शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

दिव्यांग कल्याण राज्य पुरस्काराचा शासनाला विसर; २०१६ पासून पुरस्कारांत खंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 16:32 IST

डिसेंबरपासून दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन होऊनही दिव्यांगांच्या पदरी सर्वच बाजुने निराशा पडत आहे

पुणे : भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन विभागामार्फत दरवर्षी उत्कृष्ट कर्मचारी तसेच निवडक संस्था यांच्यामध्ये तेरा प्रकारांत तीस दिव्यांगांना राष्ट्रीय पुरस्कार नियमितपणे देण्यात येतात. परंतू, २०१६ म्हणजेच गेल्या सात वर्षांपासून हे पुरस्कार काेणालाच दिले गेले नाहीत. गेल्यावर्षी डिसेंबरपासून दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन झाले आहे. परंतू, ते हाेउनही दिव्यांगांच्या पदरी सर्वच बाजुने निराशा पडत आहे.

दरवर्षी ३ डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पाच व्यक्तिगत प्रकारात एकवीस तर आठ संस्थात्मक प्रकारात नऊ असे एकूण ३० पुरस्कार देण्यात येतात. राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड, संत रविदास यांच्या नावाने समाजकल्याणासाठी अभिजात कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना नियमितपणे हे पुरस्कार दिले जातात.

परंतू, यामध्ये तब्बल सात वर्षांपासून खंड पडला आहे. मग, सामाजिक न्याय विभाग नावालाच आहे का असा प्रश्न दिव्यांगांकडून विचारण्यात येत आहे. याबाबत सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव विष्णुदास घोडके यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

दरम्यान, 3 डिसेंबर 2022 पासून मंत्रालयात स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग सुरु झाला आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने दिव्यांग कल्याण राज्य पुरस्कार योजनेमध्ये सुधारणा करणे तसेच पुरस्काराची रक्कम वाढविण्याबाबत प्रस्ताव राज्य शासनाला दिला आहे. यामध्ये सुधारित दिव्यांग कल्याणार्थ राज्य पुरस्कार योजनेअंतर्गत पूर्वीचे दोन प्रकार कायम ठेऊन केंद्र शासनाच्या धर्तीवर नव्याने 21 दिव्यांगत्वाच्या प्रकारांचा समावेश करुन काही नवीन नामांकनाचा समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रDivyangदिव्यांगBachhu Kaduबच्चू कडूGovernmentसरकार