शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

Madhav Godbole Passed Away: प्रशासकीय वर्तुळातील मराठी आवाज निमाला; माधव गोडबोले यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 18:45 IST

देशातील विविध उल्लेखनीय घडामोडींमध्ये केंद्रस्थानी असलेले माजी केंद्रीय गृहसचिव माधव दत्तात्रय गोडबोले यांचे सोमवारी सकाळी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले

पुणे : दिल्लीतील केंद्रीय प्रशासकीय वर्तुळात मराठी माणसाचा ठसा उमटवणारे, देशातील विविध उल्लेखनीय घडामोडींमध्ये केंद्रस्थानी असलेले माजी केंद्रीय गृहसचिव माधव दत्तात्रय गोडबोले यांचे सोमवारी सकाळी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. एसएनडीटी महाविद्यालयाजवळच्या भक्तिमार्ग पथावर सांगाती नावाचे त्यांचे निवासस्थान होते. तिथेच त्यांनी सकाळी अखेरचा श्वास घेतला.

वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी २ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सुजाता, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पुण्यात असले तरी सार्वजनिक जीवनापासून ते अलिप्तच होते. वाचन, चिंतन, लेखन यात त्यांनी स्वत:ला गुंतवून घेतले होते, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. प्रशासनातील काही अधिकारी सल्ला किंवा मार्गदर्शन यासाठी त्यांच्याबरोबर संपर्क साधत असत. त्यांच्याबरोबर बोलण्यात त्यांना आनंद वाटे अशी माहिती त्यांनी दिली.

दिल्लीच्या प्रशासकीय वर्तुळात गोडबोले यांनी चांगले नाव कमावले

भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९५९ च्या तुकडीचे ते अधिकारी. सुरुवातीची काही वर्षे महाराष्ट्रात काम केल्यानंतर ते दिल्लीत केंद्रीय वर्तुळात काम करू लागले. बाबरी मशीद पाडली गेली, त्यावेळी ते केंद्रीय गृह सचिव म्हणून काम करत होते. त्यापूर्वी त्यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचे सचिव आणि भारत सरकारचे नगरविकास सचिव आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र सरकारचे प्रधान वित्त सचिव अशा विविध पदांवर काम करून लौकिक मिळवला. मनिला येथील आशियाई विकास बँकेतही त्यांनी पाच वर्षे काम केले. दिल्लीच्या प्रशासकीय वर्तुळात गोडबोले यांनी चांगले नाव कमावले. कडक शिस्तीचे व प्रशासकीय गोष्टींची सखोल माहिती असणारे अधिकारी असा त्यांचा दबदबा होता.

मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांवर त्यांचे प्रभुत्व

मार्च १९९३ मध्ये प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर मागील काही वर्षांपासून गोडबोले पुण्यात राहत होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी वाचन आणि लेखनावर आपले लक्ष केंद्रित केले. आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय कारकिर्दीवर ते पुस्तके, स्तंभलेखन यातून प्रकाश टाकत असत. त्यांनी १५ हून अधिक इंग्रजी आणि तितकीच मराठी पुस्तकं लिहिली. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. लेखनही ते या दोन्ही भाषांमध्ये करत असत. ‘जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व - एक सिंहावलोकन’ या त्यांच्या पुस्तकाला मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण विशेष वाड्मय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPuneपुणेDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलCentral Governmentकेंद्र सरकारHome Ministryगृह मंत्रालय