शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग कल्याण राज्य पुरस्काराचा शासनाला विसर; २०१६ पासून पुरस्कारांत खंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 16:32 IST

डिसेंबरपासून दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन होऊनही दिव्यांगांच्या पदरी सर्वच बाजुने निराशा पडत आहे

पुणे : भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन विभागामार्फत दरवर्षी उत्कृष्ट कर्मचारी तसेच निवडक संस्था यांच्यामध्ये तेरा प्रकारांत तीस दिव्यांगांना राष्ट्रीय पुरस्कार नियमितपणे देण्यात येतात. परंतू, २०१६ म्हणजेच गेल्या सात वर्षांपासून हे पुरस्कार काेणालाच दिले गेले नाहीत. गेल्यावर्षी डिसेंबरपासून दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन झाले आहे. परंतू, ते हाेउनही दिव्यांगांच्या पदरी सर्वच बाजुने निराशा पडत आहे.

दरवर्षी ३ डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पाच व्यक्तिगत प्रकारात एकवीस तर आठ संस्थात्मक प्रकारात नऊ असे एकूण ३० पुरस्कार देण्यात येतात. राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड, संत रविदास यांच्या नावाने समाजकल्याणासाठी अभिजात कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना नियमितपणे हे पुरस्कार दिले जातात.

परंतू, यामध्ये तब्बल सात वर्षांपासून खंड पडला आहे. मग, सामाजिक न्याय विभाग नावालाच आहे का असा प्रश्न दिव्यांगांकडून विचारण्यात येत आहे. याबाबत सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव विष्णुदास घोडके यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

दरम्यान, 3 डिसेंबर 2022 पासून मंत्रालयात स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग सुरु झाला आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने दिव्यांग कल्याण राज्य पुरस्कार योजनेमध्ये सुधारणा करणे तसेच पुरस्काराची रक्कम वाढविण्याबाबत प्रस्ताव राज्य शासनाला दिला आहे. यामध्ये सुधारित दिव्यांग कल्याणार्थ राज्य पुरस्कार योजनेअंतर्गत पूर्वीचे दोन प्रकार कायम ठेऊन केंद्र शासनाच्या धर्तीवर नव्याने 21 दिव्यांगत्वाच्या प्रकारांचा समावेश करुन काही नवीन नामांकनाचा समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रDivyangदिव्यांगBachhu Kaduबच्चू कडूGovernmentसरकार