमध्ये विज्ञानातील मूलभूत ज्ञान असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मूलभूत विज्ञानापासून दूर जाणे योग्य नाही.

गेल्या काही वर्षांपासून इयत्ता बारावीत विज्ञान शाखेत किती गुण मिळतात याला फारसे महत्त्व राहिले नाही. बारावीनंतरच्या सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व परीक्षा द्यावी लागते. त्यामुळे नीट, जेईई, एमएचसीईटी आदी प्रवेशपूर्व परीक्षांच्या अभ्यासाकडेच विद्यार्थी अधिक लक्ष देतात. त्यामुळे केवळ ८५ ते ९५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक टक्के गुण असणारे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. परिणामी सर्वसाधारणपणे ५५ ते ७५ टक्के गुण असणारे विद्यार्थीच बीएस्सी अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांचा कल तात्काळ रोजगार देणाऱ्या अभ्यासक्रमांकडे असल्याचे दिसून येते. परिणामी संशोधन क्षेत्रात काम करणारे विद्यार्थी हे मध्यम स्तरावरील असतात.

मूलभूत विज्ञानाच्या माध्यमातून संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती दिल्या जातात. मात्र, एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत त्यांची संख्या खूपच मर्यादित आहे. विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्राकडे वळावे यासाठीच आयसरसारख्या संस्थांची निर्मिती झाली. त्यामुळे गेल्या दहा-बारा वर्षांत या संस्थांमधून मोठ्या प्रमाणात उत्कृष्ट दर्जाचे नावीन्यपूर्ण संशोधन झाले आहे. तथापि, नोबेल पारितोषिक मिळू शकेल या दर्जाचे काम होण्यासाठी बराच वाव आहे, ही वस्तुस्थिती आहे.

गेल्या काही वर्षांचा विचार करता प्रत्येक विद्यार्थी आता केवळ नोकरीचा विचार करीत असल्याचे दिसून येते. त्यातही आयटी क्षेत्रात नोकरीच्या संधी अधिक आहेत. मात्र, बीएस्सी, एमएस्सी, एमटेक, आयसरमधील पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना किंवा विज्ञान शाखेत एखाद्या विषयात सुवर्णपदक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यालाही आयटीमधील नोकरीच्या दर्जाचे पॅकेज मिळत नाही. त्यामुळे एमएस्सी, बी.ई./एम.ई. (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इ.) अभ्यासक्रम केलेले विद्यार्थीसुद्धा आयटी क्षेत्राकडे वळत आहेत. परिणामी मूलभूत संशोधनाकडे दुर्लक्ष होत आहे.

विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्राकडे वळावे यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न झाले असून, अजूनही मोठ्या प्रमाणात करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांनी मूलभूत विज्ञानाकडे वळावे यासाठी शासनाने ‘इन्स्पायर’, के.व्ही.पी.वायसारख्या अनेक योजना राबविल्या आहेत. मात्र, या सर्व योजनांना ही मर्यादा आहे, असे दिसून येते. त्यामुळे फक्त शासनाच्या किंवा विद्यापीठाच्या पातळीवर अवलंबून न राहता उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था व महाविद्यालये यांनी आपल्या स्तरावर वेगवेगळ्या प्रोत्साहनपर योजना राबविण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी प्रात्यक्षिकांमधून अनेक बाबी शिकत असतात. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत शिक्षकांनी पारंपरिक शिक्षण पद्धतीव्यतिरिक्त इतर वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण पद्धती वापरून विद्यार्थ्यांना आपल्या विषयात आवड निर्माण होईल यादृष्टीने स्वत:हून वेगळे प्रयत्न करावे लागतील. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांमध्ये गुंतवून ठेवणे, प्रकल्पांवर आधारित ट्रेनिंग आदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत विज्ञानविषयक रस निर्माण करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विद्यार्थी व पालकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. पालकांनीही मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे; परंतु शिक्षकांनी अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना या पद्धतीने शिकवावे की विद्यार्थ्यांना ‘बीएस्सी’ची निवड करा, असे सांगण्याची वेळच येऊ नये. संशोधन झाले नाही तर ‘इनोव्हेशन’ होणार नाही. इनोव्हेशन झाले नाही तर माणसाच्या गरजांना पूरक अशा वस्तू व सेवांची निर्मिती होऊ शकणार नाही. परिणामी नवीन उद्योग उभे राहू शकणार नाहीत. त्यामुळे संशोधन हे देशाच्या अर्थकारणाशी संबंधित असून, त्याचा पाया मूलभूत विज्ञानावर उभा आहे, हे विसरून चालणार नाही.

- डॉ. के. सी. मोहिते, माजी अधिष्ठाता, विज्ञान विद्याशाखा, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ