शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

वणव्यावर लक्ष ठेवण्यासाठी आता वन विभागाच गस्त घालणार; वनपालापासून वन अधिकारी सहभागी असणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 18:33 IST

कात्रज बोगद्यालगतच्या डोंगरावर बुधवारी रात्री सात वाजता वणवा लागला होता. हा वणवा प्रचंड असल्याने तो वेगाने पसरला आणि शेकडो एकर जागेवरील गवत जळून गेले. वनपालापासून वन अधिकारी सहभागी असणार

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्हा परिसरात वणवे लागण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आता वन विभागातर्फे गस्त घालण्यात येणार आहे. त्याबाबतचा निर्णय घेतला असून, लवकर गस्त सुरू करू, असे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

कात्रज बोगद्यालगतच्या डोंगरावर बुधवारी रात्री सात वाजता वणवा लागला होता. हा वणवा प्रचंड असल्याने तो वेगाने पसरला आणि शेकडो एकर जागेवरील गवत जळून गेले. सध्या हिवाळा असतानाही वणवा कसा लागतो ? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे वणवे मानवनिर्मित असण्याची दाट शक्यता आहे. खरंतर वणव्याने डोंगरावरील, वनातील जैवविविधता, वन्यजीव, कीटक, पक्षी, सरपटणारे प्राणी आदी नष्ट होतात. विशेषत: औषधी वनस्पतीही नामशेष होतात. वणवा डोंगर व जंगल उजाड करतो. झाडांचा बळी घेतो. नवीन रोपे व बी नष्ट करतो. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी करतो. पाण्याचे प्रवाह कोरडे करतो. निसर्गाची व वन्यजीवांची अपरिमित हानी होते यात अनेक दुर्मीळ प्रजाती नष्ट होतात, या विषयी जागृती करणे आवश्यक आहे.

वणव्याची मानवनिर्मित कारणे :* मोहाची फुले वेचताना जमिनीवरील पानांचा त्रास होतो म्हणून त्याला आग लावतात.* शेतातील गवत पेटवले तर नवीन गवत चांगले येईल, असा गैरसमज असल्याने अनेकजण गवत पेटवतात.  * वन क्षेत्राशेजारी शेती असेल तर तेथेही जमीन स्वच्छ करण्यासाठी आग लावली जाते.* वन क्षेत्रात किंवा जंगलात पर्यटनासाठी आलेले पर्यटक, जंगलात फिरणारे गुराखी  व इतर विडी, सिगारेट आगकाडीचे थोटूक फेकून देतात. त्याने आग लागते. मध जमा करणारे टेंभे घेऊन जातात आणि तिथेच टाकतात.

नैसर्गिक कारणे* विजेच्या तारा एकमेकांना चिकटून ठिणग्या गवतावर पडतात आणि वणवा पेटतो.

पारंपारिक उपाय अपुरेझाडाची फांदी तोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला जातो. आगीचा इशारा देणारे सेन्सर्सचे जाळे उभारून कमी खर्चात आगीची माहिती मिळू शकते. तसेच उपग्रहाद्वारे वणवा लागल्याबरोबर इशारा देणारी यंत्रणा आहे. पण याचा अधिक उपयोग करायला हवा. तसेच ब्लोअर यंत्राचा वापर होतो. पण त्याचा ही फायदा होत नाही. --------------------------------नागरिकांनी कुठेही वणवा लागला तरी त्याची माहिती त्वरित वन विभागाला द्यावी. अन्यथा १९२६ या वन विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा. - राहुल पाटील, उपवनसंरक्षक, पुणे विभाग --------------

टॅग्स :Puneपुणेfireआगforestजंगलforest departmentवनविभाग