शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

लौकी परिसरात आढळले बिबटे; ग्रामस्थ दहशतीखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 2:32 AM

बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी

मंचर : लौकी (ता. आंबेगाव) येथे राणुबाई मंदिराजवळ असलेली काळपट्टी व घोटीमळा येथे बिबट्याचे वास्तव्य असल्याचे उघड झाले आहे. शेतकरी महेश दिनकर थोरात व शिक्षक संतोष रामचंद्र थोरात यांना दोन बिबट्यांनी रात्री सात ते आठच्या सुमारास दोनदा दर्शन दिले. यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाने बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी सरपंच संदेश थोरात व उपसरपंच गजाबा थोरात यांनी केली आहे.कळंब-राणुबाई मंदिर रस्त्यावरील काळपट्टी या ठिकाणी शेतकरी महेश दिनकर थोरात शेतमजूर यांच्यासह मेथीच्या भाजीवर फवारणी करत असताना अंधारात त्यांना गुरगुरण्याचा आवाज आला. मोबाइलची बॅटरी आवाजाच्या दिशेने चालू केली असता त्यांना दीडशे फूट अंतरावर शेताच्या बांधावर चार डोळे चमकल्याचे दिसले व त्या डोळ्यांची हालचाल वेगाने आपल्या दिशेने येत असल्याचे जाणवले. त्याचक्षणी हे बिबटे असावेत अशी भीती मनामध्ये येऊन शेतमजुरांना शेतामधून रस्त्याच्या दिशेने पळा, असे मोठ्या आवाजात सांगितले.शेतकरी राजेंद्र अर्जुन थोरात व शिक्षक संतोष रामचंद्र थोरात वाहनामधून शाळेतून आपल्या घरी चालले होते. त्यांना थांबवून शेताच्या बांधावर बिबटे आहे का, याची खात्री करण्यासाठी गाडीची लाईट बिबट्यांच्या दिशेने मारली असता मुख्य रस्त्यापासून सुमारे चारशे फुट अंतरावर दोन बिबटे मारामारी करत असल्याचे दिसले. पण माणसांचा आवाज व गाडीचा उजेड यामुळे बिबट्यांनी तेथून उत्तरेकडे असलेल्या उसाच्या शेतात धूम ठोकली. त्याचवेळी काही घरगुती कामानिमित्त शिक्षक थोरात हे माघारी कळंबला जाऊन पुन्हा घरी निघाले असता त्यांना रात्री आठच्या सुमारास राणूबाई मंदिरजवळील घोटीमळा येथे पुन्हा तेच दोन बिबटे डांबरी रस्त्यावर बसलेले दिसले. त्यानंतरते बिबटे डांबरी रस्ता सोडून शेतीकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याने पूर्वेकडे निघाले. त्या ठिकाणी एक बिबट्या रस्त्यावर व एक बिबट्या मका शेताच्या बांधावर उभा होता. याचवेळी शेतकरी संतोष नंदाराम थोरात व लक्ष्मीबाई थोरात यांनी पण बिबटे असल्याचे पहिले. त्यांनर ते बिबटे मका शेतात दिसेनासे झाले. सरपंच संदेश थोरात, उपसरपंच गाजबा थोरात यांच्यासह ग्रामस्थ यांनी शिक्षक थोरात यांची घरी भेट घेऊन घडलेला भीतीदायक प्रसंग समजावून घेतला. वारंवार होणारे विजेचे भारनियमन यामुळे रात्री शेतकºयांना आपल्या शेतातील पिकांना पाणी द्यावे लागते, अशा वेळी बिबट्याने हल्ला केल्यास अनुचित प्रसंग घडल्याशिवाय राहणार नाही. यावर उपाय म्हणूनवीज महामंडळाने भारनियमनात बदल करावा, अशी मागणी उपसरपंच गजाबा थोरात व शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :leopardबिबट्याPuneपुणे